शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
9
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
10
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
11
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
12
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
13
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
14
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
15
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
16
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
17
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
18
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
19
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
20
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?

पाणीटंचाईचे चटके; अहमदपूरात २५ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा

By संदीप शिंदे | Updated: March 20, 2024 16:07 IST

एक टँकर सुरु : पंचायत समितीकडे टंचाई निवारणासाठी येताहेत प्रस्ताव

अहमदपूर : तालुक्यात मार्चच्या महिन्यात पाणीटंचाईचे चटके वाढले असून, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी हातपंपावर पाण्यासाठी गर्दी होत आहे. ग्रामस्थांना पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच सर्वाधिक टंचाईच्या झळा अहमदपूर तालुक्याला सुरू झाल्या आहेत. पंचायत समितीला एकूण ५७ अधिग्रहण प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यापैकी ४७ अधिग्रहणाचे प्रस्ताव तहसीलला पाठविण्यात आले आहे. अधिग्रहण मंजुरी २५ आदेश प्राप्त झाले असून, त्यापैकी २५ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा होत असून, एक टँकरही सुरु करण्यात आले आहे.

तालुक्यातील फुलसेवाडी येथे टँकरची मागणी करण्यात आली असून, बालाघाटच्या डोंगररांगेत वसलेल्या अहमदपूर तालुक्यात दरवर्षी पाऊस इतर तालुक्याच्या तुलनेत कमी असतो. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा उन्हाळ्यात सर्वाधिक असतात. मार्च महिन्यात ग्रामीण भागातून पाणीटंचाईची ओरड सुरू झाली आहे. त्यामुळे टँकर व अधिग्रहणाची मागणी होत आहे. टंचाईत उपाययोजना करण्यासाठी पंचायत समितीने १६८ गावे वाड्या, तांड्यासाठी ६ कोटी ७४ लाखांचा आराखडा तयार केला आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात टंचाईच्या झळा तालुक्याला सुरु होतात. यंदा मात्र गतवर्षीच्या परतीच्या पावसामुळे महिनाभर नागरिकांना दिलासा मिळाला होता. आता मात्र २५ ते ३० गावांत टंचाईच्या झळा वाढल्या आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी १ कोटी ३३ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला होता. जानेवारी ते मार्चपर्यंत टंचाईवर उपयोजना करण्यासाठी १ कोटी ९७ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला होता. एप्रिल ते जूनपर्यंत टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी १ कोटी ४३ लाखाचा आराखडा तयार करून पाठविण्यात आला होता. प्रशासन उपाययोजना करण्यासाठी कामाला लागले आहे. टंचाई सदृश्य गावात उपाययोजनांसाठी ग्रामस्थांचे पंचायत समितीला खेटे वाढले आहेत. पंचायत समितीकडे प्रस्ताव आल्यावर संबंधित गावची पाहणी करून तात्काळ उपायोजना केल्या जात असल्याचे पंचायत समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या गावांमध्ये अधिग्रहणाद्वारे पाणी...तालुक्यातील २५ गावात अधिग्रहण करण्यात आले आहे. हासरणी, काळेगांव, मुळकी,देवकरा, उणी, उमरगा कोर्ट, टाकळगाव, कामखेड, टाकळगाव, कौडगाव, मोळवण, सुनेगाव शेंद्री, वळसंगी, विजयनगर तांडा, धसवाडी, शिवाजीनगर तांडा, कोपनरवाडी, खरकाडीतांडा, अजनी वाडी दगडवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयाने अधिग्रहणाचा प्रस्ताव पंचायत समितीकडे दिला आहे. अधिग्रहणासाठी गावात स्त्रोतही शिल्लक नसल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, यासाठी टेंभूर्णी या गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

आवश्यकतेनुसार टँकरने देणार पाणी...पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोलकुमार आंदेलवाड म्हणाले, अधिग्रहण व टँकरची मागणी होताच दोन दिवसांत पाहणी करुन अधिग्रहण करण्यात येत आहे. अधिग्रहणासाठी तालुक्यातून ५७ प्रस्ताव दाखल झाले होते. त्यातील २५ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. नव्याने दाखल होत असलेले प्रस्ताव तात्काळ मंजुरीसाठी तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात येत आहेत. पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरwater shortageपाणीकपात