शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

उदगीर-अहमदपूर रस्ता बनला जीवघेणा; अनेक ब्लॅकस्पॉटमुळे एकाच महिन्यात नऊ बळी !

By संदीप शिंदे | Updated: February 3, 2024 18:21 IST

मालवाहतूक व प्रवासी वाहतूक, दुचाकी चालकांना रस्त्यावरून वाहन चालवताना फार मोठी कसरत करावी लागते.

उदगीर : येथील उदगीर-अहमदपूर रस्त्यावर मागील एका महिन्यात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात ९ जणांचे बळी गेले आहेत. सातत्याने अपघात होत असलेल्या या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कुठल्याही सूचनाफलक लावण्यात आलेले नाही. रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या रस्त्यावर अनेक ब्लॅक स्पॉट निर्माण झाले आहेत. त्याठिकाणी सूचना फलक लावण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

उदगीर शहराचा भौतिक विकास झपाट्याने होत आहे. केंद्र व राज्य सरकारकडून तालुक्यामध्ये रस्ते बांधकाम मोठ्या प्रमाणात चालू आहेत. काही भागातील रस्ते पूर्ण झालेले आहेत तर काही रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. उदगीर-अहमदपूर हा शहराच्या दृष्टीने वाहतुकीसाठी महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरून वाहनाची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. लोणी मोड, हाकनकवाडी, तोंडार पाटी, गंडी पाटी, मन्ना उमरगा, इस्मालपूर, एकुर्गा दरम्यान रस्ता हा अतिशय नागमोडी पद्धतीने असल्याने अनेक वाहनचालक त्यांचे वाहन चालवताना गडबडून जातात. त्यामुळे दररोज एखादा तरी अपघात या रस्त्यावर होतो.

मालवाहतूक व प्रवासी वाहतूक, दुचाकी चालकांना रस्त्यावरून वाहन चालवताना फार मोठी कसरत करावी लागते. हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने उपयुक्त असला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यावर कुठलेही सूचनाफलक लावलेले नाहीत. त्यामुळे उदगीर ते इस्मालपूर दरम्यान मागील एका महिन्यात ९ जणांचा बळी गेल्याची नोंद शासन दप्तरी आहे. हे जीवघेणे अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ठिकठिकाणी गतिरोधक उभे करण्याची गरज आहे. मात्र, फलक नसल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही. एका महिन्यात नऊ जणांना या रस्त्यावर आपला जीव गमवावा लागला असून, यातील बहुतांश जण हे दुचाकीवर होते. फलक असते तर अपघात रोखण्यास काही प्रमाणात मदत झाली असती. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

ठेकेदारास फलक लावण्याच्या सूचना...पोलिस प्रशासन किंवा जिल्हाधिकारी यांच्या सूचनेवरूनच मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसवता येऊ शकतो. मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची अधिकार सार्वजनिक बांधकाम विभागाला नाहीत. उदगीर-अहमदपूर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराला दिशादर्शक बसवण्याचे सूचना देण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण देवकर यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी...ग्रामीण भागातून मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याची गरज असतानासुद्धा याठिकाणी फलक लावलेले नाहीत. पुढे गाव आहे, पुढे वळण रस्ता आहे, अपघात प्रवण रस्ता, वाहने सावकाश चालवा, पुढे अरुंद पूल आहे, वेग मर्यादा सांभाळा असा कुठलाही सूचनाफलक या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लावण्यात आलेला नाही. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी वाहनधारकांतून करण्यात येत आहे.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर