शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

यंदा उडीद, मूगाचा पेरा वाढला; पांढऱ्या सोन्याची लागवड दुप्पट!

By हरी मोकाशे | Updated: July 29, 2024 18:57 IST

यंदा उडीद, मूगाचा पेरा वाढला; पांढऱ्या सोन्याची लागवड दुप्पट!

लातूर : यंदा मृगाने दमदार बरसात केल्याने जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून खरीप पेरण्यांना प्रारंभ झाला. वरुणराजाचे वेळेवर आगमन झाल्याने जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा उडीद, मुगाचा पेरा वाढला आहे तर पांढरे सोने असलेल्या कापसाची लागवड दुप्पट झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९९.९९ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

जिल्ह्यात यंदा खरीपाचा ५ लाख ९९ हजार ४५५ हेक्टर क्षेत्रावर पेरा होईल, असा अंदाज जिल्हा कृषी विभागाने व्यक्त केला होता. त्यादृष्टीने बी- बियाणे, खतांचे नियोजन केले होते. दरम्यान, मान्सूनअगोदरच रोहिण्या चांगल्या बरसल्या होत्या. तद्नंतर मृगानेही वेळेवर दमदार वर्षाव केला. तीव्र उन्हामुळे होरपळून निघालेल्या नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून बळीराजाने चाढ्यावर मूठ धरण्यास सुरुवात केली. पेरणीनंतर पिकांसाठी योग्य पाऊस झाल्याने खरीप पिके बहरली आहेत. सध्या आंतरमशागतीस वेग आला आहे.

यंदाची पेरा (हेक्टर)...सोयाबीन - ४९०९०६तूर - ७१४७५मूग - ७१४१उडीद - ५९४४कापूस - १६२३८

सन २०२३ मध्ये पेरा (हेक्टर)...सोयाबीन - ५४८१७०तूर - ६४३९६मूग - ४४४९उडीद - २९७०कापूस - ७५३५सन २०२२ मध्ये पेरा (हेक्टर)...सोयाबीन - ४८९७५२तूर - ६८८८८मूग - ६०७६उडीद - ४०१९कापूस - ६१९१

जिल्ह्यात आतापर्यंत ४५१.५ मिमी पाऊस...लातूर - ४५७.०औसा - ४६१.१अहमदपूर - ५३५.९निलंगा - ४३४.७उदगीर - ३९९.६चाकूर - ४७२.५रेणापूर - ५४८.९देवणी - ३५०.३शिरुर अनं. - ३६४.१जळकोट - ४०८.२

सोयाबीनच्या क्षेत्रात ५७ हजार हेक्टरची घट...गेल्या दोन वर्षांपासून बाजारपेठेत सोयाबीनला भाव नाही. त्यामुळे लागवडीचा खर्चही पदरी पडत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. आगामी काळात चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा फोल ठरली आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीनऐवजी अन्य पिकांकडे लक्ष केंद्रित केले आहे. परिणामी, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास ५७ हजार हेक्टर क्षेत्राची घट झाल्याचे दिसून येत आहे.

आतापर्यंत ९९.९९ टक्के पेरणी...जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ९९.९९ टक्के खरीपाची पेरणी झाली आहे. लातूर तालुक्यात १०९.७८, औसा - १०९.१९, अहमदपूर- ९४.६, निलंगा - ८९.४४, शिरुर अनं. - ९४.३४, उदगीर- ९९.१२, चाकूर - १०२.१७, रेणापूर -९९.१२, देवणी - ९६.६३, जळकोट -१०३.८९ टक्के पेरणी झाली आहे.

वेळेवर पाऊस, लवकर पेरणी...गेल्या दोन वर्षांत उशीरा पाऊस झाल्याने खरीप पेरण्याही विलंबाने झाल्या. त्यामुळे उडीद, मुगाचा पेरा घटला होता. यंदा वेळेवर पाऊस झाल्याने पेरण्याही लवकर सुरु झाल्या. परिणामी, तूर, उडीद, मुगाचे क्षेत्र वाढले आहे. काही शेतकऱ्यांनी कपाशीकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे यंदा कापसाची लागवड वाढली आहे.- रमेश जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी