शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

इथेनॉलवर वाहने धावणार; कारखान्यांनी निर्मिती वाढवावी! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

By संदीप शिंदे | Updated: February 23, 2024 18:22 IST

ऊसाला भाव, शेतकऱ्यांची सुबत्ता येणार!

संदीप शिंदे, अहमदपूर (जि.लातूर) : लवकरच इथेनॉलवर धावणारी वाहने बाजारपेठेत येणार आहेत. त्यामुळे इथेनॉलला प्रचंड मागणी राहील. त्यासाठी साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती वाढवावी. ज्यामुळे ऊसाला अधिकचा भाव देणे शक्य होईल. त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता वाढेल आणि तो अन्नदात्याबरोबरच उर्जादाताही होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे शुक्रवारी केले.

अहमदपूर येथील राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज भक्तीस्थळ येथे आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम व तीन महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. मंचावर क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, खा. सुधाकर श्रृंगारे, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, आ. बाबासाहेब पाटील, आ. रमेश कराड, आ. अभिमन्यू पवार, आ. रत्नाकर गुट्टे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, वीरमठ संस्थानचे मठाधिपती राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज, आचार्य गुरुराज स्वामी आदी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, नागपूर-लातूर-रत्नागिरी महामार्गासाठी जवळपास ३० हजार कोटी खर्च झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र यांना महामार्गाने जोडले आहे. तसेच तीन शक्तीपीठांना जोडणारा हा महामार्ग आहे.

हेलिकॉप्टरमधून पाहिले, सर्व नद्या कोरड्या...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, आपण हेलिकॉप्टरने येताना सर्व नद्या कोरड्या असल्याचे पाहिले. तिथे पाणी अडविण्याचे काम व्हायला हवे होते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आहेत. या कारखाना व्यवस्थापनांनी जलसंधारणाची कामे हाती घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे कारखानदारी यशस्वी होईल आणि पाणीपातळीही वाढेल. नागरीकांसह लोकप्रतिनीधींनी प्रथम पाण्याला पसंती द्यावी आणि जलसंधारणाच्या कामाकडे विशेष लक्ष द्यावे. आमच्या विभागाने या कामातून १८.७२ क्युबिक मीटर पाण्याचा साठा होईल, असे काम केले आहे. लातूर-टेंभूर्णी मार्गाच्या कामातील अडचणी दुर होत आहेत. हे काम लवकरच पुर्ण होईल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी