शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

उदगीरमध्ये अतिक्रमण हटविण्यासाठी व्यापा-यांनी पुकारला बेमुदत बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 17:46 IST

शहराची बाजारपेठ असलेल्या पत्तेवार चौकात हातगाडे थांबत आहेत़ त्याचबरोबर काहींनी अतिक्रमण केले आहे़ परिणामी, नागरिकांना ये-जा करणे कठीण होते. यामुळे ही अतिक्रमणे हटविण्यात यावीत, अशी व्यापा-यांकडून मागणी आहे.

ठळक मुद्देआज सकाळी हातगाडाचालक व एका व्यापा-यात बाचाबाची झाली़. यामुळे संपूर्ण बाजारपेठेतील व्यापा-यांनी अतिक्रमणे व हातगाडे काढण्यासाठी बेमुदत बंद पुकारला आहे. दिवसभरात १० लाखांची उलाढाल ठप्प

उदगीर : शहराची बाजारपेठ असलेल्या पत्तेवार चौकात हातगाडे थांबत आहेत़ त्याचबरोबर काहींनी अतिक्रमण केले आहे़ परिणामी, नागरिकांना ये-जा करणे कठीण होते. यामुळे ही अतिक्रमणे हटविण्यात यावीत, अशी येथील व्यापा-यांकडून मागणी आहे. यातच आज सकाळी हातगाडाचालक व एका व्यापा-यात बाचाबाची झाली़. यामुळे संपूर्ण बाजारपेठेतील व्यापा-यांनी अतिक्रमणे व हातगाडे काढण्यासाठी बेमुदत बंद पुकारला आहे. त्यामुळे दिवसभरात जवळपास १० लाखांची उलाढाल ठप्प झाली आहे.

शहरातील पत्तेवार चौक व परिसरात हातगाडे थांबतात़ त्याचबरोबर अतिक्रमणांनी विळखा घातला आहे़ त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी ये-जा करणा-या अबालवृध्दांना त्याचा त्रास होत आहे़ अतिक्रमणांचा सर्वाधिक त्रास महिला, मुलींना होत आहे़ सन २०११ मध्ये पत्तेवार चौकातील व्यापा-यांनी या ठिकाणी पोलीस मदत केंद्राची चौकी उभारावी अशी मागणी केली होती़ परंतु, ती अद्यापही पूर्ण झाली नाही. या चौक परिसरात किराणा, भुसार, मेडिकल, भांडी, गृहउपयोगी वस्तू ते भाजीपाल्याची बाजारपेठ आहे़ त्यामुळे खरेदीसाठी अबालवृद्धांची नेहमी गर्दी असते़ या परिसरात सुरक्षितता आणि वाहतुकीची शिस्तीसंदर्भात ‘लोकमत’मधून यापूर्वी वृत्त प्रकाशित करण्यात आले होते़ त्यामुळे आमदार सुधाकर भालेराव, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, मुख्याधिकारी नितीन कापडणीस, उदगीर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भीमाशंकर हिरमुखे आदींनी पुढाकार घेऊन या भागातील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात करण्यात आली होती़ परंतु, नगर परिषद व पोलीस प्रशासन यांच्यात एकी न झाल्याने ही मोहीम थंडावली.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी एक व्यापारी व एका हातगाडेचालकात वाद होऊन बाचाबाची झाली़ त्यामुळे संतप्त झालेल्या व्यापाºयांनी अतिक्रमणे व हातगाडे हटवावेत, अशी मागणी करीत बाजारपेठ बेमुदत बंद ठेवण्यास सुरुवात केली़ या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भीमाशंकर हिरमुखे व नगर परिषदेचे अधिकारी गोलंदाज यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन व्यापाºयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला़ मात्र, व्यापाºयांनी आपण माघार घेत नसल्याचे स्पष्ट करीत निवेदन दिले़ या भागातील हातगाडे, अतिक्रमणे हटवावीत, सेंट्रल पार्किंग बंद करावी, रस्ते खुले करावेत, अशा मागण्या व्यापा-यांनी केल्या आहेत़

अतिक्रमणांमुळे व्यापा-यांत असुरक्षिततेची भावना़या भागात पोलीस मदत केंद्र निर्माण करावे, अशी आम्ही सन २०११ पासून मागणी करीत आहोत़ तसेच हातगाडे थांबत असल्याने आणि अतिक्रमणे वाढल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे़ व्यापारीही त्रस्त झाले आहेत़ पोलीस मदत केंद्रासंदर्भात पोलीस महासंचालकांपर्यंत मागणी करण्यात आली होती़ याच मागणीसाठी १८ ते २० आॅगस्ट २०११ या कालावधीत बाजारपेठ बंदही ठेवण्यात आली होती, असे व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी रामदास जळकोटे यांनी सांगितले़ 

अतिक्रमण हटाव मोहीम राबवू़शहरातील नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी नगर परिषद कटिबध्द आहे़ शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी मोहीमही सुरु करण्यात आली होती़ परंतु, वेळेवर पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने ही मोहीम थंडावली़ आता पुन्हा मोहीम सुरु करण्यात येईल, असे नगराध्यक्ष बसवराज बागबंदे यांनी सांगितले़ दरम्यान, उदगीर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणाले, अतिक्रमण हटविण्यासाठी नगर परिषदेला सर्व सहकार्य केले जाईल.