शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

हासोरीसह सहा गावांत भुगर्भातून आवाज; निलंगा तालुक्यातील आठ दिवसांत तिसरी घटना 

By आशपाक पठाण | Updated: September 13, 2022 00:04 IST

परिसरातील लोक भयभीत झाले असून भूकंप असल्याच्या भीतीने लोक रस्त्यावर रात्र काढत आहेत.

निलंगा (जि. लातूर) : तालुक्यातील हासोरीसह सहा गावात सोमवारी रात्री १० वाजून ७ मिनिटाला पुन्हा जमीनीतून आवाज आला. त्यामुळे परिसरातील लोक भयभीत झाले असून भूकंप असल्याच्या भीतीने लोक रस्त्यावर रात्र काढत आहेत. प्रशासन मात्र भूकंप नसल्याचा दावा करून हात झटकून मोकळे होत आहेत. प्रशासनाने गांभीर्याने या घटनेची दखल घ्यायला हवी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

मागील आठ दिवसांत तिसर्यांदा हा प्रकार घडला आहे. हासोरी गाव परिसरातील गावात ६ व ८ सप्टेंबरला भूगर्भातून आवाज येऊन भूकंप झाले असल्याचे जाणवल्याची माहिती गावकऱ्यांनी प्रशासनाला दिली असता लातूर येथील भूगर्भ शास्त्रज्ञांनी भेट देऊन लोकांशी चर्चा केली. हा भूकंप नाही, तशी कोणतीही नोंद झालेली नाही. त्यामुळे लोकांनी घाबरू नये असे सांगितले. पण सोमवारी रात्री १०.०७ वाजता मोठा आवाज झाल्याने लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर येऊन आरडाओरड करीत आहेत.

भूगर्भातील आवाज घरात झोपू देईना, पाऊस घराबाहेर पडू देईना !

लोक भीतीपोटी घरी झोपायला तयार नाहीत. वारंवार पाऊस चालू असल्याने बाहेर ही झोपू शकत नाहीत व भूगर्भातील आवाजामुळे घरात ही झोपू शकत नाही अशा अवस्थेत अर्धेगाव जागी राहून एकमेकाचे राखण करीत आहे. सोमवारी रात्री हासोरीसह ऊस्तूरी, बडूर, हरी जवळगा, भूतमुगळी, बोळेगाव या गावातही आवाज जाणवला असल्याची माहिती ज्ञानेश्वर बरमदे यांनी दिली. नक्की हा काय प्रकार होत आहे यासाठी तज्ञ लोकांना पाचारण करणे गरजेचे आहे, अशी मागणी हासोरीच्या नागरिकांनी केली आहे. मागील आठ दिवसांत तिसर्यांदा हा प्रकार झाला असल्याचे नागरिकांनी सांगितले. 

टॅग्स :laturलातूर