शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

उदगीर-अहमदपूर रस्ता बनला जीवघेणा; अनेक ब्लॅकस्पॉटमुळे एकाच महिन्यात नऊ बळी !

By संदीप शिंदे | Updated: February 3, 2024 18:21 IST

मालवाहतूक व प्रवासी वाहतूक, दुचाकी चालकांना रस्त्यावरून वाहन चालवताना फार मोठी कसरत करावी लागते.

उदगीर : येथील उदगीर-अहमदपूर रस्त्यावर मागील एका महिन्यात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात ९ जणांचे बळी गेले आहेत. सातत्याने अपघात होत असलेल्या या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कुठल्याही सूचनाफलक लावण्यात आलेले नाही. रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या रस्त्यावर अनेक ब्लॅक स्पॉट निर्माण झाले आहेत. त्याठिकाणी सूचना फलक लावण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

उदगीर शहराचा भौतिक विकास झपाट्याने होत आहे. केंद्र व राज्य सरकारकडून तालुक्यामध्ये रस्ते बांधकाम मोठ्या प्रमाणात चालू आहेत. काही भागातील रस्ते पूर्ण झालेले आहेत तर काही रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. उदगीर-अहमदपूर हा शहराच्या दृष्टीने वाहतुकीसाठी महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरून वाहनाची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. लोणी मोड, हाकनकवाडी, तोंडार पाटी, गंडी पाटी, मन्ना उमरगा, इस्मालपूर, एकुर्गा दरम्यान रस्ता हा अतिशय नागमोडी पद्धतीने असल्याने अनेक वाहनचालक त्यांचे वाहन चालवताना गडबडून जातात. त्यामुळे दररोज एखादा तरी अपघात या रस्त्यावर होतो.

मालवाहतूक व प्रवासी वाहतूक, दुचाकी चालकांना रस्त्यावरून वाहन चालवताना फार मोठी कसरत करावी लागते. हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने उपयुक्त असला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यावर कुठलेही सूचनाफलक लावलेले नाहीत. त्यामुळे उदगीर ते इस्मालपूर दरम्यान मागील एका महिन्यात ९ जणांचा बळी गेल्याची नोंद शासन दप्तरी आहे. हे जीवघेणे अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ठिकठिकाणी गतिरोधक उभे करण्याची गरज आहे. मात्र, फलक नसल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही. एका महिन्यात नऊ जणांना या रस्त्यावर आपला जीव गमवावा लागला असून, यातील बहुतांश जण हे दुचाकीवर होते. फलक असते तर अपघात रोखण्यास काही प्रमाणात मदत झाली असती. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

ठेकेदारास फलक लावण्याच्या सूचना...पोलिस प्रशासन किंवा जिल्हाधिकारी यांच्या सूचनेवरूनच मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसवता येऊ शकतो. मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची अधिकार सार्वजनिक बांधकाम विभागाला नाहीत. उदगीर-अहमदपूर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराला दिशादर्शक बसवण्याचे सूचना देण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण देवकर यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी...ग्रामीण भागातून मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याची गरज असतानासुद्धा याठिकाणी फलक लावलेले नाहीत. पुढे गाव आहे, पुढे वळण रस्ता आहे, अपघात प्रवण रस्ता, वाहने सावकाश चालवा, पुढे अरुंद पूल आहे, वेग मर्यादा सांभाळा असा कुठलाही सूचनाफलक या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लावण्यात आलेला नाही. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी वाहनधारकांतून करण्यात येत आहे.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर