शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

लातूर जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती; रविराजाच्या रौद्ररुपामुळे टंचाईची दाहकता वाढली

By हरी मोकाशे | Updated: May 17, 2023 18:55 IST

वाढत्या उन्हामुळे पाणीटंचाई वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील ८५ गावांत पाण्याची समस्या निर्माण झाली आहे

लातूर : रविराजा दिवसेंदिवस रौद्ररुप धारण करीत आहे. त्यामुळे दुपारच्यावेळी अंगाची लाही- लाही होत आहे. वाढत्या उन्हामुळे जलसाठे आटू लागले आहेत. परिणामी, पाणीटंचाईच्या झळा वाढत आहेत. सध्या जिल्ह्यातील ८५ गावे व वाड्यांना पाणीटंचाईचे चटके जाणवत आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून अधिग्रहणाद्वारे ६२ गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील मध्यम, लघु प्रकल्पांसह नदी, नाले तुडुंब भरले होते. परिणामी, यंदाच्या उन्हाळ्यात कमी प्रमाणात पाणीटंचाई जाणवेल, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला. जलसाठे भरल्यामुळे रबी हंगामाचा पेराही वाढून हरभऱ्याचे उत्पादन वाढले. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळाला.

दरम्यान, यंदाच्या मार्चअखेरपासूनच उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली. एप्रिलपासून तर उष्णतेमुळे जीवाची काहिली होण्यास सुरुवात झाली. वाढत्या उन्हामुळे कमाल तापमान वाढून पारा ४२ अं.से. च्या वर पोहोचला. परिणामी, जलसाठ्यातील पाण्याच्या बाष्पीभवनात वाढ झाली आहे. त्यामुळे जलसाठ्यांतील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे.

८५ गावांवर पाणीटंचाई ढग...

वाढत्या उन्हामुळे पाणीटंचाई वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील ८५ गावांत पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यात ६२ गावे आणि २३ वाड्यांचा समावेश आहे. सर्वाधिक टंचाई अहमदपूर तालुक्यात जाणवत असून ३२ अशी संख्या आहे. लातूर तालुक्यात ५, औसा- २२, निलंगा- ८, रेणापूर- ३, चाकूर- ३, उदगीर- ३, जळकोट तालुक्यातील ९ गावांत टंचाई आहे.

६३ गावांना अधिग्रहणाचे पाणी...जिल्ह्यातील ८५ गावांनी अधिग्रहणासाठी प्रस्ताव दाखल केले होते. त्याची तपासणी होऊन ते तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आले होते. मंजुरीनंतर ६२ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. त्यात लातूर तालुका- २, औसा- १८, निलंगा- ३, रेणापूर- १, अहमदपूर- २८, चाकूर- २, उदगीर- ३, जळकोट तालुक्यातील ५ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे.

अवकाळीमुळे बंधाऱ्यात जलसाठा...

गेल्या महिनाभराच्या कालावधीत सातत्याने अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे औराद शहाजानी परिसरातील तेरणा आणि मांजरा नद्यांना काही प्रमाणात जलसंचय झाला. तसेच कोल्हापुरी आणि उच्चस्तरीय बंधाऱ्यांत ही जलसाठा झाला. अवकाळीमुळे पीक, फळबागांचे नुकसान झाले. मात्र, काही प्रमाणात पाणीसाठा होऊन टंचाई कमी होण्यास मदत झाली आहे.

अद्याप टँकर नाही...जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ आणि देवणी तालुक्यातील एकाही गावास पाणीटंचाई जाणवत नाही. त्यामुळे अधिग्रहणासाठी एकही प्रस्ताव दाखल नाही. तसेच जिल्ह्यात कुठलेही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु नाही. अधिग्रहणाद्वारे पाणी उपलब्ध करुन देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरु आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी