शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाबरोबर पाणीटंचाई वाढली; लातूर जिल्ह्यातील ७१ गावांच्या घशाला काेरड!

By हरी मोकाशे | Updated: February 8, 2024 17:57 IST

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पर्जन्यमान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांसह ओढे- नाले वाहिले नाहीत.

लातूर : चार दिवसांपासून कमाल तापमानात अल्पशी वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हं अधिक प्रमाणात जाणवू लागले आहे. वाढत्या उन्हाबरोबर आता पाणीटंचाईही वाढत आहे. जिल्ह्यातील ७१ गावे व वाड्यांनी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठ्यासाठी ९२ प्रस्ताव दाखल केले आहेत. दरम्यान, तीन गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पर्जन्यमान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांसह ओढे- नाले वाहिले नाहीत. परिणामी, मध्यम व लघु प्रकल्पात अपेक्षित प्रमाणात जलसाठा झाला नाही. शिवाय, विहिरी, कुपनलिकांच्या पाणीपातळीतही वाढ झाली नाही. यंदा लवकरच पाणीटंचाई जाणवण्याची भीती व्यक्त करीत जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारण आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या. त्याचबरोबर जिल्ह्यातील जलसाठे आरक्षित करण्यात आले आहेत. अवैधरित्या पाणी उपसा करण्यात येत असल्याचे आढळून आल्यास प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येत आहे.

अहमदपूर तालुक्यास सर्वाधिक टंचाईचे चटके...तालुका - प्रस्तावलातूर - १७औसा - २४निलंगा - १०रेणापूर - ४अहमदपूर - ३३शिरुर अनं. - १उदगीर - १देवणी - १जळकोट - १एकूण - ९२

पंचायत समितीकडून तहसीलकडे प्रस्ताव...पाणीटंचाई निवारणार्थ ६१ गाव आणि १० वाडी- तांड्यांचे एकूण ९२ प्रस्ताव ग्रामपंचायतींनी पंचायत समितीकडे सादर केले आहेत. दरम्यान, पंचायत समितीने पाहणी करुन तीन प्रस्ताव वगळले. त्यातील ४० गावे आणि ८ वाड्यांचे एकूण ५८ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे पाठविले आहेत. तहसीलदारांच्या मंजुरीनंतर तिथे अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे व पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

लातुरातील दोन गावांसाठी अधिग्रहण...सध्या लातूर तालुक्यातील दोन गावांना आणि उदगीर तालुक्यातील एका गावास अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. उर्वरित प्रस्तावांना मंजुरीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. विशेष म्हणजे, चाकूर तालुक्यातील एकाही गावास अद्यापही पाणीटंचाई जाणवत नाही.

चार गावांची टँकरची मागणी...जिल्ह्यातील लामजना (ता. औसा), टेंभूर्णी (ता. अहमदपूर), येलदरा (ता. जळकोट) आणि चिंचोली ब. (ता. लातूर) या चार गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. या गावाच्या एक किमीच्या परिसरात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायतींनी प्रस्तावाद्वारे केली आहे.

तीन तालुक्यांत पाणीसमस्या अधिक...जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील २७ गावे आणि ६ वाड्यांना पाणीटंचाई जाणवत आहे. त्यापाठोपाठ औसा तालुक्यातील १० गावे आणि चार वाड्या, लातूर तालुक्यातील १० गावांत पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. निलंग्यातील ६ तर रेणापुरातील ४ गावांच्या घशाला काेरड पडली आहे.

 

टॅग्स :laturलातूरwater scarcityपाणी टंचाईAgriculture Sectorशेती क्षेत्र