शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

उदगीर तालुक्यात उसाचे क्षेत्र चाैपट वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:25 IST

उदगीर : तब्बल चार वर्षांनंतर पाऊस चांगला झाल्याने सर्व तलाव तुडुंब भरले. ऊस लागवडीसाठी जिल्हा बँकेकडून शून्य टक्के ...

उदगीर : तब्बल चार वर्षांनंतर पाऊस चांगला झाल्याने सर्व तलाव तुडुंब भरले. ऊस लागवडीसाठी जिल्हा बँकेकडून शून्य टक्के व्याजदराने अर्थसाहाय्य मिळत असल्यामुळे त्याचा फायदा घेत शेतक-यांनी ऊस लागवड केली आहे. चार वर्षांनंतर तलाव क्षेत्रात रेड बेल्टचे रूपांतर ग्रीन बेल्टमध्ये झाल्याचे दिसत आहे.

चार वर्षांनंतर तालुक्यात चांगला पाऊस झाल्यामुळे सर्व पाझर तलाव, लघू, मध्यम प्रकल्प व शेतातील विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, ज्वारी या पिकांबरोबरच भाजीपाला, फळबागा करून उसाची लागवड करण्यास सुरुवात केली. दरम्यान, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी जिल्हा बँकेची बैठक घेऊन शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी शून्य टक्के व्याजदराने हेक्टरी अर्थसाहाय्य करण्याचे निर्देश बँकेच्या व विविध कार्यकारी संस्थेच्या गटसचिवांना दिले. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी ऊस लागवड करीत आहेत. तालुक्यातील तलाव क्षेत्र भागात उसाचे क्षेत्र चारपटीने तर अन्य भागांत दुपटीने वाढले आहे. चार वर्षांपूर्वी पाऊस नसल्यामुळे व तलावातील पाणी पिण्यासाठी आरक्षित केल्यामुळे ग्रीन बेल्ट परिसर हा रेड बेल्ट झाला होता. आता हा परिसर पुन्हा ग्रीन बेल्ट तयार झाला आहे. जागृती साखर कारखान्याच्या करडखेल कार्यालयांतर्गत असलेल्या १७ गावांतून उसाची लागवड तिपटीने, तर उदगीर गटातून दुपटीने वाढली आहे.

दाेन हजार १५२ हेक्टरवर लागवड...

तालुक्यात गेल्या वर्षी उसाचे क्षेत्र ५९८ हेक्टर होते. यंदा शेतकऱ्यांनी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केल्यामुळे आतापर्यंत दोन हजार १५२ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. अजून काही शेतकरी उसाची लागवड करीत आहेत. याशिवाय, भाजीपाला व फळबागा लागवडीच्या क्षेत्रातही दुपटीने वाढ झाली आहे.

- संजय नाबदे, तालुका कृषी अधिकारी

योग्य वीजबिल द्यावे... तालुक्यातील देवर्जन मध्यम प्रकल्पातील जलसाठा उदगीरसाठी आरक्षित करण्यात आला होता. चार वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या विजेच्या मोटारींचे कनेक्शन तोडण्यात आले होते. चार वर्षांनंतर देवर्जन प्रकल्प भरल्याने शेतकऱ्यांनी वीजजोडणी करून सिंचन क्षेत्र पूर्ववत सुरू केले आहे. चार वर्षे शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी बंद असल्याने या कालावधीतील विजेचे बिल कमी करून देण्यात यावे. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या वीजबिलांच्या नोटीसनुसार वीजपुरवठा खंडित करू नये.

- बसवराज रोडगे, तालुकाध्यक्ष, भाजप

सोसायटीमार्फत कर्जवाटप...

शेतकऱ्यांना उसाची लागवड करण्यासाठी हेक्टरी दीड लाखांपासून तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज तत्काळ शून्य टक्के व्याजदराने वाटप करावे, असे निर्देश माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी जिल्ह्यातील ५८६ संस्थेच्या गटसचिवांना दिले आहेत. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना विविध कार्यकारी संस्थेमार्फत कर्जवाटप सुरू आहे.

- राम बिरादार, जिल्हाध्यक्ष, गटसचिव संघटना