शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

बारावीच्या निकालाचा पेच; महाविद्यालयांना बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:14 IST

लातूर : दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकलच्या आधारे बारावीचा निकाल तयार केला जाणार असल्याचे म्हटले जात असले ...

लातूर : दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकलच्या आधारे बारावीचा निकाल तयार केला जाणार असल्याचे म्हटले जात असले तरी अद्याप राज्य शिक्षण मंडळाकडून अथवा विभागीय शिक्षण मंडळाकडून महाविद्यालयांना कोणत्याही मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया सध्या तरी ठप्प आहे. महाविद्यालयांना मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात कला, वाणिज्य, विज्ञान या विद्या शाखांमध्ये दीड लाखांच्या पुढे विद्यार्थी संख्या आहे. या विद्यार्थ्यांना गुणदान करण्यासंदर्भात कोणत्याही मार्गदर्शक सूचना नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयांचे बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांकडे लक्ष आहे. दहावी ४०, अकरावी ३० आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षांवर ३० टक्के गुण देण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. परंतु, अधिकृतरित्या या संदर्भात शिक्षण मंडळाकडून कोणत्याही सूचना नाहीत. दहावीच्या निकालाबाबत जशा सूचना शाळांना मंडळाकडून पोहोचल्या आहेत, तशा सूचना बारावीचा निकाल करण्याबाबत नसल्याने विद्यार्थ्यांसह महाविद्यालय, पालक प्रतीक्षेत आहेत.

दहावीला मेरिट असूनही अकरावीत कमी गुण असल्यास नुकसान

दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकल परीक्षांवरून मू्ल्यांकन करण्याची सूचना अमलात आली तर नुकसान होईल. दहावीला मेरिट असून, अकरावीला कमी गुण असल्यास नुकसान होईल, असा मतप्रवाह शिक्षकांचा आहे. परंतु, अद्याप यासंदर्भात सूचना नसल्याचे दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. मिलिंद माने यांनी सांगितले.

दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षांवरून मूल्यमापन करावे, हे ऐकिवात आहे. या संदर्भातला कोणताही आदेश आलेला नाही. त्यामुळे प्रक्रिया बंद आहे. अकरावीच्या मुलांची मात्र ऑनलाईन चाचणी घेऊन बारावीच्या वर्गात प्रवेश देण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे, असे दयानंद कला महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे यांनी सांगितले.

नवीन अभ्यासक्रमानुसार लातूर बोर्डांतर्गत ७७ हजार ७४९ बारावीतील विद्यार्थी संख्या आहे. यात लातूर जिल्ह्यात विज्ञान १३ हजार ८५८, कला ९ हजार ८४५, वाणिज्य ५ हजार १५५, व्होकेशनल २ हजार ४०९ असे एकूण ३१ हजार २६८ विद्यार्थी आहेत. नांदेड जिल्ह्यात विज्ञान १५ हजार ९३, कला १३ हजार ४८, वाणिज्य ३ हजार ७११, व्होकेशनल ७२२ असे एकूण ३२ हजार ५७४ विद्यार्थी आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात विज्ञान ५ हजार ९३१, कला ५ हजार २१९, वाणिज्य १ हजार ८४३, व्होकेशनल ९५९ असे एकूण १३ हजार ९५२ विद्यार्थी आहेत.

जुना अभ्यासक्रम

लातूर जिल्ह्यात विज्ञान शाखा ३२०, कला ७०९, वाणिज्य ८, व्होकेशनल १७७ असे एकूण १ हजार ३७६ विद्यार्थी.

नांदेड जिल्ह्यात विज्ञान ५४८, कला १ हजार ३७६, वाणिज्य ११५, व्होकेशनल ९५ असे एकूण २ हजार १३४ विद्यार्थी.

उस्मानाबाद जिल्ह्यात विज्ञान २०८, कला ५१३, वाणिज्य १०१, व्होकेशनल ११९ असे एकूण ९४१ विद्यार्थी.