शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

किल्लारी भूकंपातील मृतात्म्यांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 16:33 IST

बुधवार दि. ३० रोजी किल्लारी भुकंपातील मृतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली.

किल्लारी : ३० सप्टेंबर ही तारीख आजही किल्लारीकरांसह अवघ्या महाराष्ट्रालाच थेट १९९३ सालात घेऊन जाते आणि हजारो नागरिकांचे प्राण घेणाऱ्या प्रलयंकारी भूकंपाच्या कटू आठवणी जाग्या होतात. त्यामुळेच बुधवार दि. ३० रोजी किल्लारी भुकंपातील मृतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली.

यावेळी तहसीलदार शोभा पुजारी, आ. अभिमन्यू पवार, सरपंच शैला लोहार, उपसरपंच युवराज गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप लोहार, सहायक पोलीस निरीक्षक म्हेत्रेवाड, विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

२७ वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपात या परिसरातील हजारो नागरिकांचा जीव गेला. परिसरातील अनेक गावे उद्ध्वस्त झाली. मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली. त्यामुळे दरवर्षी ३० सप्टेंबर रोजी किल्लारी गावात उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभासमोर श्रद्धांजली अर्पण करण्यात येते.

पुनर्वसनात अनेकांना घरे मिळाली. परंतु, कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढल्याने घराची गरज निर्माण होत आहे. यासह येथील नागरिकांसमोर सध्या अनेक नागरी प्रश्न असून या प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

ज्यांनी या भुकंपात आपल्या आप्तांना गमवले होते, त्यांच्या डोळ्यात नकळत पाणी दाटून आले आणि त्यांच्या आठवणींनी मन उचंबळून आले. अतिशय भावपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.

 

टॅग्स :EarthquakeभूकंपKillari Earthquakeकिल्लारी भूकंपMarathwadaमराठवाडा