शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मुरुडमध्ये तीन दुकानांस भीषण आग; लाखोंचे नुकसान

By संदीप शिंदे | Updated: June 28, 2023 18:17 IST

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन आग काही वेळातच आटाेक्यात आणली.

मुरुड : येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये असलेल्या तीन दुकानांना मंगळवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत तिनही दुकानातील सामान जळून खाक झाले असून, विकास साखर कारखानाच्या अग्निशमन दलाच्या वाहनाने घटनास्थळी तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली.

शॉर्टसर्किटमुळे मुरुड येथील किराणा दुकान, चायनीज सेंटर व चिकन सेंटर या तीन दुकानांना आग लागली. या आगीत दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेळके किराणा स्टोअर्स मधील दहा ते पंधरा लाखाचे किराणा सामान जळून खाक झाले. तसेच ब्रह्मा चायनीज सेंटरमधील दोन सिलेंडर पैकी एका सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये हॉटेलमधील फर्निचर, टेबल जळाले असून, चिकन सेंटरचे ही नुकसान झाले आहे.

आग लागलेल्या दुकानाच्या आजूबाजूला अनेक दुकाने आहेत. त्या दुकानाला ही आग लागण्याची शक्यता होती. मात्र अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन आग आटाेक्यात आणली. यावेळी माजी सरपंच अभयसिंह नाडे, उपसरपंच हनुमंत नागटीळक, दत्ता नाडे, डॉ. हनुमान चांडक, डॉ. राजेंद्र बाहेती, नागनाथ बचाटे व परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर