शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

ट्रॅव्हल्सचे चाक पुन्हा पंक्चर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:18 IST

लातूर : लॉकडाऊन उठल्यानंतर ट्रॅव्हल्सचा प्रवास जाेरात सुरू झाला होता; मात्र गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यासह राज्यात सगळीकडे कोरोना ...

लातूर : लॉकडाऊन उठल्यानंतर ट्रॅव्हल्सचा प्रवास जाेरात सुरू झाला होता; मात्र गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यासह राज्यात सगळीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्सची संख्या पुन्हा घटली असून, मोजक्याच काही गाड्या पुणे, मुंबई, औरंगाबादला धावत आहेत. त्यातही प्रवाशांचा प्रतिसाद अल्प असल्याने बस पूर्णक्षमतेने धावत नसून, डिझेलचा खर्च निघणेही अवघड झाले आहे.

लातूर जिल्ह्यातून पुणे, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, नाशिक, शिर्डी, अहमदाबाद, गोवा आदी शहरांसाठी ट्रॅव्हल्स धावतात. कोरोनाच्या आधी दररोज ३०० हून अधिक बस धावत होत्या; मात्र लॉकडाऊनमुळे ट्रॅव्हल्स व्यवसाय अडचणीत आला. दरम्यान, गत काही महिन्यांत कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने बस पुन्हा पूर्ववत झाल्या होत्या. त्यातही निर्बंध असल्याने दररोज ३०० हून अधिक धावणाऱ्या बसची संख्या ६० वर पोहोचली आहे. आर्थिक उत्पन्न घटल्याने बँकांच्या वतीने हप्त्यासाठी वसुलीचा तगादा लावला जात आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्स व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.

गाडी रुळावर होती; पण...

कोरोनापूर्वी ट्रॅव्हल्स व्यवसायाची परिस्थिती चांगली होती. लातूर जिल्हाभरातून दररोज ३०० हून अधिक बस धावत होत्या; मात्र कोरोना आला आणि त्यामुळे लॉकडाऊन लागला. परिणामी, ट्रॅव्हल्स व्यावसायिक, तिकीट बुक करणारे, चालक-वाहक या सर्वांवर आर्थिक संकट कोसळले. बँकांचे हप्ते थकल्याने अनेकांनी बस विकल्या आहेत, तर सध्या ज्या ट्रॅव्हल्स चालू आहेत त्यांनाही डिझेलचा खर्च निघणे अवघड झाले आहे. एकंदरीत कोरोनाने ट्रॅव्हल्स व्यावसायिकांचे मोठे नुकसान केले आहे.

कोरोनामुळे ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने दररोजचा खर्च मिळणेही अवघड झाले आहे. हप्त्यांसाठी बँकांचा तगादा सुरू असून, उत्पन्न घटल्याने हप्ते भरणेही जिकिरीचे झाले आहे.

- सोमनाथ मेडगे, ट्रॅव्हल्स व्यावसायिक

कोरोनापूर्वी औरंगाबाद, पुणे, नाशिक या शहरांसाठी बस धावत होत्या; मात्र लॉकडाऊनमुळे बस उभ्याच राहिल्याने आर्थिक उत्पन्न घटले आहे. जिल्ह्यातून आता केवळ ६० ते ७० बस दररोज धावत आहेत, त्यांनाही परवडेनासे झाले आहे.

- जगदीश स्वामी, ट्रॅव्हल्स व्यावसायिक

कोरोना आला आणि त्यामुळे लॉकडाऊन लागला. अनेकांना तर हप्ते भरणेही अवघड झाले. त्यातच बँकांचा तगादा चालूच आहे. काेरोनामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे हप्ता भरणेही अवघड झाले आहे. शासनाने ट्रॅव्हल्स व्यवसायासाठी साहाय्य करण्याची गरज आहे.

- एजाज मनियार, ट्रॅव्हल्स व्यावसायिक