शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

चार महिन्यांपासून अनुदानाचा छदामही नाही; ५३ कोटी थकल्याने लाभार्थी आर्थिक संकटात!

By हरी मोकाशे | Updated: August 9, 2024 18:42 IST

उसनवारी करुन बांधकाम साहित्याची खरेदी

लातूर : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावून त्यांची प्रगती व्हावी म्हणून मग्रारोहयोअंतर्गत विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. मात्र, चार महिन्यांपासून बांधकाम व अन्य आवश्यक साहित्याचे ५३ कोटी ५३ लाखांचे अनुदान थकित राहिले आहे. दरम्यान, काही लाभार्थ्यांनी वेळेवर अनुदान मिळेल, या आशेने उसनवारी केली. परंतु, अनुदानापोटी शासनाकडून छदामही मिळाला नसल्याने आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाकडे वारंवार चौकशी करीत आहेत.

ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळावे आणि त्यातून शेती उपयोगी, पाणीपुरवठा, दळणवळण, पर्यावरण संवर्धनाची कामे व्हावीत व शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी म्हणून केंद्र शासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येते. या योजनेचा मजूर, शेतकऱ्यांना चांगला लाभ झाला आहे. त्यामुळे मग्रारोहयोअंतर्गतच्या कामांकडे अधिक लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. योजनेअंतर्गत दर आठवड्यास कामाचे मोजमाप करुन मजुरांना मजुरी दिली जाते तर अकुश म्हणजे आवश्यक साहित्यापोटी अनुदान देण्यात येते.

मग्रारोहयोअंतर्गत विविध ११ कामे...मग्रारोहयोअंतर्गत बांबू, वृक्ष लागवड, जनावरांचा गोठा, शेततळे, वैयक्तिक व सामुहिक सिंचन विहीर, रोपवाटिका, तुती लागवड, रस्ते, ग्रामपंचायत भवन, दुतर्फा वृक्ष लागवड, सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर अशी ११ प्रकारची कामे करण्यात येतात. या कामांसाठी रोपे, विटा, वाळू, सिमेंट, सळई अशा कामांसाठी कुशल म्हणून निधी देण्यात येतो.

सिंचन विहिरींचे १३ कोटी रखडले...कामाचा प्रकार - थकित रक्कमबांबू, वृक्ष लागवड - १० लाख ६ हजारजनावरांचा गोठा - १० कोटी ७० लाखशेततळे - २१ लाख ५५ हजारसिंचन विहीर - १२ कोटी ९६ लाखरोपवाटिका - ४ लाख ४४ हजारतुती लागवड - ३ लाख १५ हजाररस्ते - २८ कोटी ९९ लाखग्रामपंचायत भवन - ४२ लाख ४५ हजारशोषखड्डे - १ लाख ८४ हजारवृक्ष लागवड - ४५ हजारसार्वजनिक पाणीपुरवठा विहीर - ३ लाख ३९ हजारएकूण - ५३ कोटी ५३ लाखतालुका - प्रलंबित निधीअहमदपूर - २,४१,४८,०६०औसा - ५,४१,१७,३९७चाकूर - १०,९१,६८,३६८देवणी - ५,९५,७७,१९४जळकोट - १,३०,६०,९७२लातूर - ९,२५,१७,८६२निलंगा - ८,३६,३२,६९२रेणापूर - ४,५०,४५,१७१शिरुर अनं. - ३३,२६,१६४उदगीर - ५,०८,०३,११६एकूण - ५३,५३,९६,९९७

उसनवारी करुन गोठा बांधला...पशुधनाच्या संरक्षणासाठी मग्रारोहयोअंतर्गत गोठा बांधला. अनुदानापेक्षा अधिक प्रमाणात पैसा खर्च झाला. वेळेवर अनुदान मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, चार महिन्यांपासून अनुदानाची रक्कम मिळाली नसल्याने मोठी अडचण झाली आहे. शासनाने लवकरात लवकर अनुदान द्यावे.- अर्जुन उटगे, हरंगुळ बु.

गोठा बांधल्यामुळे पेरणीला पैसे नव्हते...मग्रारोहयोअंतर्गतच्या कामाचे वेळेवर पैसे मिळतात म्हणून शेतात गोठा बांधला. मात्र, अनुदानाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे खरीप पेरणीवेळी अडचण निर्माण झाली. तेव्हा उसनवारी करावी लागली. शासनाने अनुदानाचे लवकर वितरण करावे.- नागेश वाघमारे, हरंगुळ बु.

शासनाकडे अनुदानाची मागणी...मग्रारोहयोअंतर्गत अनुदान ऑनलाईनरित्या जमा होतात. काही दिवसांपासून कुशलचे अनुदान थकित राहिले असल्याने शासनाकडे अनुदान मागणी केली आहे. निधी प्राप्त होताच लाभार्थ्यांना कळविण्यात येईल.- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.

टॅग्स :laturलातूर