शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

उदगीरच्या मार्केटयार्डसाठी ५० एकर जागा मिळवून देणार; दिलीपराव देशमुख यांची ग्वाही

By संदीप शिंदे | Updated: August 10, 2023 19:29 IST

उदगीर येथे शेतकरी, हमाल, मापाडी व नूतन संचालकांच्या वतीने आयोजित स्नेह व ऋणनिर्देश मेळाव्यात माजी मंत्री दिलीपराव देशमुख बोलत होते.

उदगीर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत चालणाऱ्या मार्केटयार्डसाठी आगामी काळात ५० एकर जमीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी बुधवारी येथे दिली.

उदगीर येथे शेतकरी, हमाल, मापाडी व नूतन संचालकांच्या वतीने आयोजित स्नेह व ऋणनिर्देश मेळाव्यात ते बोलत होते. मंचावर माजी मंत्री आ. अमित देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन आ. धीरज देशमुख, माजी आ. त्र्यंबक भिसे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, ‘रेणा’चे चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेच्या संचालिका लक्ष्मीताई भोसले, ॲड. प्रमोद जाधव, रवींद्र काळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजी मुळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याणराव पाटील, उषाताई कांबळे, सभापती शिवाजी हुडे, उपसभापती प्रीती भोसले, मंजूरखाँ पठाण, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटूरे, मारोती पांडे आदींसह संचालक उपस्थित होते. 

माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले, देशाची प्रगती काँग्रेस पक्षाने केली. लोकशाही जिवंत ठेवण्याचे कार्य काँग्रेसने केली असून, ते जपायची जबाबदारी तुम्हा-आम्हावर आली आहे. सध्याचे वातावरण पाहता नागरिकांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतला तरच लोकशाही अस्तित्वात राहील, असेही ते म्हणाले. यावेळी बाजार समितीकडून शेतकऱ्यांच्या घरी जन्मास येणाऱ्या मुलीच्या नावाने राष्ट्रीय बँकेत पाच हजार रुपयांची ठेव मुलीच्या १८ वर्षांपर्यंत ठेवण्यासाठी वैशालीताई देशमुख बालिका बचाव योजना मान्यवरांच्या हस्ते सुुरू करण्यात आली. प्रास्ताविकात सभापती शिवाजी हुडे यांनी बाजार समितीकडून १ हजार ८९७ जणांना लाभ दिल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रा. गोविंद भालेराव व संचालक ॲड. पद्माकर उगिले यांनी केले. आभार संचालक मधुकर एकुर्केकर यांनी मानले.

लोकशाहीत इमान राखणे गरजेचे...आज राज्यात विचारांशी एकनिष्ठ नसलेला महाराष्ट्र दिसत आहे. मतदाराला गृहीत धरून विचारांना सोडचिठ्ठी देण्याचे काम लोकप्रतिनिधींकडून होत आहे. लोकशाहीत लोकांशी इमान राखणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्षाने सामान्य माणसांशी असलेली बांधिलकी जपली आहे. उदगीर व जळकोट तालुक्यांत महाविकास आघाडी विचाराचा आजही मतदार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वांनी एकदिलाने काम करून बहुमत मिळवावे, असेही माजी मंत्री आ. अमित देशमुख म्हणाले.

कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर काम करावे...काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर काम करीत राहावे. त्यामुळे सामान्य जनतेशी, पक्षांच्या विचारांची नाळ कायम राहते. सर्वसामान्यांच्या विकासासाठी व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी काँग्रेस पक्षाचे फार मोठे योगदान आहे. जिल्हा बँक, मांजरा परिवारातील साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविण्याचे काम झाले असल्याचे जिल्हा बँकेचे चेअरमन आ. धीरज देशमुख म्हणाले.

टॅग्स :laturलातूरDilip Deshmukhदिलीप देशमुख