शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाबरोबर पाणीटंचाई वाढली; लातूर जिल्ह्यातील ७१ गावांच्या घशाला काेरड!

By हरी मोकाशे | Updated: February 8, 2024 17:57 IST

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पर्जन्यमान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांसह ओढे- नाले वाहिले नाहीत.

लातूर : चार दिवसांपासून कमाल तापमानात अल्पशी वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हं अधिक प्रमाणात जाणवू लागले आहे. वाढत्या उन्हाबरोबर आता पाणीटंचाईही वाढत आहे. जिल्ह्यातील ७१ गावे व वाड्यांनी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठ्यासाठी ९२ प्रस्ताव दाखल केले आहेत. दरम्यान, तीन गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पर्जन्यमान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांसह ओढे- नाले वाहिले नाहीत. परिणामी, मध्यम व लघु प्रकल्पात अपेक्षित प्रमाणात जलसाठा झाला नाही. शिवाय, विहिरी, कुपनलिकांच्या पाणीपातळीतही वाढ झाली नाही. यंदा लवकरच पाणीटंचाई जाणवण्याची भीती व्यक्त करीत जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारण आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या. त्याचबरोबर जिल्ह्यातील जलसाठे आरक्षित करण्यात आले आहेत. अवैधरित्या पाणी उपसा करण्यात येत असल्याचे आढळून आल्यास प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येत आहे.

अहमदपूर तालुक्यास सर्वाधिक टंचाईचे चटके...तालुका - प्रस्तावलातूर - १७औसा - २४निलंगा - १०रेणापूर - ४अहमदपूर - ३३शिरुर अनं. - १उदगीर - १देवणी - १जळकोट - १एकूण - ९२

पंचायत समितीकडून तहसीलकडे प्रस्ताव...पाणीटंचाई निवारणार्थ ६१ गाव आणि १० वाडी- तांड्यांचे एकूण ९२ प्रस्ताव ग्रामपंचायतींनी पंचायत समितीकडे सादर केले आहेत. दरम्यान, पंचायत समितीने पाहणी करुन तीन प्रस्ताव वगळले. त्यातील ४० गावे आणि ८ वाड्यांचे एकूण ५८ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे पाठविले आहेत. तहसीलदारांच्या मंजुरीनंतर तिथे अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे व पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

लातुरातील दोन गावांसाठी अधिग्रहण...सध्या लातूर तालुक्यातील दोन गावांना आणि उदगीर तालुक्यातील एका गावास अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. उर्वरित प्रस्तावांना मंजुरीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. विशेष म्हणजे, चाकूर तालुक्यातील एकाही गावास अद्यापही पाणीटंचाई जाणवत नाही.

चार गावांची टँकरची मागणी...जिल्ह्यातील लामजना (ता. औसा), टेंभूर्णी (ता. अहमदपूर), येलदरा (ता. जळकोट) आणि चिंचोली ब. (ता. लातूर) या चार गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. या गावाच्या एक किमीच्या परिसरात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायतींनी प्रस्तावाद्वारे केली आहे.

तीन तालुक्यांत पाणीसमस्या अधिक...जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील २७ गावे आणि ६ वाड्यांना पाणीटंचाई जाणवत आहे. त्यापाठोपाठ औसा तालुक्यातील १० गावे आणि चार वाड्या, लातूर तालुक्यातील १० गावांत पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. निलंग्यातील ६ तर रेणापुरातील ४ गावांच्या घशाला काेरड पडली आहे.

 

टॅग्स :laturलातूरwater scarcityपाणी टंचाईAgriculture Sectorशेती क्षेत्र