शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

शेतात जाण्यासाठी कढईतून धोकादायक प्रवास; शेतमालही घराकडे आणता येईना

By संदीप शिंदे | Updated: November 29, 2024 12:06 IST

गुंजरगा येथील शेतकऱ्यांची व्यथा; अनेक वर्षांपासूनची समस्या आजही कायम

निलंगा : एकविसाव्या शतकाकडे धावणाऱ्या व जगात महासत्ता होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या देशात आजही शेतकऱ्यांना आपल्या शेताकडे जाण्यासाठी पाण्यातून कढईमध्ये बसून जावे लागत असल्याचे चित्र आहे. शेतमाल घरी आणता येत नसल्याने अधिकचा खर्च करुन इतरत्र बाजारपेठेत न्यावा लागत आहे. ही व्यथा निलंगा तालुक्यातील गुंजरगा येथील शेतकऱ्यांची असून, पर्यायी पूल किंवा व्यवस्था प्रशासनाने करुन देण्याची मागणी होत आहे.

निलंगा तालुक्यातील तेरणा नदीच्या तीरावर गुंजरगा गाव आहे. या गावातील २० ते २५ शेतकऱ्यांची शेती ही नदीच्या पलीकडच्या तीरालगत आहे. मात्र, नदीला पाणी असल्यामुळे गावाच्या लोकांनी लोखंडाची कढई तयार करून त्यातून आपल्या शेताकडे ये-जा करावी लागते. त्यातच शेतात झालेला शेतमाल गावाकडे घेऊन येण्यासाठी दळणवळणाची कसलीही सोय नाही. अन्नधान्याची पोती कढईतून आणणे शक्य नाही म्हणून घरासाठी लागणारे जेमतेम अन्नधान्य खांद्यावर घेऊन कढईतून प्रवास करून घराकडे घेऊन येतात. उर्वरित शेतमाल परस्पर निलंगा, औराद, लातूर याठिकाणी विक्री करण्याशिवाय पर्याय नाही. मिळेल त्या भावात शेतमाल विकून मिळेल तेवढे पैसे पदरात पाडून घ्यावे लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूकही होते. यासंदर्भात ग्रामस्थांनी याठिकाणी किमान लोखंडी पूल करून पायवाट करून द्यावी अशी मागणी ग्रामसभेत अनेकवेळेला केली. मात्र, हे काम ग्रामपंचायतचे नसून संबंधित विभागाकडे पायपीट करूनही ग्रामस्थांना अद्याप यश आलेले नाही. किती दिवस कडईतून प्रवास करावा असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे.

शेतकऱ्यांकडून सेतू पुलाची मागणी...नदीवरील या तीरावरून त्या तीरावर जाण्यासाठी सेतूपूल बांधावा ही मागणी गेल्या चार पिढीपासून केली जात असल्याचे रामेश्वर धुमाळ यांनी सांगितले. शासनाकडे मोठ्या प्रमाणात बजेट उपलब्ध नसेल तर किमान लोखंडाचा छोटा पूल बनवून येण्या-जाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी शांतीलाल धुमाळ यांनी केली. नदीवर किमान मध्यम स्वरूपाचा बंधारा बांधावा म्हणजे त्यावरून ये-जा करण्यास सोपे जाईल. उन्हाळ्यात पाणी टिकून राहावे म्हणून पाणीही अडवता येईल व परिसरातील शेतकऱ्यांचा फायदा होईल असे विठ्ठल धुमाळ यांनी सांगितले.

लोखंडी बॅरेजेस, पूल बांधावा...नदीतून सुभाष धुमाळ, बालाजी धुमाळ, अनंत धुमाळ, समाधान धुमाळ, शांतीलाल धुमाळ, विठ्ठल धुमाळ, विनायक धुमाळ, बाळू धुमाळ, रामेश्वर धुमाळ, विमलबाई धुमाळ, दत्ता धुमाळ, सत्यवान धुमाळ, भगवान धुमाळ, पार्वती धुमाळ, संतोष धुमाळ, कोंडाबाई धुमाळ, विलास धुमाळ आदी शेतकऱ्यांना या त्रासाला रोजच सामोरे जावे लागत आहे. यासाठी शासनाने त्वरित निधी उपलब्ध करून येथे लोखंडी पूल किंवा मध्यम स्वरूपाचे बॅरेजेस उभा करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींकडे केली आहे.

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी