शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

दोन दिवसातील पावसामुळे खरीप पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रेणापूर : तालुक्यात आतापर्यंत खरिपाच्या ८२.७३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्यामुळे पिके कोमेजून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रेणापूर : तालुक्यात आतापर्यंत खरिपाच्या ८२.७३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्यामुळे पिके कोमेजून जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. दरम्यान, दोन दिवसांपासून थोड्याफार प्रमाणात पाऊस होत असल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

रेणापूर तालुक्यात पेरणीयोग्य ४८ हजार ६६० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी आतापर्यंत ४० हजार २५७ हेक्‍टरवर म्हणजे ८२.७३ टक्के पेरणी झाली आहे. दरम्यान, पाऊसही कमी-जास्त प्रमाणात झाला आहे. आतापर्यंत तालुक्यात १६३.६ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने चांगली सुरुवात केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंदित होऊन पेरणीला सुरुवात केली होती. जवळपास ६० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. पेरणीनंतर आठ दिवसांनी पावसाने उघडीप दिल्यामुळे उर्वरित पेरण्या थांबल्या होत्या. पेरणीनंतर उगवलेली पिके दुपार धरु लागली होती. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, ते शेतकरी तुषार सिंचनाद्वारे पाणी देऊन पिके जगविण्यासाठी धडपड करत होते.

दोन दिवसांपासून थोड्याफार प्रमाणात पाऊस होत असल्याने चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. उगवलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र, अद्याप मोठ्या पावसाची गरज आहे. पावसाअभावी तालुक्यातील १३ टक्के पेरण्या थांबल्या आहेत.

३६ हजार हेक्टरवर सोयाबीन...

तालुक्यात सर्वाधिक ३६ हजार ६२५ हेक्‍टरवर सोयाबीनचा पेरा झाला असून, तालुक्यात अद्यापही १३ टक्के पेरण्या शिल्लक आहेत. दरम्यान, मूग, उडीद, भुईमूग पेरणीचा कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ही पिके वगळता अन्य पिकांची पेरणी करावी लागणार आहे, असे तालुका कृषी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

तालुक्यात २६ मिमी पाऊस...

बुधवारी रात्री तालुक्यातील ५ मंडलांत सरासरी २६.६ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. रेणापूर मंडलात २० मिमी, पोहरेगावात २५, पानगावात १५, कारेपूरमध्ये ५३ व पळशीमध्ये २० मिमी पाऊस झाला आहे. दि. १ जूनपासून आतापर्यंत रेणापूर मंडलात १८६ मिमी, पोहरेगावात १६३ मिमी, पानगावात १२३ मिमी, कारेपूरमध्ये १५३ मिमी आणि पळशीत १९३ मिमी असा पाऊस झाला आहे. दोन दिवसात पडलेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.