शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

यंदा उडीद, मूगाचा पेरा वाढला; पांढऱ्या सोन्याची लागवड दुप्पट!

By हरी मोकाशे | Updated: July 29, 2024 18:57 IST

यंदा उडीद, मूगाचा पेरा वाढला; पांढऱ्या सोन्याची लागवड दुप्पट!

लातूर : यंदा मृगाने दमदार बरसात केल्याने जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून खरीप पेरण्यांना प्रारंभ झाला. वरुणराजाचे वेळेवर आगमन झाल्याने जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा उडीद, मुगाचा पेरा वाढला आहे तर पांढरे सोने असलेल्या कापसाची लागवड दुप्पट झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९९.९९ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

जिल्ह्यात यंदा खरीपाचा ५ लाख ९९ हजार ४५५ हेक्टर क्षेत्रावर पेरा होईल, असा अंदाज जिल्हा कृषी विभागाने व्यक्त केला होता. त्यादृष्टीने बी- बियाणे, खतांचे नियोजन केले होते. दरम्यान, मान्सूनअगोदरच रोहिण्या चांगल्या बरसल्या होत्या. तद्नंतर मृगानेही वेळेवर दमदार वर्षाव केला. तीव्र उन्हामुळे होरपळून निघालेल्या नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून बळीराजाने चाढ्यावर मूठ धरण्यास सुरुवात केली. पेरणीनंतर पिकांसाठी योग्य पाऊस झाल्याने खरीप पिके बहरली आहेत. सध्या आंतरमशागतीस वेग आला आहे.

यंदाची पेरा (हेक्टर)...सोयाबीन - ४९०९०६तूर - ७१४७५मूग - ७१४१उडीद - ५९४४कापूस - १६२३८

सन २०२३ मध्ये पेरा (हेक्टर)...सोयाबीन - ५४८१७०तूर - ६४३९६मूग - ४४४९उडीद - २९७०कापूस - ७५३५सन २०२२ मध्ये पेरा (हेक्टर)...सोयाबीन - ४८९७५२तूर - ६८८८८मूग - ६०७६उडीद - ४०१९कापूस - ६१९१

जिल्ह्यात आतापर्यंत ४५१.५ मिमी पाऊस...लातूर - ४५७.०औसा - ४६१.१अहमदपूर - ५३५.९निलंगा - ४३४.७उदगीर - ३९९.६चाकूर - ४७२.५रेणापूर - ५४८.९देवणी - ३५०.३शिरुर अनं. - ३६४.१जळकोट - ४०८.२

सोयाबीनच्या क्षेत्रात ५७ हजार हेक्टरची घट...गेल्या दोन वर्षांपासून बाजारपेठेत सोयाबीनला भाव नाही. त्यामुळे लागवडीचा खर्चही पदरी पडत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. आगामी काळात चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा फोल ठरली आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीनऐवजी अन्य पिकांकडे लक्ष केंद्रित केले आहे. परिणामी, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास ५७ हजार हेक्टर क्षेत्राची घट झाल्याचे दिसून येत आहे.

आतापर्यंत ९९.९९ टक्के पेरणी...जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ९९.९९ टक्के खरीपाची पेरणी झाली आहे. लातूर तालुक्यात १०९.७८, औसा - १०९.१९, अहमदपूर- ९४.६, निलंगा - ८९.४४, शिरुर अनं. - ९४.३४, उदगीर- ९९.१२, चाकूर - १०२.१७, रेणापूर -९९.१२, देवणी - ९६.६३, जळकोट -१०३.८९ टक्के पेरणी झाली आहे.

वेळेवर पाऊस, लवकर पेरणी...गेल्या दोन वर्षांत उशीरा पाऊस झाल्याने खरीप पेरण्याही विलंबाने झाल्या. त्यामुळे उडीद, मुगाचा पेरा घटला होता. यंदा वेळेवर पाऊस झाल्याने पेरण्याही लवकर सुरु झाल्या. परिणामी, तूर, उडीद, मुगाचे क्षेत्र वाढले आहे. काही शेतकऱ्यांनी कपाशीकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे यंदा कापसाची लागवड वाढली आहे.- रमेश जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी