शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

खंडित वीजपुरवठ्याने लातूरात पाणी पुरवठा ठप्प; ४ दिवसांआड पाण्याचे वेळापत्रक कोलमडले!

By हणमंत गायकवाड | Updated: May 4, 2023 17:59 IST

धनेगाव येथील मांजरा प्रकल्पावर पाणी उचलण्यासाठी जे पंप आहेत, त्या पंपांना सुरळीत वीजपुरवठा होत नाही.

लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पावरील वीज पुरवठ्यामध्ये वारंवार बिघाड होत असल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. चार दिवसांआड पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकच कोलमडले आहे. यामुळे लातूर शहरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. 

गेल्या १६ एप्रिलपासून वीजपुरवठ्यात व्यत्यय येत असल्याने पाणीपुरवठ्यात व्यत्यय होत आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे. धनेगाव येथील मांजरा प्रकल्पावर पाणी उचलण्यासाठी जे पंप आहेत, त्या पंपांना सुरळीत वीजपुरवठा होत नाही. मुरुड सबस्टेशन ते धनेगाव सबस्टेशनपर्यंत सारखा बिघाड होत आहे. वाऱ्यामुळे तारा तुटत आहेत. तसेच इन्क्युबिलेटर यामुळे खराब झालेले आहे. परिणामी, पाणी उपसा करता येत नाही. यामुळे लातूर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून नियमित चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु, वीजपुरवठ्यात व्यत्यय येत असल्याने चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. आता आठ दिवसांच्या वर कालावधी लागत आहे.

दररोज ६० एमएलडी पाण्याची उचलमांजरा धरणातून लातूर शहरासाठी दररोज ५० ते ६० एमएलडी पाणी उचलले जाते. या पाण्याचे हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रावर शुद्धीकरण होऊन लातूर शहरातील नऊ जलकुंभांवरून वितरण होते. परंतु, वादळी वाऱ्यामुळे मुरुड सबस्टेशन ते धनेगाव सबस्टेशनपर्यंत सातत्याने बिघाड होत आहे. या तांत्रिक बिघाडामुळे धनेगाव येथून पाणी उचलण्यास अडथळा होत आहे. मागच्या शनिवारी हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला होता. मात्र, त्यानंतरही बिघाड झाल्याने पाणी वितरण कोलमडले आहे.

महावितरणकडून दुरुस्ती सुरूमहावितरणकडून मुरुड सबस्टेशन ते धनेगाव सबस्टेशनपर्यंत दुरुस्ती, शिवाय जे साहित्य जळाले आहे ते साहित्य बदलले जात आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. बुधवारी रात्री दुरुस्ती केल्यानंतर पाणी उचलण्यात आले होते. त्यातून शहरातील काही भागात पाणी सोडण्यात आले, असे लातूर मनपातील पाणी वितरण प्रमुख जलील शेख यांनी सांगितले.

नागरिकांनी सहकार्य करावंवादळी वाऱ्यामुळे वीज तारा तुटत आहेत. शिवाय, वाऱ्यामुळे तारा घर्षण होऊन वीजपुरवठा खंडित होत आहे. या समस्यांमुळे मांजरा धरणावरून पाणी उचलण्यासाठी अडथळा येत आहे. जशी लाईट येईल तसे पाणी उचलले जात आहे. त्यानुसार लातूर शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांनी होत असलेल्या गैरसोयीबद्दल सहकार्य करावे. - जलील शेख, पाणी वितरण प्रमुख, लातूर मनपा.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी