शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

लोकसहभागाची ताकद! ३ कोटींच्या लोकवाट्याने उजळल्या जिल्हा परिषद शाळा, पटसंख्या वाढली

By संदीप शिंदे | Updated: August 4, 2022 20:05 IST

बाला उपक्रम : एकाच वर्षात तीन हजारांनी वाढली पटसंख्या 

- संदीप शिंदेलातूर : सध्याच्या काळात इंग्रजी शाळांकडे विद्यार्थी, पालकांचा ओढा वाढल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांतील पटसंख्या दरवर्षी खालावत होती. खेड्यापाड्यातीलही पालकांनी आपल्या मुलाला इंग्रजी शाळेतच शिक्षण देण्याचा ध्यास घेतला होता. दरम्यान, लातूर जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या बाला उपक्रमामुळे गावातील नागरिकांनी गावची शाळाच समृध्द करुन पाल्यांना गावातच दर्जेदार शिक्षण मिळवून देऊ असा मनोदय केला. त्यामुळेच दोन वर्षांत जिल्ह्यातील शाळांसाठी ३ कोटींचा लोकवाटा जमा झाला आणि त्यातून शाळा उजळल्या आहेत.

इंग्रजी माध्यमांच्या शाळांप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या शाळाही व्हाव्यात म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने बिल्डिंग ॲज अ लर्निंग एड अर्थात बाला उपक्रम २०२० पासून सुरु करण्यात आला. जिल्ह्यात एकूण १ हजार २७८ शाळा असून २०२०-२१ च्या पहिल्या टप्प्यात ५०० शाळांची निवड करण्यात आली. उपक्रमाअंतर्गत शाळेच्या इमारतीचे बांधकाम, रंगरंगोटी, शालेय परिसरातील झाडांभोवती भौमितिक आकाराचे कठडे बांधणे, दिव्यांग मुलांसाठी रॅम्प, सौरघड्याळ, लपंडाव भिंत, रेन वॉटर हार्वेस्टिंग, बायोगॅसची निर्मिती, गांडूळ खत निर्मिती, गिलाव्यावर अक्षर- अंक, खिडक्यांच्या लोखंडी ग्रिलचा अक्षर ओळखसाठी उपयोग, रिकाम्या जागेत निसर्ग शाळा उभारणे, मैलाचे दगड, दिशादर्शक फलक, खुली जीम उभारणे, विद्यार्थ्यांच्या उंचीनुसार फलक लावणे, छतावरील पंख्यांना आकर्षक रंगरंगोटी करणे, वर्गातील फरशीवर बाराखडी, सापसिडी साकारणे, वर्गखोल्यांची लांबी-रुंदी दर्शविणे, पत्रपेटी, जुन्या टायरपासून झोका तयार करणे, सूर्यमाला, पक्ष्यांसाठी अन्न पाण्याची झाडावर सोय करणे आदींचा समावेश असल्याचे प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी सांगितले. हा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याने दुसऱ्या वर्षी ५०० शाळांची निवड करण्यात आली आहे. 

सेस फंडातून एक कोटींची तरतूद...बाला उपक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून पहिल्या वर्षी ४९ लाख ८७ हजार तर दुसऱ्या वर्षी ५० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गावकऱ्यांनी आतापर्यंत जवळपास ३ कोटींचा लोकवाटा दिला आहे.

आनंददायी वातावरणात गुणवत्तापूर्ण शिक्षण...बाला उपक्रमातून शाळांची रंगरंगोटीच नव्हे तर अन्य मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. पारंपारिकबरोबरच अपारंपारिक पध्दतीने आणि आनंददायी वातावरणात विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्या वाढली आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी हा उपक्रम आहे.- अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

टॅग्स :Educationशिक्षणlaturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद