शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

खून प्रकरणी भावासह दोन पुतण्यांना आजन्म सश्रम कारावास

By हरी मोकाशे | Updated: March 10, 2023 20:48 IST

शेतातील नाली काढण्यावरुन झाली होती हत्या

लातूर : शेतातील नाली काढण्यावरुन दोघा भावांमध्ये वाद झाला. तेव्हा भावाने आणि त्याच्या दोन मुलांनी चुलत्याचा खून केल्याची घटना मार्च २०१७ मध्ये देवणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोंबळी येथे घडली होती. या प्रकरणाची सुनावणी उदगीरच्या सत्र न्यायालयात शुक्रवारी होऊन न्या. पी.डी. सुभेदार यांनी तिन्ही आरोपींना आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

देवणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोंबळी येथील मयत गोविंद हणमंतराव पाटील व त्यांचा भाऊ आरोपी राजाराम हणमंत पाटील यांच्यात दिवाणी न्यायालयातून वाटणी झाल्यापासून आपआपसांत बोलणे नव्हते. दरम्यान, आरोपी राजाराम हे शेतातील नाल्यातील खडक माती काढून आपल्या बाजूने टाकून घेत होते. तेव्हा गोविंद यांनी असे करु नको म्हणाले. त्यावेळी आरोपीने तुला जेसीबीखाली गाढून नाला काढतो असे म्हणत हाताला धरले. आरोपीची मुले विष्णूदास राजाराम पाटील व रोहिदास राजाराम पाटील यांनी काठ्या घेऊन येऊन खतम करा असे म्हणत मारले. त्यात गोविंद यांचा मृत्यू झाला. तसेच मयताची पत्नी व मुलास मारहाण केली. याप्रकरणी देवणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तत्कालिन पोउपनि. एस.एन. सगर यांनी तपास करुन उदगीरच्या सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने १० साक्षी दाखल करण्यात आल्या. तेव्हा मयताची आणि जखमींची वैद्यकीय कागदपत्रे, वैद्यकीय प्रयोगशाळेचा अहवाल सरकार पक्षाच्या वतीने मांडण्यात आला. तेव्हा न्या. पी.डी. सुभेदार यांनी आरोपी राजाराम पाटील, विष्णूदास पाटील, रोहिदास पाटील या तिघांना कलम ३०२ भादविप्रमाणे आजन्म सश्रम कारावास व प्रत्येकी ५ हजार रुपये दंड, कलम ३२४ नुसार तिन्ही आरोपींना प्रत्येक एक वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी एक हजार रुपये दंड, कलम ५०६ भादविप्रमाणे आरोपींना प्रत्येकी तीन महिन्यांचा सश्रम कारावास व प्रत्येकी एक हजार रुपये दंड सुनावला आहे. सरकारी वकिल ॲड. एस.आय. बिराजदार यांनी सरकार पक्षाच्या वतीने बाजू मांडली.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी