शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

जिल्ह्यातील ४१ गावांना अधिग्रहणांद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST

लातूर : जून महिना संपत आला असला तरी समाधानकारक पावसाने अद्यापही हजेरी लावली नाही. त्यामुळे टंचाईची दाहकता कायम असून, ...

लातूर : जून महिना संपत आला असला तरी समाधानकारक पावसाने अद्यापही हजेरी लावली नाही. त्यामुळे टंचाईची दाहकता कायम असून, ११६ गाव-वाड्यांनी १३९ अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समितीस्तरावर सादर केले आहेत. यापैकी ४१ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, सद्य:स्थितीत ४६ अधिग्रहणाद्वारे ४१ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.

लातूर तालुक्यातील १२, औसा ६, निलंगा ७, रेणापूर २४, अहमदपूर ४२, चाकूर ११, शिरूर अनंतपाळ १, उदगीर ४, तर जळकोट तालुक्यातील ९, अशा एकूण ९८ गावे, तर १८ वाड्यांचे अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समितीस्तरावर दाखल आहेत. यापैकी स्थळ पाहणीअंती दोन प्रस्ताव वगळण्यात आले आहेत. तहसीलस्तरावर १०६ गावांचे १२४ प्रस्ताव प्रलंबित आहेत, तर पंचायत समितीस्तरावर ९ गावांचे १२ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, उपविभागीय अधिकारी कार्यालयाने ३२ गावे आणि ९ वाड्या, असे एकूण ४१ गावांचे प्रस्ताव मंजूर केले असून, ४६ अधिग्रहणाद्वारे या गावांची तहान भागविली जात आहे. जिल्ह्यात मागील वर्षी परतीच्या पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ झाली होती. परिणामी, यावर्षी टंचाईच्या झळा जास्त जाणवल्या नाहीत. टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ११ कोटी रुपयांचा कृती आराखडाही तयार करण्यात आला होता. त्याअनुषंगाने उपाययोजनाही राबविल्या जात आहेत. दरम्यान, टँकरसाठी दोन ते तीन प्रस्ताव दाखल झाले होते. मात्र, पडताळणीनंतर टँकरची गरज नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात एकही टँकर सुरू झाले नसल्याचे समाधानकारक चित्र आहे.

अहमदपूर तालुक्यात १७ अधिग्रहणे

लातूर तालुक्यात ८, औसा २, निलंगा ६, अहमदपूर १७, उदगीर ५, तर जळकोट तालुक्यात ८ अधिग्रहणे मंजूर आहेत. त्याद्वारे संबंधित गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. जून महिना संपत आला असला तरी अद्याप पाऊस झाला नसल्याने टंचाई निवारण कक्षाच्या वतीने अधिग्रहणे सुरू ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, ती कधीपर्यंत सुरू ठेवायची, याबाबत निर्णय झाला नसल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.