शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्सचे चाक पुन्हा पंक्चर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:18 IST

लातूर : लॉकडाऊन उठल्यानंतर ट्रॅव्हल्सचा प्रवास जाेरात सुरू झाला होता; मात्र गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यासह राज्यात सगळीकडे कोरोना ...

लातूर : लॉकडाऊन उठल्यानंतर ट्रॅव्हल्सचा प्रवास जाेरात सुरू झाला होता; मात्र गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यासह राज्यात सगळीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्सची संख्या पुन्हा घटली असून, मोजक्याच काही गाड्या पुणे, मुंबई, औरंगाबादला धावत आहेत. त्यातही प्रवाशांचा प्रतिसाद अल्प असल्याने बस पूर्णक्षमतेने धावत नसून, डिझेलचा खर्च निघणेही अवघड झाले आहे.

लातूर जिल्ह्यातून पुणे, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, नाशिक, शिर्डी, अहमदाबाद, गोवा आदी शहरांसाठी ट्रॅव्हल्स धावतात. कोरोनाच्या आधी दररोज ३०० हून अधिक बस धावत होत्या; मात्र लॉकडाऊनमुळे ट्रॅव्हल्स व्यवसाय अडचणीत आला. दरम्यान, गत काही महिन्यांत कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने बस पुन्हा पूर्ववत झाल्या होत्या. त्यातही निर्बंध असल्याने दररोज ३०० हून अधिक धावणाऱ्या बसची संख्या ६० वर पोहोचली आहे. आर्थिक उत्पन्न घटल्याने बँकांच्या वतीने हप्त्यासाठी वसुलीचा तगादा लावला जात आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्स व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.

गाडी रुळावर होती; पण...

कोरोनापूर्वी ट्रॅव्हल्स व्यवसायाची परिस्थिती चांगली होती. लातूर जिल्हाभरातून दररोज ३०० हून अधिक बस धावत होत्या; मात्र कोरोना आला आणि त्यामुळे लॉकडाऊन लागला. परिणामी, ट्रॅव्हल्स व्यावसायिक, तिकीट बुक करणारे, चालक-वाहक या सर्वांवर आर्थिक संकट कोसळले. बँकांचे हप्ते थकल्याने अनेकांनी बस विकल्या आहेत, तर सध्या ज्या ट्रॅव्हल्स चालू आहेत त्यांनाही डिझेलचा खर्च निघणे अवघड झाले आहे. एकंदरीत कोरोनाने ट्रॅव्हल्स व्यावसायिकांचे मोठे नुकसान केले आहे.

कोरोनामुळे ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने दररोजचा खर्च मिळणेही अवघड झाले आहे. हप्त्यांसाठी बँकांचा तगादा सुरू असून, उत्पन्न घटल्याने हप्ते भरणेही जिकिरीचे झाले आहे.

- सोमनाथ मेडगे, ट्रॅव्हल्स व्यावसायिक

कोरोनापूर्वी औरंगाबाद, पुणे, नाशिक या शहरांसाठी बस धावत होत्या; मात्र लॉकडाऊनमुळे बस उभ्याच राहिल्याने आर्थिक उत्पन्न घटले आहे. जिल्ह्यातून आता केवळ ६० ते ७० बस दररोज धावत आहेत, त्यांनाही परवडेनासे झाले आहे.

- जगदीश स्वामी, ट्रॅव्हल्स व्यावसायिक

कोरोना आला आणि त्यामुळे लॉकडाऊन लागला. अनेकांना तर हप्ते भरणेही अवघड झाले. त्यातच बँकांचा तगादा चालूच आहे. काेरोनामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे हप्ता भरणेही अवघड झाले आहे. शासनाने ट्रॅव्हल्स व्यवसायासाठी साहाय्य करण्याची गरज आहे.

- एजाज मनियार, ट्रॅव्हल्स व्यावसायिक