शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

उदगीर-अहमदपूर रस्ता बनला जीवघेणा; अनेक ब्लॅकस्पॉटमुळे एकाच महिन्यात नऊ बळी !

By संदीप शिंदे | Updated: February 3, 2024 18:21 IST

मालवाहतूक व प्रवासी वाहतूक, दुचाकी चालकांना रस्त्यावरून वाहन चालवताना फार मोठी कसरत करावी लागते.

उदगीर : येथील उदगीर-अहमदपूर रस्त्यावर मागील एका महिन्यात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात ९ जणांचे बळी गेले आहेत. सातत्याने अपघात होत असलेल्या या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कुठल्याही सूचनाफलक लावण्यात आलेले नाही. रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या रस्त्यावर अनेक ब्लॅक स्पॉट निर्माण झाले आहेत. त्याठिकाणी सूचना फलक लावण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

उदगीर शहराचा भौतिक विकास झपाट्याने होत आहे. केंद्र व राज्य सरकारकडून तालुक्यामध्ये रस्ते बांधकाम मोठ्या प्रमाणात चालू आहेत. काही भागातील रस्ते पूर्ण झालेले आहेत तर काही रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. उदगीर-अहमदपूर हा शहराच्या दृष्टीने वाहतुकीसाठी महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरून वाहनाची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. लोणी मोड, हाकनकवाडी, तोंडार पाटी, गंडी पाटी, मन्ना उमरगा, इस्मालपूर, एकुर्गा दरम्यान रस्ता हा अतिशय नागमोडी पद्धतीने असल्याने अनेक वाहनचालक त्यांचे वाहन चालवताना गडबडून जातात. त्यामुळे दररोज एखादा तरी अपघात या रस्त्यावर होतो.

मालवाहतूक व प्रवासी वाहतूक, दुचाकी चालकांना रस्त्यावरून वाहन चालवताना फार मोठी कसरत करावी लागते. हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने उपयुक्त असला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यावर कुठलेही सूचनाफलक लावलेले नाहीत. त्यामुळे उदगीर ते इस्मालपूर दरम्यान मागील एका महिन्यात ९ जणांचा बळी गेल्याची नोंद शासन दप्तरी आहे. हे जीवघेणे अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ठिकठिकाणी गतिरोधक उभे करण्याची गरज आहे. मात्र, फलक नसल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही. एका महिन्यात नऊ जणांना या रस्त्यावर आपला जीव गमवावा लागला असून, यातील बहुतांश जण हे दुचाकीवर होते. फलक असते तर अपघात रोखण्यास काही प्रमाणात मदत झाली असती. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

ठेकेदारास फलक लावण्याच्या सूचना...पोलिस प्रशासन किंवा जिल्हाधिकारी यांच्या सूचनेवरूनच मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसवता येऊ शकतो. मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची अधिकार सार्वजनिक बांधकाम विभागाला नाहीत. उदगीर-अहमदपूर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराला दिशादर्शक बसवण्याचे सूचना देण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण देवकर यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी...ग्रामीण भागातून मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याची गरज असतानासुद्धा याठिकाणी फलक लावलेले नाहीत. पुढे गाव आहे, पुढे वळण रस्ता आहे, अपघात प्रवण रस्ता, वाहने सावकाश चालवा, पुढे अरुंद पूल आहे, वेग मर्यादा सांभाळा असा कुठलाही सूचनाफलक या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लावण्यात आलेला नाही. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी वाहनधारकांतून करण्यात येत आहे.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर