शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

अवकाळी पावसाचा लातूर जिल्ह्यातील १६० हेक्टरला तडाखा

By हरी मोकाशे | Updated: April 13, 2024 18:52 IST

पिकांच्या नुकसानीची कृषी विभागाकडून पाहणी सुरु

लातूर : गेल्या चार- पाच दिवसांपासून सातत्याने वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. त्याचा जिल्ह्यातील १६० हेक्टरवरील आंबा, द्राक्षे, केळीच्या बागांसह रबी ज्वारीस फटका असला आहे. दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून नुकसानीची पाहणी करण्यात येत आहे.

गत पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाले. त्यामुळे जलसाठ्यात वाढ झाली नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक उन्हाळा जाणवत असल्याने शेतकऱ्यांना केळी, द्राक्षे, आंब्याच्या फळबागा जोपासताना मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या जलस्त्रोत कोरडे पडत आहेत तर विहिरींनी तळ गाळला आहे. शिवाय, कुपनलिका बंद पडत आहेत. त्यामुळे काही शेतकरी अन्य शेतकऱ्यांकडून विकत घेऊन पाणी बागा जगवित असल्याचे पहावयास मिळत आहे.

गेल्या चार- पाच दिवसांपासून वातावरणात बदल होऊन सातत्याने अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे औसा, अहमदपूर, निलंगा, चाकूर, जळकोट, देवणी, रेणापूर, लातूरसह अन्य तालुक्यांतील फळबागांना फटका बसला आहे. काही ठिकाणीची काढणीस आलेली रबी ज्वारी भुईसपाट झाली आहे तर काही ठिकाणचा कडबा भिजला आहे.

भेटा येथे गारांचा पाऊस...शनिवारी सकाळी लातुरात १० मिनिटे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी ४ च्या सुमारास औसा तालुक्यातील भेटा परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. त्यामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांच्या शेतातील कडबा भिजला आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केली पाहणी...अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे गुरुवारी औसा तालुक्यातील नांदुर्गा व परिसरातील केळी, द्राक्ष, आंबा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच वादळी वाऱ्यामुळे फळझाडे उन्मळून पडली. या नुकसानीची पाहणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर.टी. जाधव यांनी शनिवारी केली. त्यांनी शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेऊन नुकसानीनंतरच्या व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच फळपीकविमा योजनेबद्दल माहिती दिली. यावेळी मंडळ कृषी अधिकारी ए.के. पिनाटे, कृषी सहाय्यक एम.जी. वाघमारे, तलाठी गहिरवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

हलका ते मध्यम पावसाची शक्यता...शुक्रवारी रात्रीपर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील १६० हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याची प्रत्यक्ष पाहणी करुन माहिती घेतली जात आहे. हवामान विभागाने तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा अवकाळी पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला आहे.- रमेश जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर