शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

जुलमी राजवटीविरुद्ध उत्कावासीयांचा लढा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:24 IST

उत्का : हैद्राबाद मुक्तीसंग्रामदिनी सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्याकडे वाटचाल करताना मराठवाड्यातील थोर स्वातंत्र्यसेनानींची प्रकर्षाने आठवण होते. त्याचवेळी जुलमी राजवटीविरुद्ध लातूर जिल्ह्यातील ...

उत्का : हैद्राबाद मुक्तीसंग्रामदिनी सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्याकडे वाटचाल करताना मराठवाड्यातील थोर स्वातंत्र्यसेनानींची प्रकर्षाने आठवण होते. त्याचवेळी जुलमी राजवटीविरुद्ध लातूर जिल्ह्यातील अनेक गावांनी दिलेला लढा समोर राहतो. त्यात औसा तालुक्यातील उत्कावासीय मागे नव्हते.

१९४५ ते १९४८ या कालखंडात निजाम राजवटीने अन्याय, अत्याचाराची परिसीमा गाठली होती. लूट, हत्या आणि स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांनी उन्माद माजविला होता. उत्का गावावरही दहशत होती. त्यावेळी लामजना येथे रझाकारांची कचेरी होती. तेथूनच परिसरातील नागरिकांंकडून दमदाटी करुन शेतसारा वसूल केला जात असे. त्या काळातील आठवणींना ८८ वर्षीय विश्वंभर अण्णाराव मुळे यांनी उजाळा दिला. ते म्हणाले, जेव्हा इच्छा होईल तेव्हा जुलमी राजवटीतील पोलीस गावात येऊन धुडगूस घालत. उत्का गाव मातीच्या बुरुजावर वसलेले होते. या बुरुजाच्या मधोमध संभाजी मुळे यांचा मोठा वाडा होता. संभाजी भाऊराव मुळे यांचे आजोबा सुभानराव मुळे यांच्या वडिलांच्या काळात तो बांधला असावा. दोन मजली वाडा ज्यावर दोनशे लोक एकत्र येऊ शकतील, असा भव्य होता. जणू गावाचा तो सुरक्षा कवच होता. वाड्यावर तोफ बसविण्यात आली होती. पुढे, जीर्ण झालेला हा वाडा १९८० च्या सुमारास मोडकळीस येऊन लोप पावला. ज्या-ज्या वेळी जुलमी पोलीस दाखल हाेत तेव्हा गावकरी वाड्याच्या आश्रयाला येत होते. अण्णाराव भाऊराव मुळे, नागोराव शिंदे, निळाेबा वरेकर, रामराव पाटील, संभाजी मुळे, केशव मुळे, केशव पाटील, बाबुराव पाटील, किशनराव पाटील यांनी गावपातळीवर जुलमी राजवटीविरुद्ध एल्गार पुकारला होता. एका प्रसंगात गावातील भव्य वाड्यावरून तरुणांनी गोफण गुंड्यांचा मारा करून रझाकारांना पळवून लावले हाेते. त्याचा बदला घेण्यासाठी निजाम राजवटीतील २०० सैनिक गावात आले होते. त्यावेळी सुटका होणे अवघड होते मात्र, अण्णाराव मुळे यांनी मैत्रीचे संबंध असलेल्या मुबारक यांच्याशी संवाद साधला. अण्णाराव मुळे व रामराव पाटील हे रातोरात घोड्यावरून औसा येथे गेले. तेथून मुबारक यांच्याकडून मदत घेतली आणि रझाकारांच्या परतीचे आदेश मिळविले. अशा अनेक उर्जा देणाऱ्या शूर कथा जिल्ह्यातील गावोगावी अनेकांनी रचल्या. त्या सर्व थोरांचे स्मरण आजच्या दिवशी होते, असे विश्वंभर मुळे सांगत होते.