शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

उदगीरच्या मार्केटयार्डसाठी ५० एकर जागा मिळवून देणार; दिलीपराव देशमुख यांची ग्वाही

By संदीप शिंदे | Updated: August 10, 2023 19:29 IST

उदगीर येथे शेतकरी, हमाल, मापाडी व नूतन संचालकांच्या वतीने आयोजित स्नेह व ऋणनिर्देश मेळाव्यात माजी मंत्री दिलीपराव देशमुख बोलत होते.

उदगीर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत चालणाऱ्या मार्केटयार्डसाठी आगामी काळात ५० एकर जमीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी बुधवारी येथे दिली.

उदगीर येथे शेतकरी, हमाल, मापाडी व नूतन संचालकांच्या वतीने आयोजित स्नेह व ऋणनिर्देश मेळाव्यात ते बोलत होते. मंचावर माजी मंत्री आ. अमित देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन आ. धीरज देशमुख, माजी आ. त्र्यंबक भिसे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, ‘रेणा’चे चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेच्या संचालिका लक्ष्मीताई भोसले, ॲड. प्रमोद जाधव, रवींद्र काळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजी मुळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याणराव पाटील, उषाताई कांबळे, सभापती शिवाजी हुडे, उपसभापती प्रीती भोसले, मंजूरखाँ पठाण, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटूरे, मारोती पांडे आदींसह संचालक उपस्थित होते. 

माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले, देशाची प्रगती काँग्रेस पक्षाने केली. लोकशाही जिवंत ठेवण्याचे कार्य काँग्रेसने केली असून, ते जपायची जबाबदारी तुम्हा-आम्हावर आली आहे. सध्याचे वातावरण पाहता नागरिकांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतला तरच लोकशाही अस्तित्वात राहील, असेही ते म्हणाले. यावेळी बाजार समितीकडून शेतकऱ्यांच्या घरी जन्मास येणाऱ्या मुलीच्या नावाने राष्ट्रीय बँकेत पाच हजार रुपयांची ठेव मुलीच्या १८ वर्षांपर्यंत ठेवण्यासाठी वैशालीताई देशमुख बालिका बचाव योजना मान्यवरांच्या हस्ते सुुरू करण्यात आली. प्रास्ताविकात सभापती शिवाजी हुडे यांनी बाजार समितीकडून १ हजार ८९७ जणांना लाभ दिल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रा. गोविंद भालेराव व संचालक ॲड. पद्माकर उगिले यांनी केले. आभार संचालक मधुकर एकुर्केकर यांनी मानले.

लोकशाहीत इमान राखणे गरजेचे...आज राज्यात विचारांशी एकनिष्ठ नसलेला महाराष्ट्र दिसत आहे. मतदाराला गृहीत धरून विचारांना सोडचिठ्ठी देण्याचे काम लोकप्रतिनिधींकडून होत आहे. लोकशाहीत लोकांशी इमान राखणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्षाने सामान्य माणसांशी असलेली बांधिलकी जपली आहे. उदगीर व जळकोट तालुक्यांत महाविकास आघाडी विचाराचा आजही मतदार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वांनी एकदिलाने काम करून बहुमत मिळवावे, असेही माजी मंत्री आ. अमित देशमुख म्हणाले.

कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर काम करावे...काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर काम करीत राहावे. त्यामुळे सामान्य जनतेशी, पक्षांच्या विचारांची नाळ कायम राहते. सर्वसामान्यांच्या विकासासाठी व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी काँग्रेस पक्षाचे फार मोठे योगदान आहे. जिल्हा बँक, मांजरा परिवारातील साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविण्याचे काम झाले असल्याचे जिल्हा बँकेचे चेअरमन आ. धीरज देशमुख म्हणाले.

टॅग्स :laturलातूरDilip Deshmukhदिलीप देशमुख