शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

पाणीटंचाईचे चटके; अहमदपूरात २५ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा

By संदीप शिंदे | Updated: March 20, 2024 16:07 IST

एक टँकर सुरु : पंचायत समितीकडे टंचाई निवारणासाठी येताहेत प्रस्ताव

अहमदपूर : तालुक्यात मार्चच्या महिन्यात पाणीटंचाईचे चटके वाढले असून, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी हातपंपावर पाण्यासाठी गर्दी होत आहे. ग्रामस्थांना पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच सर्वाधिक टंचाईच्या झळा अहमदपूर तालुक्याला सुरू झाल्या आहेत. पंचायत समितीला एकूण ५७ अधिग्रहण प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यापैकी ४७ अधिग्रहणाचे प्रस्ताव तहसीलला पाठविण्यात आले आहे. अधिग्रहण मंजुरी २५ आदेश प्राप्त झाले असून, त्यापैकी २५ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा होत असून, एक टँकरही सुरु करण्यात आले आहे.

तालुक्यातील फुलसेवाडी येथे टँकरची मागणी करण्यात आली असून, बालाघाटच्या डोंगररांगेत वसलेल्या अहमदपूर तालुक्यात दरवर्षी पाऊस इतर तालुक्याच्या तुलनेत कमी असतो. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा उन्हाळ्यात सर्वाधिक असतात. मार्च महिन्यात ग्रामीण भागातून पाणीटंचाईची ओरड सुरू झाली आहे. त्यामुळे टँकर व अधिग्रहणाची मागणी होत आहे. टंचाईत उपाययोजना करण्यासाठी पंचायत समितीने १६८ गावे वाड्या, तांड्यासाठी ६ कोटी ७४ लाखांचा आराखडा तयार केला आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात टंचाईच्या झळा तालुक्याला सुरु होतात. यंदा मात्र गतवर्षीच्या परतीच्या पावसामुळे महिनाभर नागरिकांना दिलासा मिळाला होता. आता मात्र २५ ते ३० गावांत टंचाईच्या झळा वाढल्या आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी १ कोटी ३३ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला होता. जानेवारी ते मार्चपर्यंत टंचाईवर उपयोजना करण्यासाठी १ कोटी ९७ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला होता. एप्रिल ते जूनपर्यंत टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी १ कोटी ४३ लाखाचा आराखडा तयार करून पाठविण्यात आला होता. प्रशासन उपाययोजना करण्यासाठी कामाला लागले आहे. टंचाई सदृश्य गावात उपाययोजनांसाठी ग्रामस्थांचे पंचायत समितीला खेटे वाढले आहेत. पंचायत समितीकडे प्रस्ताव आल्यावर संबंधित गावची पाहणी करून तात्काळ उपायोजना केल्या जात असल्याचे पंचायत समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या गावांमध्ये अधिग्रहणाद्वारे पाणी...तालुक्यातील २५ गावात अधिग्रहण करण्यात आले आहे. हासरणी, काळेगांव, मुळकी,देवकरा, उणी, उमरगा कोर्ट, टाकळगाव, कामखेड, टाकळगाव, कौडगाव, मोळवण, सुनेगाव शेंद्री, वळसंगी, विजयनगर तांडा, धसवाडी, शिवाजीनगर तांडा, कोपनरवाडी, खरकाडीतांडा, अजनी वाडी दगडवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयाने अधिग्रहणाचा प्रस्ताव पंचायत समितीकडे दिला आहे. अधिग्रहणासाठी गावात स्त्रोतही शिल्लक नसल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, यासाठी टेंभूर्णी या गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

आवश्यकतेनुसार टँकरने देणार पाणी...पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोलकुमार आंदेलवाड म्हणाले, अधिग्रहण व टँकरची मागणी होताच दोन दिवसांत पाहणी करुन अधिग्रहण करण्यात येत आहे. अधिग्रहणासाठी तालुक्यातून ५७ प्रस्ताव दाखल झाले होते. त्यातील २५ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. नव्याने दाखल होत असलेले प्रस्ताव तात्काळ मंजुरीसाठी तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात येत आहेत. पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरwater shortageपाणीकपात