शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा लातूर जिल्ह्यातील १६० हेक्टरला तडाखा

By हरी मोकाशे | Updated: April 13, 2024 18:52 IST

पिकांच्या नुकसानीची कृषी विभागाकडून पाहणी सुरु

लातूर : गेल्या चार- पाच दिवसांपासून सातत्याने वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. त्याचा जिल्ह्यातील १६० हेक्टरवरील आंबा, द्राक्षे, केळीच्या बागांसह रबी ज्वारीस फटका असला आहे. दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून नुकसानीची पाहणी करण्यात येत आहे.

गत पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाले. त्यामुळे जलसाठ्यात वाढ झाली नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक उन्हाळा जाणवत असल्याने शेतकऱ्यांना केळी, द्राक्षे, आंब्याच्या फळबागा जोपासताना मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या जलस्त्रोत कोरडे पडत आहेत तर विहिरींनी तळ गाळला आहे. शिवाय, कुपनलिका बंद पडत आहेत. त्यामुळे काही शेतकरी अन्य शेतकऱ्यांकडून विकत घेऊन पाणी बागा जगवित असल्याचे पहावयास मिळत आहे.

गेल्या चार- पाच दिवसांपासून वातावरणात बदल होऊन सातत्याने अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे औसा, अहमदपूर, निलंगा, चाकूर, जळकोट, देवणी, रेणापूर, लातूरसह अन्य तालुक्यांतील फळबागांना फटका बसला आहे. काही ठिकाणीची काढणीस आलेली रबी ज्वारी भुईसपाट झाली आहे तर काही ठिकाणचा कडबा भिजला आहे.

भेटा येथे गारांचा पाऊस...शनिवारी सकाळी लातुरात १० मिनिटे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी ४ च्या सुमारास औसा तालुक्यातील भेटा परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. त्यामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांच्या शेतातील कडबा भिजला आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केली पाहणी...अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे गुरुवारी औसा तालुक्यातील नांदुर्गा व परिसरातील केळी, द्राक्ष, आंबा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच वादळी वाऱ्यामुळे फळझाडे उन्मळून पडली. या नुकसानीची पाहणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर.टी. जाधव यांनी शनिवारी केली. त्यांनी शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेऊन नुकसानीनंतरच्या व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच फळपीकविमा योजनेबद्दल माहिती दिली. यावेळी मंडळ कृषी अधिकारी ए.के. पिनाटे, कृषी सहाय्यक एम.जी. वाघमारे, तलाठी गहिरवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

हलका ते मध्यम पावसाची शक्यता...शुक्रवारी रात्रीपर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील १६० हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याची प्रत्यक्ष पाहणी करुन माहिती घेतली जात आहे. हवामान विभागाने तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा अवकाळी पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला आहे.- रमेश जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर