शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

लातूर जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती; रविराजाच्या रौद्ररुपामुळे टंचाईची दाहकता वाढली

By हरी मोकाशे | Updated: May 17, 2023 18:55 IST

वाढत्या उन्हामुळे पाणीटंचाई वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील ८५ गावांत पाण्याची समस्या निर्माण झाली आहे

लातूर : रविराजा दिवसेंदिवस रौद्ररुप धारण करीत आहे. त्यामुळे दुपारच्यावेळी अंगाची लाही- लाही होत आहे. वाढत्या उन्हामुळे जलसाठे आटू लागले आहेत. परिणामी, पाणीटंचाईच्या झळा वाढत आहेत. सध्या जिल्ह्यातील ८५ गावे व वाड्यांना पाणीटंचाईचे चटके जाणवत आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून अधिग्रहणाद्वारे ६२ गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील मध्यम, लघु प्रकल्पांसह नदी, नाले तुडुंब भरले होते. परिणामी, यंदाच्या उन्हाळ्यात कमी प्रमाणात पाणीटंचाई जाणवेल, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला. जलसाठे भरल्यामुळे रबी हंगामाचा पेराही वाढून हरभऱ्याचे उत्पादन वाढले. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळाला.

दरम्यान, यंदाच्या मार्चअखेरपासूनच उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली. एप्रिलपासून तर उष्णतेमुळे जीवाची काहिली होण्यास सुरुवात झाली. वाढत्या उन्हामुळे कमाल तापमान वाढून पारा ४२ अं.से. च्या वर पोहोचला. परिणामी, जलसाठ्यातील पाण्याच्या बाष्पीभवनात वाढ झाली आहे. त्यामुळे जलसाठ्यांतील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे.

८५ गावांवर पाणीटंचाई ढग...

वाढत्या उन्हामुळे पाणीटंचाई वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील ८५ गावांत पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यात ६२ गावे आणि २३ वाड्यांचा समावेश आहे. सर्वाधिक टंचाई अहमदपूर तालुक्यात जाणवत असून ३२ अशी संख्या आहे. लातूर तालुक्यात ५, औसा- २२, निलंगा- ८, रेणापूर- ३, चाकूर- ३, उदगीर- ३, जळकोट तालुक्यातील ९ गावांत टंचाई आहे.

६३ गावांना अधिग्रहणाचे पाणी...जिल्ह्यातील ८५ गावांनी अधिग्रहणासाठी प्रस्ताव दाखल केले होते. त्याची तपासणी होऊन ते तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आले होते. मंजुरीनंतर ६२ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. त्यात लातूर तालुका- २, औसा- १८, निलंगा- ३, रेणापूर- १, अहमदपूर- २८, चाकूर- २, उदगीर- ३, जळकोट तालुक्यातील ५ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे.

अवकाळीमुळे बंधाऱ्यात जलसाठा...

गेल्या महिनाभराच्या कालावधीत सातत्याने अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे औराद शहाजानी परिसरातील तेरणा आणि मांजरा नद्यांना काही प्रमाणात जलसंचय झाला. तसेच कोल्हापुरी आणि उच्चस्तरीय बंधाऱ्यांत ही जलसाठा झाला. अवकाळीमुळे पीक, फळबागांचे नुकसान झाले. मात्र, काही प्रमाणात पाणीसाठा होऊन टंचाई कमी होण्यास मदत झाली आहे.

अद्याप टँकर नाही...जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ आणि देवणी तालुक्यातील एकाही गावास पाणीटंचाई जाणवत नाही. त्यामुळे अधिग्रहणासाठी एकही प्रस्ताव दाखल नाही. तसेच जिल्ह्यात कुठलेही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु नाही. अधिग्रहणाद्वारे पाणी उपलब्ध करुन देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरु आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी