शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाणीटंचाईचे चटके; अहमदपूरात २५ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा

By संदीप शिंदे | Updated: March 20, 2024 16:07 IST

एक टँकर सुरु : पंचायत समितीकडे टंचाई निवारणासाठी येताहेत प्रस्ताव

अहमदपूर : तालुक्यात मार्चच्या महिन्यात पाणीटंचाईचे चटके वाढले असून, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी हातपंपावर पाण्यासाठी गर्दी होत आहे. ग्रामस्थांना पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच सर्वाधिक टंचाईच्या झळा अहमदपूर तालुक्याला सुरू झाल्या आहेत. पंचायत समितीला एकूण ५७ अधिग्रहण प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यापैकी ४७ अधिग्रहणाचे प्रस्ताव तहसीलला पाठविण्यात आले आहे. अधिग्रहण मंजुरी २५ आदेश प्राप्त झाले असून, त्यापैकी २५ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा होत असून, एक टँकरही सुरु करण्यात आले आहे.

तालुक्यातील फुलसेवाडी येथे टँकरची मागणी करण्यात आली असून, बालाघाटच्या डोंगररांगेत वसलेल्या अहमदपूर तालुक्यात दरवर्षी पाऊस इतर तालुक्याच्या तुलनेत कमी असतो. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा उन्हाळ्यात सर्वाधिक असतात. मार्च महिन्यात ग्रामीण भागातून पाणीटंचाईची ओरड सुरू झाली आहे. त्यामुळे टँकर व अधिग्रहणाची मागणी होत आहे. टंचाईत उपाययोजना करण्यासाठी पंचायत समितीने १६८ गावे वाड्या, तांड्यासाठी ६ कोटी ७४ लाखांचा आराखडा तयार केला आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात टंचाईच्या झळा तालुक्याला सुरु होतात. यंदा मात्र गतवर्षीच्या परतीच्या पावसामुळे महिनाभर नागरिकांना दिलासा मिळाला होता. आता मात्र २५ ते ३० गावांत टंचाईच्या झळा वाढल्या आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी १ कोटी ३३ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला होता. जानेवारी ते मार्चपर्यंत टंचाईवर उपयोजना करण्यासाठी १ कोटी ९७ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला होता. एप्रिल ते जूनपर्यंत टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी १ कोटी ४३ लाखाचा आराखडा तयार करून पाठविण्यात आला होता. प्रशासन उपाययोजना करण्यासाठी कामाला लागले आहे. टंचाई सदृश्य गावात उपाययोजनांसाठी ग्रामस्थांचे पंचायत समितीला खेटे वाढले आहेत. पंचायत समितीकडे प्रस्ताव आल्यावर संबंधित गावची पाहणी करून तात्काळ उपायोजना केल्या जात असल्याचे पंचायत समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या गावांमध्ये अधिग्रहणाद्वारे पाणी...तालुक्यातील २५ गावात अधिग्रहण करण्यात आले आहे. हासरणी, काळेगांव, मुळकी,देवकरा, उणी, उमरगा कोर्ट, टाकळगाव, कामखेड, टाकळगाव, कौडगाव, मोळवण, सुनेगाव शेंद्री, वळसंगी, विजयनगर तांडा, धसवाडी, शिवाजीनगर तांडा, कोपनरवाडी, खरकाडीतांडा, अजनी वाडी दगडवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयाने अधिग्रहणाचा प्रस्ताव पंचायत समितीकडे दिला आहे. अधिग्रहणासाठी गावात स्त्रोतही शिल्लक नसल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, यासाठी टेंभूर्णी या गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

आवश्यकतेनुसार टँकरने देणार पाणी...पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोलकुमार आंदेलवाड म्हणाले, अधिग्रहण व टँकरची मागणी होताच दोन दिवसांत पाहणी करुन अधिग्रहण करण्यात येत आहे. अधिग्रहणासाठी तालुक्यातून ५७ प्रस्ताव दाखल झाले होते. त्यातील २५ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. नव्याने दाखल होत असलेले प्रस्ताव तात्काळ मंजुरीसाठी तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात येत आहेत. पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरwater shortageपाणीकपात