शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

नियमित आणि वेळेत उपचार केल्यास क्षयरोग आटोक्यात : एस.एस. फुलारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 19:44 IST

क्षयरोग झाल्याचे निदान झाल्यानंतर घरपोच औषधी पुरविण्यात येतात.

ठळक मुद्देवर्षभरात पावणेतीन हजार रुग्णांवर यशस्वी उपचार

लातूर : नियमित आणि वेळेत उपचार केल्यास क्षयरोग बरा होऊ शकतो. त्याअनुषंगाने जिल्हा क्षयरोग विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात आली असून, रुग्णाला क्षयरोग झाल्याचे निदान झाल्यानंतर घरपोच औषधी पुरविण्यात येतात. नोव्हेंबर २०१७ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत या उपक्रमांतर्गत २ हजार २७५ रुग्णांवर उपचार करण्यात आले. हे रुग्ण ठणठणीत झाले असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस.एस. फुलारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

डॉ. फुलारी म्हणाले, क्षयरोगाचे निदान झाल्यानंतर सहा महिने नियमित औषध घेतल्यानंतर क्षयरोग बरा होता. क्षयरोगमुक्त जिल्हा करण्यासाठी विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात आली. तपासण्या करून रोगाचे निदान केले गेले. त्यानंतर उपचार केल्यानंतर २ हजार २७५ रुग्ण बरे झाले आहेत. त्यात अहमदपूर १९४, औसा १३९, चाकूर ९२, देवणी ५८, जळकोट ७३, लातूर शहर ७७८, लातूर ग्रामीण ४३३, निलंगा २०४, रेणापूर ७४, शिरूर अनंतपाळ ३४, उदगीर १९६ आदी २ हजार २७५ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. सद्य:स्थितीत अहमदपूर तालुक्यात ८०, औसा ५८, चाकूर ४२, देवणी २८, जळकोट ४२, लातूर शहर ३५२, लातूर ग्रामीण २१२, निलंगा ८८, रेणापूर ३२, शिरूर अनंतपाळ १२, उदगीर ८२ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या रुग्णांचीही प्रकृती आता सुधारली असून, लवकरच ते क्षयमुक्त होतील, असेही जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. फुलारी यांनी सांगितले. 

क्षयरुग्णांवर मोफत उपचार... क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असल्याने खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे क्षयरोग विभागाच्या वतीने समुपदेशन करून जनजागृती केली जाते. ज्या रुग्णांना क्षयरोग झाला, अशा रुग्णांवर मोफत उपचार केले जातात, असेही डॉ. फुलारी यांनी सांगितले. 

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलLatur civil hospitalजिल्हा रुग्णालय लातूर