शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

अवकाळी पावसाचा लातूर जिल्ह्यातील १६० हेक्टरला तडाखा

By हरी मोकाशे | Updated: April 13, 2024 18:52 IST

पिकांच्या नुकसानीची कृषी विभागाकडून पाहणी सुरु

लातूर : गेल्या चार- पाच दिवसांपासून सातत्याने वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. त्याचा जिल्ह्यातील १६० हेक्टरवरील आंबा, द्राक्षे, केळीच्या बागांसह रबी ज्वारीस फटका असला आहे. दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून नुकसानीची पाहणी करण्यात येत आहे.

गत पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाले. त्यामुळे जलसाठ्यात वाढ झाली नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक उन्हाळा जाणवत असल्याने शेतकऱ्यांना केळी, द्राक्षे, आंब्याच्या फळबागा जोपासताना मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या जलस्त्रोत कोरडे पडत आहेत तर विहिरींनी तळ गाळला आहे. शिवाय, कुपनलिका बंद पडत आहेत. त्यामुळे काही शेतकरी अन्य शेतकऱ्यांकडून विकत घेऊन पाणी बागा जगवित असल्याचे पहावयास मिळत आहे.

गेल्या चार- पाच दिवसांपासून वातावरणात बदल होऊन सातत्याने अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे औसा, अहमदपूर, निलंगा, चाकूर, जळकोट, देवणी, रेणापूर, लातूरसह अन्य तालुक्यांतील फळबागांना फटका बसला आहे. काही ठिकाणीची काढणीस आलेली रबी ज्वारी भुईसपाट झाली आहे तर काही ठिकाणचा कडबा भिजला आहे.

भेटा येथे गारांचा पाऊस...शनिवारी सकाळी लातुरात १० मिनिटे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी ४ च्या सुमारास औसा तालुक्यातील भेटा परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. त्यामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांच्या शेतातील कडबा भिजला आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केली पाहणी...अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे गुरुवारी औसा तालुक्यातील नांदुर्गा व परिसरातील केळी, द्राक्ष, आंबा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच वादळी वाऱ्यामुळे फळझाडे उन्मळून पडली. या नुकसानीची पाहणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर.टी. जाधव यांनी शनिवारी केली. त्यांनी शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेऊन नुकसानीनंतरच्या व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच फळपीकविमा योजनेबद्दल माहिती दिली. यावेळी मंडळ कृषी अधिकारी ए.के. पिनाटे, कृषी सहाय्यक एम.जी. वाघमारे, तलाठी गहिरवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

हलका ते मध्यम पावसाची शक्यता...शुक्रवारी रात्रीपर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील १६० हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याची प्रत्यक्ष पाहणी करुन माहिती घेतली जात आहे. हवामान विभागाने तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा अवकाळी पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला आहे.- रमेश जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर