शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

बारावीच्या निकालाचा पेच; महाविद्यालयांना बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:14 IST

लातूर : दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकलच्या आधारे बारावीचा निकाल तयार केला जाणार असल्याचे म्हटले जात असले ...

लातूर : दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकलच्या आधारे बारावीचा निकाल तयार केला जाणार असल्याचे म्हटले जात असले तरी अद्याप राज्य शिक्षण मंडळाकडून अथवा विभागीय शिक्षण मंडळाकडून महाविद्यालयांना कोणत्याही मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया सध्या तरी ठप्प आहे. महाविद्यालयांना मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात कला, वाणिज्य, विज्ञान या विद्या शाखांमध्ये दीड लाखांच्या पुढे विद्यार्थी संख्या आहे. या विद्यार्थ्यांना गुणदान करण्यासंदर्भात कोणत्याही मार्गदर्शक सूचना नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयांचे बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांकडे लक्ष आहे. दहावी ४०, अकरावी ३० आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षांवर ३० टक्के गुण देण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. परंतु, अधिकृतरित्या या संदर्भात शिक्षण मंडळाकडून कोणत्याही सूचना नाहीत. दहावीच्या निकालाबाबत जशा सूचना शाळांना मंडळाकडून पोहोचल्या आहेत, तशा सूचना बारावीचा निकाल करण्याबाबत नसल्याने विद्यार्थ्यांसह महाविद्यालय, पालक प्रतीक्षेत आहेत.

दहावीला मेरिट असूनही अकरावीत कमी गुण असल्यास नुकसान

दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकल परीक्षांवरून मू्ल्यांकन करण्याची सूचना अमलात आली तर नुकसान होईल. दहावीला मेरिट असून, अकरावीला कमी गुण असल्यास नुकसान होईल, असा मतप्रवाह शिक्षकांचा आहे. परंतु, अद्याप यासंदर्भात सूचना नसल्याचे दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. मिलिंद माने यांनी सांगितले.

दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षांवरून मूल्यमापन करावे, हे ऐकिवात आहे. या संदर्भातला कोणताही आदेश आलेला नाही. त्यामुळे प्रक्रिया बंद आहे. अकरावीच्या मुलांची मात्र ऑनलाईन चाचणी घेऊन बारावीच्या वर्गात प्रवेश देण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे, असे दयानंद कला महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे यांनी सांगितले.

नवीन अभ्यासक्रमानुसार लातूर बोर्डांतर्गत ७७ हजार ७४९ बारावीतील विद्यार्थी संख्या आहे. यात लातूर जिल्ह्यात विज्ञान १३ हजार ८५८, कला ९ हजार ८४५, वाणिज्य ५ हजार १५५, व्होकेशनल २ हजार ४०९ असे एकूण ३१ हजार २६८ विद्यार्थी आहेत. नांदेड जिल्ह्यात विज्ञान १५ हजार ९३, कला १३ हजार ४८, वाणिज्य ३ हजार ७११, व्होकेशनल ७२२ असे एकूण ३२ हजार ५७४ विद्यार्थी आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात विज्ञान ५ हजार ९३१, कला ५ हजार २१९, वाणिज्य १ हजार ८४३, व्होकेशनल ९५९ असे एकूण १३ हजार ९५२ विद्यार्थी आहेत.

जुना अभ्यासक्रम

लातूर जिल्ह्यात विज्ञान शाखा ३२०, कला ७०९, वाणिज्य ८, व्होकेशनल १७७ असे एकूण १ हजार ३७६ विद्यार्थी.

नांदेड जिल्ह्यात विज्ञान ५४८, कला १ हजार ३७६, वाणिज्य ११५, व्होकेशनल ९५ असे एकूण २ हजार १३४ विद्यार्थी.

उस्मानाबाद जिल्ह्यात विज्ञान २०८, कला ५१३, वाणिज्य १०१, व्होकेशनल ११९ असे एकूण ९४१ विद्यार्थी.