शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

इथेनॉलवर वाहने धावणार; कारखान्यांनी निर्मिती वाढवावी! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

By संदीप शिंदे | Updated: February 23, 2024 18:22 IST

ऊसाला भाव, शेतकऱ्यांची सुबत्ता येणार!

संदीप शिंदे, अहमदपूर (जि.लातूर) : लवकरच इथेनॉलवर धावणारी वाहने बाजारपेठेत येणार आहेत. त्यामुळे इथेनॉलला प्रचंड मागणी राहील. त्यासाठी साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती वाढवावी. ज्यामुळे ऊसाला अधिकचा भाव देणे शक्य होईल. त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता वाढेल आणि तो अन्नदात्याबरोबरच उर्जादाताही होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे शुक्रवारी केले.

अहमदपूर येथील राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज भक्तीस्थळ येथे आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम व तीन महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. मंचावर क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, खा. सुधाकर श्रृंगारे, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, आ. बाबासाहेब पाटील, आ. रमेश कराड, आ. अभिमन्यू पवार, आ. रत्नाकर गुट्टे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, वीरमठ संस्थानचे मठाधिपती राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज, आचार्य गुरुराज स्वामी आदी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, नागपूर-लातूर-रत्नागिरी महामार्गासाठी जवळपास ३० हजार कोटी खर्च झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र यांना महामार्गाने जोडले आहे. तसेच तीन शक्तीपीठांना जोडणारा हा महामार्ग आहे.

हेलिकॉप्टरमधून पाहिले, सर्व नद्या कोरड्या...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, आपण हेलिकॉप्टरने येताना सर्व नद्या कोरड्या असल्याचे पाहिले. तिथे पाणी अडविण्याचे काम व्हायला हवे होते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आहेत. या कारखाना व्यवस्थापनांनी जलसंधारणाची कामे हाती घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे कारखानदारी यशस्वी होईल आणि पाणीपातळीही वाढेल. नागरीकांसह लोकप्रतिनीधींनी प्रथम पाण्याला पसंती द्यावी आणि जलसंधारणाच्या कामाकडे विशेष लक्ष द्यावे. आमच्या विभागाने या कामातून १८.७२ क्युबिक मीटर पाण्याचा साठा होईल, असे काम केले आहे. लातूर-टेंभूर्णी मार्गाच्या कामातील अडचणी दुर होत आहेत. हे काम लवकरच पुर्ण होईल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी