शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

इथेनॉलवर वाहने धावणार; कारखान्यांनी निर्मिती वाढवावी! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

By संदीप शिंदे | Updated: February 23, 2024 18:22 IST

ऊसाला भाव, शेतकऱ्यांची सुबत्ता येणार!

संदीप शिंदे, अहमदपूर (जि.लातूर) : लवकरच इथेनॉलवर धावणारी वाहने बाजारपेठेत येणार आहेत. त्यामुळे इथेनॉलला प्रचंड मागणी राहील. त्यासाठी साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती वाढवावी. ज्यामुळे ऊसाला अधिकचा भाव देणे शक्य होईल. त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता वाढेल आणि तो अन्नदात्याबरोबरच उर्जादाताही होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे शुक्रवारी केले.

अहमदपूर येथील राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज भक्तीस्थळ येथे आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम व तीन महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. मंचावर क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, खा. सुधाकर श्रृंगारे, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, आ. बाबासाहेब पाटील, आ. रमेश कराड, आ. अभिमन्यू पवार, आ. रत्नाकर गुट्टे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, वीरमठ संस्थानचे मठाधिपती राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज, आचार्य गुरुराज स्वामी आदी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, नागपूर-लातूर-रत्नागिरी महामार्गासाठी जवळपास ३० हजार कोटी खर्च झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र यांना महामार्गाने जोडले आहे. तसेच तीन शक्तीपीठांना जोडणारा हा महामार्ग आहे.

हेलिकॉप्टरमधून पाहिले, सर्व नद्या कोरड्या...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, आपण हेलिकॉप्टरने येताना सर्व नद्या कोरड्या असल्याचे पाहिले. तिथे पाणी अडविण्याचे काम व्हायला हवे होते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आहेत. या कारखाना व्यवस्थापनांनी जलसंधारणाची कामे हाती घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे कारखानदारी यशस्वी होईल आणि पाणीपातळीही वाढेल. नागरीकांसह लोकप्रतिनीधींनी प्रथम पाण्याला पसंती द्यावी आणि जलसंधारणाच्या कामाकडे विशेष लक्ष द्यावे. आमच्या विभागाने या कामातून १८.७२ क्युबिक मीटर पाण्याचा साठा होईल, असे काम केले आहे. लातूर-टेंभूर्णी मार्गाच्या कामातील अडचणी दुर होत आहेत. हे काम लवकरच पुर्ण होईल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी