शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

लातूर जिल्ह्यातील १९ गावांत पाणीटंचाईच्या झळा; ग्रामस्थांना टँकर मंजुरीची प्रतीक्षा

By sandeep.bhalerao | Updated: April 5, 2023 19:10 IST

पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत

लातूर : जिल्ह्यात एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाच्या चटक्यासोबतच प्रकल्प, विहिरी, विंधन विहिरीची पाणीपातळी खालावत चालली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील १९ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, या गावांनी पंचायत समिती स्तरावर अधिग्रहणाचे २१ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. मात्र, प्रशासनाकडून अजून एकही प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांना टँकर मंजुरीची प्रतीक्षा लागली आहे.

जिल्ह्यातील १८ गावे व १ वाडी मिळून १९ गावांत पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे २१ प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर दाखल करण्यात आले आहेत. पंचायत समितीकडून तहसील कार्यालयाकडूून ८ गावे व १ वाडी असे ९ प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत उपविभागीय अधिकारी यांच्याकडून एकाही प्रस्तावास मंजुरी देण्यात आलेली नाही. या कार्यालयाकडून या गावात पाणीटंचाई आहे का याची तपासणी केली जात आहे. तपासणीअंती या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या तालुक्यातून प्रस्ताव दाखल...लातूर तालुक्यातील १ वाडी आणि औसा तालुक्यातील २ गावे, निलंगा ३, अहमदपूर १० तर जळकोट तालुक्यातील ३ अशी १८ गावे व १ वाडी मिळून १९ गावांतून २१ प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करण्यात आलेले आहेत. पंचायत समितीकडून हे प्रस्ताव तहसील प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत. या प्रस्तावाची चौकशी झाल्यानंतर मंजुरी देण्यात येणार आहे.

या तालुक्यात पाणीटंचाई नाही...जिल्ह्यातील रेणापूर, चाकूर, शिरुर अनंतपाळ, उदगीर व देवणी तालुक्यात सद्यस्थितीत पाणी टंचाईचा एकही प्रस्ताव दाखल झालेला नाही. गतवर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस बरसला होता. त्यामुळे प्रकल्प पाण्याने ओसंडून वाहू लागले होते. नदी-नाल्यांनाही पाणी होते. विहिरी व विंधन विहिरीच्या पाणीपातळीत चांगली वाढ झाली होती. त्यामुळे आतापर्यंत पाणीटंचाईची समस्या निर्माण झालेली नाही. केवळ १९ गावांत पाण्याची समस्या आहे. मात्र, यावर्षी टँकरने पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता भासणार नसल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी