शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

खून प्रकरणी भावासह दोन पुतण्यांना आजन्म सश्रम कारावास

By हरी मोकाशे | Updated: March 10, 2023 20:48 IST

शेतातील नाली काढण्यावरुन झाली होती हत्या

लातूर : शेतातील नाली काढण्यावरुन दोघा भावांमध्ये वाद झाला. तेव्हा भावाने आणि त्याच्या दोन मुलांनी चुलत्याचा खून केल्याची घटना मार्च २०१७ मध्ये देवणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोंबळी येथे घडली होती. या प्रकरणाची सुनावणी उदगीरच्या सत्र न्यायालयात शुक्रवारी होऊन न्या. पी.डी. सुभेदार यांनी तिन्ही आरोपींना आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

देवणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोंबळी येथील मयत गोविंद हणमंतराव पाटील व त्यांचा भाऊ आरोपी राजाराम हणमंत पाटील यांच्यात दिवाणी न्यायालयातून वाटणी झाल्यापासून आपआपसांत बोलणे नव्हते. दरम्यान, आरोपी राजाराम हे शेतातील नाल्यातील खडक माती काढून आपल्या बाजूने टाकून घेत होते. तेव्हा गोविंद यांनी असे करु नको म्हणाले. त्यावेळी आरोपीने तुला जेसीबीखाली गाढून नाला काढतो असे म्हणत हाताला धरले. आरोपीची मुले विष्णूदास राजाराम पाटील व रोहिदास राजाराम पाटील यांनी काठ्या घेऊन येऊन खतम करा असे म्हणत मारले. त्यात गोविंद यांचा मृत्यू झाला. तसेच मयताची पत्नी व मुलास मारहाण केली. याप्रकरणी देवणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तत्कालिन पोउपनि. एस.एन. सगर यांनी तपास करुन उदगीरच्या सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने १० साक्षी दाखल करण्यात आल्या. तेव्हा मयताची आणि जखमींची वैद्यकीय कागदपत्रे, वैद्यकीय प्रयोगशाळेचा अहवाल सरकार पक्षाच्या वतीने मांडण्यात आला. तेव्हा न्या. पी.डी. सुभेदार यांनी आरोपी राजाराम पाटील, विष्णूदास पाटील, रोहिदास पाटील या तिघांना कलम ३०२ भादविप्रमाणे आजन्म सश्रम कारावास व प्रत्येकी ५ हजार रुपये दंड, कलम ३२४ नुसार तिन्ही आरोपींना प्रत्येक एक वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी एक हजार रुपये दंड, कलम ५०६ भादविप्रमाणे आरोपींना प्रत्येकी तीन महिन्यांचा सश्रम कारावास व प्रत्येकी एक हजार रुपये दंड सुनावला आहे. सरकारी वकिल ॲड. एस.आय. बिराजदार यांनी सरकार पक्षाच्या वतीने बाजू मांडली.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी