शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागाची ताकद! ३ कोटींच्या लोकवाट्याने उजळल्या जिल्हा परिषद शाळा, पटसंख्या वाढली

By संदीप शिंदे | Updated: August 4, 2022 20:05 IST

बाला उपक्रम : एकाच वर्षात तीन हजारांनी वाढली पटसंख्या 

- संदीप शिंदेलातूर : सध्याच्या काळात इंग्रजी शाळांकडे विद्यार्थी, पालकांचा ओढा वाढल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांतील पटसंख्या दरवर्षी खालावत होती. खेड्यापाड्यातीलही पालकांनी आपल्या मुलाला इंग्रजी शाळेतच शिक्षण देण्याचा ध्यास घेतला होता. दरम्यान, लातूर जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या बाला उपक्रमामुळे गावातील नागरिकांनी गावची शाळाच समृध्द करुन पाल्यांना गावातच दर्जेदार शिक्षण मिळवून देऊ असा मनोदय केला. त्यामुळेच दोन वर्षांत जिल्ह्यातील शाळांसाठी ३ कोटींचा लोकवाटा जमा झाला आणि त्यातून शाळा उजळल्या आहेत.

इंग्रजी माध्यमांच्या शाळांप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या शाळाही व्हाव्यात म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने बिल्डिंग ॲज अ लर्निंग एड अर्थात बाला उपक्रम २०२० पासून सुरु करण्यात आला. जिल्ह्यात एकूण १ हजार २७८ शाळा असून २०२०-२१ च्या पहिल्या टप्प्यात ५०० शाळांची निवड करण्यात आली. उपक्रमाअंतर्गत शाळेच्या इमारतीचे बांधकाम, रंगरंगोटी, शालेय परिसरातील झाडांभोवती भौमितिक आकाराचे कठडे बांधणे, दिव्यांग मुलांसाठी रॅम्प, सौरघड्याळ, लपंडाव भिंत, रेन वॉटर हार्वेस्टिंग, बायोगॅसची निर्मिती, गांडूळ खत निर्मिती, गिलाव्यावर अक्षर- अंक, खिडक्यांच्या लोखंडी ग्रिलचा अक्षर ओळखसाठी उपयोग, रिकाम्या जागेत निसर्ग शाळा उभारणे, मैलाचे दगड, दिशादर्शक फलक, खुली जीम उभारणे, विद्यार्थ्यांच्या उंचीनुसार फलक लावणे, छतावरील पंख्यांना आकर्षक रंगरंगोटी करणे, वर्गातील फरशीवर बाराखडी, सापसिडी साकारणे, वर्गखोल्यांची लांबी-रुंदी दर्शविणे, पत्रपेटी, जुन्या टायरपासून झोका तयार करणे, सूर्यमाला, पक्ष्यांसाठी अन्न पाण्याची झाडावर सोय करणे आदींचा समावेश असल्याचे प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी सांगितले. हा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याने दुसऱ्या वर्षी ५०० शाळांची निवड करण्यात आली आहे. 

सेस फंडातून एक कोटींची तरतूद...बाला उपक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून पहिल्या वर्षी ४९ लाख ८७ हजार तर दुसऱ्या वर्षी ५० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गावकऱ्यांनी आतापर्यंत जवळपास ३ कोटींचा लोकवाटा दिला आहे.

आनंददायी वातावरणात गुणवत्तापूर्ण शिक्षण...बाला उपक्रमातून शाळांची रंगरंगोटीच नव्हे तर अन्य मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. पारंपारिकबरोबरच अपारंपारिक पध्दतीने आणि आनंददायी वातावरणात विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्या वाढली आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी हा उपक्रम आहे.- अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

टॅग्स :Educationशिक्षणlaturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद