शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
2
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
5
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
6
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
7
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
8
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
9
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
10
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
11
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
12
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
13
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
15
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
16
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
17
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
18
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
20
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

जुलमी राजवटीविरुद्ध उत्कावासीयांचा लढा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:24 IST

उत्का : हैद्राबाद मुक्तीसंग्रामदिनी सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्याकडे वाटचाल करताना मराठवाड्यातील थोर स्वातंत्र्यसेनानींची प्रकर्षाने आठवण होते. त्याचवेळी जुलमी राजवटीविरुद्ध लातूर जिल्ह्यातील ...

उत्का : हैद्राबाद मुक्तीसंग्रामदिनी सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्याकडे वाटचाल करताना मराठवाड्यातील थोर स्वातंत्र्यसेनानींची प्रकर्षाने आठवण होते. त्याचवेळी जुलमी राजवटीविरुद्ध लातूर जिल्ह्यातील अनेक गावांनी दिलेला लढा समोर राहतो. त्यात औसा तालुक्यातील उत्कावासीय मागे नव्हते.

१९४५ ते १९४८ या कालखंडात निजाम राजवटीने अन्याय, अत्याचाराची परिसीमा गाठली होती. लूट, हत्या आणि स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांनी उन्माद माजविला होता. उत्का गावावरही दहशत होती. त्यावेळी लामजना येथे रझाकारांची कचेरी होती. तेथूनच परिसरातील नागरिकांंकडून दमदाटी करुन शेतसारा वसूल केला जात असे. त्या काळातील आठवणींना ८८ वर्षीय विश्वंभर अण्णाराव मुळे यांनी उजाळा दिला. ते म्हणाले, जेव्हा इच्छा होईल तेव्हा जुलमी राजवटीतील पोलीस गावात येऊन धुडगूस घालत. उत्का गाव मातीच्या बुरुजावर वसलेले होते. या बुरुजाच्या मधोमध संभाजी मुळे यांचा मोठा वाडा होता. संभाजी भाऊराव मुळे यांचे आजोबा सुभानराव मुळे यांच्या वडिलांच्या काळात तो बांधला असावा. दोन मजली वाडा ज्यावर दोनशे लोक एकत्र येऊ शकतील, असा भव्य होता. जणू गावाचा तो सुरक्षा कवच होता. वाड्यावर तोफ बसविण्यात आली होती. पुढे, जीर्ण झालेला हा वाडा १९८० च्या सुमारास मोडकळीस येऊन लोप पावला. ज्या-ज्या वेळी जुलमी पोलीस दाखल हाेत तेव्हा गावकरी वाड्याच्या आश्रयाला येत होते. अण्णाराव भाऊराव मुळे, नागोराव शिंदे, निळाेबा वरेकर, रामराव पाटील, संभाजी मुळे, केशव मुळे, केशव पाटील, बाबुराव पाटील, किशनराव पाटील यांनी गावपातळीवर जुलमी राजवटीविरुद्ध एल्गार पुकारला होता. एका प्रसंगात गावातील भव्य वाड्यावरून तरुणांनी गोफण गुंड्यांचा मारा करून रझाकारांना पळवून लावले हाेते. त्याचा बदला घेण्यासाठी निजाम राजवटीतील २०० सैनिक गावात आले होते. त्यावेळी सुटका होणे अवघड होते मात्र, अण्णाराव मुळे यांनी मैत्रीचे संबंध असलेल्या मुबारक यांच्याशी संवाद साधला. अण्णाराव मुळे व रामराव पाटील हे रातोरात घोड्यावरून औसा येथे गेले. तेथून मुबारक यांच्याकडून मदत घेतली आणि रझाकारांच्या परतीचे आदेश मिळविले. अशा अनेक उर्जा देणाऱ्या शूर कथा जिल्ह्यातील गावोगावी अनेकांनी रचल्या. त्या सर्व थोरांचे स्मरण आजच्या दिवशी होते, असे विश्वंभर मुळे सांगत होते.