शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

निष्कृष्ट कामामुळे महामार्ग दुभंगला; भेगांमध्ये बेशरम लावून नागरिकांनी केला निषेध

By हरी मोकाशे | Updated: February 21, 2023 17:14 IST

लातूर- जहिराबाद महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. तसेच बहुतांश ठिकाणचे काम अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे.

निलंगा : लातूर- जहिराबाद महामार्गाचे काम हे निकृष्ट झाल्याने अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. त्यामुळे सतत अपघात होत आहेत. मुगाव ते ताजपूरपर्यंतचा महामार्ग त्वरित दुरुस्त करण्यात यावा, या मागणीसाठी मंगळवारी सकाळी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी महामार्गावर पडलेल्या भेगांमध्ये बेशरमाचे झाड लावून पूजन करीत निषेध व्यक्त केला.

लातूर- जहिराबाद महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. तसेच बहुतांश ठिकाणचे काम अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना ये- जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गावर भेगा पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पुलाचे अर्धवट काम, पर्यायी रस्ता तसेच भेगा पडलेल्या महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांसह निटूर सर्कलमधील नागरिकांनी मंगळवारी सकाळी अनोखे आंदोलन केले. महामार्गाच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. अर्धवट कामे पूर्ण न केल्यास अधिकाऱ्यांना खुर्चीला बांधण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके, मुगावचे सरपंच विशाल वाडीकर, हनुमंत पाटील, दत्तात्रय पिंड, सुनील कोळेकर, माधव रक्ताटे, जितेंद्र जाधव, हरी शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

पूलाचे काम पूर्ण करा...मसलगा दरम्यानचा अर्धवट असलेला पूल, बाभळगाव व तळीखेड परिसरातील रस्ता, औराद शहाजनी येथील रस्ता अतिशय खराब झाला आहे. त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.

टॅग्स :laturलातूरhighwayमहामार्ग