शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पुण्यातील रेल्वेस्थानकात लातूरच्या प्रवाशांचा राडा ! लातुरात मुंबई-बीदर रेल्वे दाेन तास उशिरा पाेहचली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 19:33 IST

रविवारी ग्राम पंचायतीसाठी मदतन हाेत असल्याने, गावाकडे निघालेल्या चाकरमान्यांची पुणे रेल्वेस्थानकावर माेठ्या प्रमाणावर गर्दी झाली.

राजकुमार जोंधळे / लातूर : रविवारी ग्राम पंचायतीसाठी मदतन हाेत असल्याने, गावाकडे निघालेल्या चाकरमान्यांची पुणे रेल्वेस्थानकावर माेठ्या प्रमाणावर गर्दी झाली. दरम्यान, रात्री १२.३० वाजता मुंबई-बीदर एक्सप्रेस दाखल झाली. प्रवासी प्रवेश करण्यासाठी धडपडत हाेते. मात्र, रेल्वेचे दरवाजे आतून बंद केल्याने प्रवासी प्रचंड संतपाले. आमच्यासाठी सुरु केलेल्या रेल्वेचे दार बंद हाेते, हे चालणार नाही, अशी भूमिका घेत संतप्त लातूरकर प्रवाशांनी पुणे रेल्वेस्थानकावरच एकच गाेंधळ घातला. चक्क रेल्वेरुळावरच प्रवाशांनी आडवे पडून आंदाेलन केले. तब्बल दाेन तास उशिराने ही रेल्वे लातूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.

पुणे-मुंबईत कामानिमित्त स्थलांतरील झालेल्या हजाराे लातूरकर गावाकडे मतदानासाठी शनिवारी रात्री निघाले हाेते. दरम्यान, त्यांनी पुणे रेल्वेस्थानकावर गर्दी केली. मुंबई-बीदर एक्सप्रेस पुणे रेल्वेस्थानकावर वेळवर दाखल झाली. मुंबईवरुनच रेल्वे प्रवाशांनी खचाखच भरली हाेती. पुणे रेल्वेस्थानकावर रेल्वे दाखल झाल्यावर... रेल्वेत जागा नसल्याच्या कारणाने आतील प्रवाशांनी दरवाजे घडले नाहीत. पुणे आणि परिसरात राहणारे हजाराे लातूरकर गावाकडे येत हाेते. त्यावेळी रेल्वेत जागा नव्हती. परिस्थिती लक्षा घेत लाेकांनी उत्स्फूर्तपणे रेल्वे इंजिनसामाेर ठिय्या मांडला. जाेरजाेरात घाेषणाबाजी सुरु केली. महिला, तरुण मुलांचा आंदाेलनात सहभाग हाेता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत रेल्वे पाेलीस दाखल झाले. नागरिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजे उघडल्याशिवाय, सर्व प्रवासी रेल्वेत बसल्याशिवाय रेल्वे जाग्यावरुन हलणार नाही, अशी आक्रमक भूमिका लातूरच्या प्रवाशांनी घेतली. लातूरकरांना जागा नसल्याच्या विराेधात संतप्त महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली.

शेवटी रेल्वे पाेलिसांनी उघडले दरवाजे...

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने रेल्वे पाेलिसांनी पुढकार घेत रेल्वेच्या डब्यांचे दरवाजे उघडले. सर्व प्रवांशाना रेल्वेत बसवण्यात जवळपास दाेन तासांचा कालावधी गेला. जवळपास दाेन तास उशिराने लातूर-बीदर एक्सप्रेस रेल्वे मार्गस्थ झाली.

लातुरात उशिराने दाखल झाली रेल्वे...

दरराेज निर्धारित वेळेवर लातूरच्या रेल्वे स्थानकावर दाखल हाेणारी मुंबई एक्सप्रेस आज दाेन तास उशिराने दाखल झाली. सकाळी सहा वाजता येणारी रेल्वे आज मात्र, आठ वाजता दाखल झाली. परिणामी, ग्रामीण भागातील हजाराे प्रवाशांची माेठ्या प्रमाणावर हेळसांड झाली. 

- बिमलकुमार तिवारी, रेल्वे वाहतूक निरीक्षक, लातूर

टॅग्स :laturलातूर