शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले; निलंगा पालिकेकडे विजबिलाची पावणेचार कोटींची थकबाकी !

By संदीप शिंदे | Updated: April 1, 2024 13:24 IST

वारंवार वीजपुरवठा खंडित : उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे नियोजन कसे होणार

निलंगा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात पाणी असूनही केवळ पालिका प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे निलंगा शहरवासीयांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. महावितरण कंपनीची ३ कोटी २६ लाख ८६ हजार रुपयांची थकबाकी तर ४५ लाखांची पाणीपट्टी अशी एकूण ३ कोटी ७१ लक्ष ८६ हजार रूपयांची थकबाकी आहे. त्यात महावितरण तर कधी सिंचन उपसा विभागामुळे पाणीपुरवठा बंद होतो आणि तांत्रिक बिघाड तर नेहमीच होत असतो. अशीच स्थिती राहिली तर उन्हाळ्यात पाणीपुरवठा होणार कसा असा सवाल उपस्थित होत आहे.

निलंगा शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा यासाठी माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी अथक प्रयत्नातून माकणी धरणावरून ४० किलोमीटर पाइपलाइन अंथरूण शहराला पाणीपुरवठा सुरळीत चालू केला. मात्र, २५ ते ३० वर्षांनंतर ही सर्व यंत्रणा जीर्ण झाल्यामुळे व लिकेजसचे प्रमाण वाढल्याने माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी ८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून ही संपूर्ण योजना करून घेतली होती. संबंधित गुत्तेदाराने ही योजना पूर्ण कार्यान्वित न करता गडबडीत पालिकेला हस्तांतरण केले. त्यामुळे यातील सर्व दोष तसेच राहिल्यामुळे वारंवार लिकेजसचा अडथळा येऊन पाणीपुरवठा ठप्प होऊ लागला आहे. परिणामी, नागरिकांना अशा कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

अशातच शहराला २४ तास पाणीपुरवठा करू असे सांगण्यात येऊन नळाला मीटर बसवण्यात आले. मात्र ते आजही नादुरुस्त अवस्थेत पडून असून, विनाकारण निधीचा चुराडा झाला आहे. सर्व शहरातील नागरिकांनी या नवीन पाईपलाईनचे डिपॉझिट भरून नळ कनेक्शन घ्यावे या हेतूने पालिका प्रशासनाने शहरातील पालिकेच्या मालकीचे ६५ बोअरवेल बंद करून टाकल्याने शहरातील नागरिकांना या मोठ्या यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र पाण्याची आपत्कालीन परिस्थितीत पालिकेचे सर्व बोअर पुन्हा चालू केले पाहिजे अशी मागणी येथील अनेक संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच या योजनेत दोष तर आहेतच त्यातच महावितरण कंपनीची थकबाकी कोट्यवधी रुपये असल्याने वारंवार पाणीपुरवठ्याचा विद्युत पुरवठा बंद केल्याने पाणी वितरण बंद होते.

पालिकेने नियोजन करण्याची मागणी...या थकबाकीत लघुदाब १७ लाख ४० हजार, उच्चदाब १ कोटी ६८ लाख ३७ हजार रुपये, नगरपरिषद दिवाबत्ती उच्चदाब १ कोटी ३९ लक्ष ९३ हजार, नगरपरिषद कार्यालय १ लाख १६ हजार अशी एकूण ३ कोटी २६ लक्ष ८६ हजार महावितरणची थकबाकी तर ४५ लाख रुपये पाणीपट्टी असे एकूण ३ कोटी ७१ लाख ८६ हजार रुपये थकबाकी आहे. याच थकबाकीमुळे कायम पाण्याचा त्रास होणार असेल तर पालिकेने याबाबत काय नियोजन केले आहे, त्यासंबंधी ठोस पावले उचलून कायमस्वरूपी बंदोबस्त करावे अशी मागणी निलंगावासीयांनी केली आहे.

शहरातील ६५ बोअरवेल सुरु करावेत...निलंगा शहरातील पालिकेच्या मालकीचे ६५ बोअरवेल बंद करून टाकल्याने शहरातील नागरिकांना या मोठ्या यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र पाण्याची आपत्कालीन परिस्थितीत पालिकेचे सर्व बोअर पुन्हा चालू केले पाहिजे अशी मागणी येथील अनेक संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे. मात्र, याबाबत प्रशासनाने कोणतीच उपाययोजना अद्याप राबविलेली नाही. उन्हाची तीव्रता पाहून उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :laturलातूरMuncipal Corporationनगर पालिका