शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्प जोत्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:20 IST

गत पावसाळ्यात अति पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. मात्र, जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पासह लघु प्रकल्पात भरपूर पाणीसाठा झाला. ...

गत पावसाळ्यात अति पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. मात्र, जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पासह लघु प्रकल्पात भरपूर पाणीसाठा झाला. विहिरी, कुपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळे रबी हंगामाचा पेरा वाढला. तसेच नगदी पीक म्हणून शेतक-यांनी ऊसाची लागवड केली आहे. जिल्ह्यात अद्यापही पाणीटंचाई जाणवत नसली तरी वाढत्या उन्हांमुळे जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट होऊ लागली आहे. परिणामी, लघु तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे.

जिल्ह्यात एकूण ८ मध्यम प्रकल्प आहेत. त्यात लातूर तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्प जोत्याखाली असून सध्या एकूण ६.९३८ दलघमी पाणीसाठा आहे. तसेच रेणापूर तालुक्यातील व्हटी प्रकल्पही जोत्याखाली आहे. तिथे ०.७१६ दलघमी पाणी आहे. रेणापूर प्रकल्पात ०.२४५१ दलघमी, उदगीर तालुक्यातील तिरु प्रकल्पामध्ये ३.५२०, देवर्जनमध्ये ६.४९५, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ प्रकल्पात ५.५२१, घरणीमध्ये १२.०७४ तर निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पात प्रत्यक्षात ७.४४३ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक साठा...

गेल्या वर्षी याच कालावधीत ५२.३६५ दलघमी एकूण पाणीसाठा होता. यंदा ६१.४८९ दलघमी पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास ९ दलघमीपेक्षा अधिक जलसाठा जास्त आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी या कालावधीत जिल्ह्यातील काही गावांत पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली होती. यंदा अद्यापही अधिग्रहणाचे प्रस्ताव दाखल झाले नसल्याचे जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे व पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

देवर्जन प्रकल्पात सर्वाधिक पाणी...

तावरजा व व्हटी मध्यम प्रकल्प जोत्याखाली असल्याने तेथील उपयुक्त पाण्याची टक्केवारी शून्य आहे. रेणापूर प्रकल्पात ११.९२, तिरु- २३.०२, देवर्जन- ६०.८१, साकोळ- ५०.४२, घरणी- ५३.७४ तर मसलगा प्रकल्पात ५४.७३ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यात एकूण १३२ लघु प्रकल्प असून तिथे ३४.२८ टक्के जलसाठा आहे.