शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

दोन दिवसांच्या जनता कर्फ्यूला प्रतिसाद द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:26 IST

राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सोशल माध्यमातून जनतेशी संवाद ...

राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सोशल माध्यमातून जनतेशी संवाद साधून नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये माॅस्कचा वापर करणे, फिजिकल डिस्टन्सचे पालन करणे, अनावश्यक गर्दी टाळणे, स्वच्छतेचे नियम पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदींचा समावेश आहे; परंतु काही नागरिक दुर्लक्ष करीत असल्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे.

येथील तहसीलदार अतुल जटाळे यांनी गुरुवारी कोरोना नियंत्रण समितीची बैठक घेऊन जनता कर्फ्यूबाबत माहिती दिली आहे. शनिवार व रविवार या दोन दिवशी आवश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांनी नियमाचे पालन करावे, अन्यथा दंडात्मक कारवाई होऊ शकते. या बैठकीसाठी नायब तहसीलदार सुधीर बिरादार, आर.एन. पत्रिके यांची उपस्थिती होती.

मी जबाबदार मोहीम...

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी, ही मोहीम राबविली होती. आता मी जबाबदार, ही नवी मोहीम सुरू केली आहे. शनिवार, रविवारी बहुतांश सरकारी, निमसरकारी कार्यालये बंद असतात. नागरिकांनी जनता कर्फ्यूमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार जटाळे यांनी केले आहे.