शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
5
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
6
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
7
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
8
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
9
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
10
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
11
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
12
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
13
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
14
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
15
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
16
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
17
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
18
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
19
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
20
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 

उदगीरच्या मार्केटयार्डसाठी ५० एकर जागा मिळवून देणार; दिलीपराव देशमुख यांची ग्वाही

By संदीप शिंदे | Updated: August 10, 2023 19:29 IST

उदगीर येथे शेतकरी, हमाल, मापाडी व नूतन संचालकांच्या वतीने आयोजित स्नेह व ऋणनिर्देश मेळाव्यात माजी मंत्री दिलीपराव देशमुख बोलत होते.

उदगीर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत चालणाऱ्या मार्केटयार्डसाठी आगामी काळात ५० एकर जमीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी बुधवारी येथे दिली.

उदगीर येथे शेतकरी, हमाल, मापाडी व नूतन संचालकांच्या वतीने आयोजित स्नेह व ऋणनिर्देश मेळाव्यात ते बोलत होते. मंचावर माजी मंत्री आ. अमित देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन आ. धीरज देशमुख, माजी आ. त्र्यंबक भिसे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, ‘रेणा’चे चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेच्या संचालिका लक्ष्मीताई भोसले, ॲड. प्रमोद जाधव, रवींद्र काळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजी मुळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याणराव पाटील, उषाताई कांबळे, सभापती शिवाजी हुडे, उपसभापती प्रीती भोसले, मंजूरखाँ पठाण, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटूरे, मारोती पांडे आदींसह संचालक उपस्थित होते. 

माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले, देशाची प्रगती काँग्रेस पक्षाने केली. लोकशाही जिवंत ठेवण्याचे कार्य काँग्रेसने केली असून, ते जपायची जबाबदारी तुम्हा-आम्हावर आली आहे. सध्याचे वातावरण पाहता नागरिकांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतला तरच लोकशाही अस्तित्वात राहील, असेही ते म्हणाले. यावेळी बाजार समितीकडून शेतकऱ्यांच्या घरी जन्मास येणाऱ्या मुलीच्या नावाने राष्ट्रीय बँकेत पाच हजार रुपयांची ठेव मुलीच्या १८ वर्षांपर्यंत ठेवण्यासाठी वैशालीताई देशमुख बालिका बचाव योजना मान्यवरांच्या हस्ते सुुरू करण्यात आली. प्रास्ताविकात सभापती शिवाजी हुडे यांनी बाजार समितीकडून १ हजार ८९७ जणांना लाभ दिल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रा. गोविंद भालेराव व संचालक ॲड. पद्माकर उगिले यांनी केले. आभार संचालक मधुकर एकुर्केकर यांनी मानले.

लोकशाहीत इमान राखणे गरजेचे...आज राज्यात विचारांशी एकनिष्ठ नसलेला महाराष्ट्र दिसत आहे. मतदाराला गृहीत धरून विचारांना सोडचिठ्ठी देण्याचे काम लोकप्रतिनिधींकडून होत आहे. लोकशाहीत लोकांशी इमान राखणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्षाने सामान्य माणसांशी असलेली बांधिलकी जपली आहे. उदगीर व जळकोट तालुक्यांत महाविकास आघाडी विचाराचा आजही मतदार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वांनी एकदिलाने काम करून बहुमत मिळवावे, असेही माजी मंत्री आ. अमित देशमुख म्हणाले.

कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर काम करावे...काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर काम करीत राहावे. त्यामुळे सामान्य जनतेशी, पक्षांच्या विचारांची नाळ कायम राहते. सर्वसामान्यांच्या विकासासाठी व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी काँग्रेस पक्षाचे फार मोठे योगदान आहे. जिल्हा बँक, मांजरा परिवारातील साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविण्याचे काम झाले असल्याचे जिल्हा बँकेचे चेअरमन आ. धीरज देशमुख म्हणाले.

टॅग्स :laturलातूरDilip Deshmukhदिलीप देशमुख