शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
4
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
5
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
6
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
7
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
8
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
9
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
10
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
11
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
12
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
13
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
14
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
15
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
16
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
17
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
18
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
19
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
20
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता

शेतात जाण्यासाठी कढईतून धोकादायक प्रवास; शेतमालही घराकडे आणता येईना

By संदीप शिंदे | Updated: November 29, 2024 12:06 IST

गुंजरगा येथील शेतकऱ्यांची व्यथा; अनेक वर्षांपासूनची समस्या आजही कायम

निलंगा : एकविसाव्या शतकाकडे धावणाऱ्या व जगात महासत्ता होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या देशात आजही शेतकऱ्यांना आपल्या शेताकडे जाण्यासाठी पाण्यातून कढईमध्ये बसून जावे लागत असल्याचे चित्र आहे. शेतमाल घरी आणता येत नसल्याने अधिकचा खर्च करुन इतरत्र बाजारपेठेत न्यावा लागत आहे. ही व्यथा निलंगा तालुक्यातील गुंजरगा येथील शेतकऱ्यांची असून, पर्यायी पूल किंवा व्यवस्था प्रशासनाने करुन देण्याची मागणी होत आहे.

निलंगा तालुक्यातील तेरणा नदीच्या तीरावर गुंजरगा गाव आहे. या गावातील २० ते २५ शेतकऱ्यांची शेती ही नदीच्या पलीकडच्या तीरालगत आहे. मात्र, नदीला पाणी असल्यामुळे गावाच्या लोकांनी लोखंडाची कढई तयार करून त्यातून आपल्या शेताकडे ये-जा करावी लागते. त्यातच शेतात झालेला शेतमाल गावाकडे घेऊन येण्यासाठी दळणवळणाची कसलीही सोय नाही. अन्नधान्याची पोती कढईतून आणणे शक्य नाही म्हणून घरासाठी लागणारे जेमतेम अन्नधान्य खांद्यावर घेऊन कढईतून प्रवास करून घराकडे घेऊन येतात. उर्वरित शेतमाल परस्पर निलंगा, औराद, लातूर याठिकाणी विक्री करण्याशिवाय पर्याय नाही. मिळेल त्या भावात शेतमाल विकून मिळेल तेवढे पैसे पदरात पाडून घ्यावे लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूकही होते. यासंदर्भात ग्रामस्थांनी याठिकाणी किमान लोखंडी पूल करून पायवाट करून द्यावी अशी मागणी ग्रामसभेत अनेकवेळेला केली. मात्र, हे काम ग्रामपंचायतचे नसून संबंधित विभागाकडे पायपीट करूनही ग्रामस्थांना अद्याप यश आलेले नाही. किती दिवस कडईतून प्रवास करावा असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे.

शेतकऱ्यांकडून सेतू पुलाची मागणी...नदीवरील या तीरावरून त्या तीरावर जाण्यासाठी सेतूपूल बांधावा ही मागणी गेल्या चार पिढीपासून केली जात असल्याचे रामेश्वर धुमाळ यांनी सांगितले. शासनाकडे मोठ्या प्रमाणात बजेट उपलब्ध नसेल तर किमान लोखंडाचा छोटा पूल बनवून येण्या-जाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी शांतीलाल धुमाळ यांनी केली. नदीवर किमान मध्यम स्वरूपाचा बंधारा बांधावा म्हणजे त्यावरून ये-जा करण्यास सोपे जाईल. उन्हाळ्यात पाणी टिकून राहावे म्हणून पाणीही अडवता येईल व परिसरातील शेतकऱ्यांचा फायदा होईल असे विठ्ठल धुमाळ यांनी सांगितले.

लोखंडी बॅरेजेस, पूल बांधावा...नदीतून सुभाष धुमाळ, बालाजी धुमाळ, अनंत धुमाळ, समाधान धुमाळ, शांतीलाल धुमाळ, विठ्ठल धुमाळ, विनायक धुमाळ, बाळू धुमाळ, रामेश्वर धुमाळ, विमलबाई धुमाळ, दत्ता धुमाळ, सत्यवान धुमाळ, भगवान धुमाळ, पार्वती धुमाळ, संतोष धुमाळ, कोंडाबाई धुमाळ, विलास धुमाळ आदी शेतकऱ्यांना या त्रासाला रोजच सामोरे जावे लागत आहे. यासाठी शासनाने त्वरित निधी उपलब्ध करून येथे लोखंडी पूल किंवा मध्यम स्वरूपाचे बॅरेजेस उभा करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींकडे केली आहे.

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी