शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

३ कोटींच्या थकीत वसुलीसाठी वाहतूक शाखा ॲक्टिव्ह मोडवर; पाच महिन्यांत १ कोटी ७० लाख वसूल

By आशपाक पठाण | Updated: June 19, 2023 17:51 IST

मागील दीड वर्षात १ लाख १६ हजार वाहनधारकांकडे जवळपास ३ कोटी रुपये दंड थकीत आहे.

लातूर : वाहतूक कोंडी रोखण्याचे काम करणाऱ्या शहर वाहतूक शाखेच्या पथकाने वसुलीवरही विशेष भर दिला आहे. मागील पाच महिन्यांत विविध दंडाची थकबाकी असलेली वाहने टार्गेट करून तपासणी केली जात आहे. त्यानुसार पाच महिन्यांत एक दोन नव्हे तर तब्बल १ कोटी ७० लाख रुपयांची वसुली लातूर शहर वाहतूक शाखेने केली आहे. मागील दीड वर्षात १ लाख १६ हजार वाहनधारकांकडे जवळपास ३ कोटी रुपये दंड थकीत आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाईचे प्रमाण वाढले आहे. एकदा ऑनलाइन दंड नावावर पडला की, पुन्हा शहरात यायचे नाही किंवा दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करायची. हजारो वाहनधारकांकडे थकीत असलेली रक्कम कोट्यवधींची आहे. एकदा खटला दिला की, एक तर तो निकाली काढावा लागतो किंवा दंडाची रक्कम वसुली करावी लागते. यासाठी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या सूचनेनुसार वाहतूक शाखेच्या पथकाकडून वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच दंडात्मक कारवाईवर भर दिला जात आहे. वाहतूक शाखेच्या विशेष पथकाकडून वाहन तपासणीत थकीत दंड असलेल्या वाहनांकडून सक्तीचे वसुली केली जात असल्याचे सांगण्यात आले.

दंड कशाचा, कधी भरायचा...वाहन परवाना नाही, फिटनेस, पीयूसी, इन्सुरन्स, सिग्नल तोडले आदी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १ लाख १६ हजार वाहनधारकांना ऑनलाइन दंड देण्यात आला आहे. यात दररोज शहरात येणारी किंवा व्यावसायिक वाहने दंडाची रक्कम भरून घेतात. दंड भरण्यात दुचाकीचालक दुर्लक्ष करतात. दीड वर्षात तब्बल ३ कोटींची दंडाची रक्कम वसूल होणे बाकी आहे. त्यामुळे वाहतूक शाखेच्या पथकाकडून वाहन तपासणीत थकबाकी आढळून आलेली वाहने शोधली जात आहेत.

ई-चलन मशीनचा वापर...लातूर शहर वाहतूक शाखेच्या पथकाकडून ई- चलन मशीनद्वारे वाहनाचा क्रमांक टाकून त्याची माहिती काढली जात आहे. दंडाची रक्कम थकीत असल्याचे आढळून आल्यास त्याच्याकडून वसुली केली जात आहे. वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गणेश कदम, पोलिस उपनिरीक्षक आवेज काझी, पोलिस उपनिरीक्षक आयुब शेख यांच्या पथकाने पाच महिन्यांत १ कोटी ७० लाख रुपयांची थकीत दंडाची रक्कम वसूल केली आहे.

विस्कळीत वाहतुकीकडेही लक्ष हवे...लातूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवीन रेणापूर नाका, राजीव गांधी चौक, गंजगोलाई, बार्शी रोडवर पाच नंबर चौक याठिकाणी वाहतूक कोंडी नित्याची आहे. सकाळी व सायंकाळी किमान तीन ते चार तास याठिकाणी वाहतूक पोलिस तत्पर असायला हवेत. तेही प्रत्येक चौकात किमान ४ तरी पोलिस हवेत. त्याशिवाय कोंडी हटणार नाही. वसुलीबरोबर सुरळीत वाहतुकीला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसtraffic policeवाहतूक पोलीसlaturलातूर