शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणी भावासह दोन पुतण्यांना आजन्म सश्रम कारावास

By हरी मोकाशे | Updated: March 10, 2023 20:48 IST

शेतातील नाली काढण्यावरुन झाली होती हत्या

लातूर : शेतातील नाली काढण्यावरुन दोघा भावांमध्ये वाद झाला. तेव्हा भावाने आणि त्याच्या दोन मुलांनी चुलत्याचा खून केल्याची घटना मार्च २०१७ मध्ये देवणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोंबळी येथे घडली होती. या प्रकरणाची सुनावणी उदगीरच्या सत्र न्यायालयात शुक्रवारी होऊन न्या. पी.डी. सुभेदार यांनी तिन्ही आरोपींना आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

देवणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोंबळी येथील मयत गोविंद हणमंतराव पाटील व त्यांचा भाऊ आरोपी राजाराम हणमंत पाटील यांच्यात दिवाणी न्यायालयातून वाटणी झाल्यापासून आपआपसांत बोलणे नव्हते. दरम्यान, आरोपी राजाराम हे शेतातील नाल्यातील खडक माती काढून आपल्या बाजूने टाकून घेत होते. तेव्हा गोविंद यांनी असे करु नको म्हणाले. त्यावेळी आरोपीने तुला जेसीबीखाली गाढून नाला काढतो असे म्हणत हाताला धरले. आरोपीची मुले विष्णूदास राजाराम पाटील व रोहिदास राजाराम पाटील यांनी काठ्या घेऊन येऊन खतम करा असे म्हणत मारले. त्यात गोविंद यांचा मृत्यू झाला. तसेच मयताची पत्नी व मुलास मारहाण केली. याप्रकरणी देवणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तत्कालिन पोउपनि. एस.एन. सगर यांनी तपास करुन उदगीरच्या सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने १० साक्षी दाखल करण्यात आल्या. तेव्हा मयताची आणि जखमींची वैद्यकीय कागदपत्रे, वैद्यकीय प्रयोगशाळेचा अहवाल सरकार पक्षाच्या वतीने मांडण्यात आला. तेव्हा न्या. पी.डी. सुभेदार यांनी आरोपी राजाराम पाटील, विष्णूदास पाटील, रोहिदास पाटील या तिघांना कलम ३०२ भादविप्रमाणे आजन्म सश्रम कारावास व प्रत्येकी ५ हजार रुपये दंड, कलम ३२४ नुसार तिन्ही आरोपींना प्रत्येक एक वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी एक हजार रुपये दंड, कलम ५०६ भादविप्रमाणे आरोपींना प्रत्येकी तीन महिन्यांचा सश्रम कारावास व प्रत्येकी एक हजार रुपये दंड सुनावला आहे. सरकारी वकिल ॲड. एस.आय. बिराजदार यांनी सरकार पक्षाच्या वतीने बाजू मांडली.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी