शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मोठा दिलासा! दमदार पावसाने लातूर जिल्ह्याचा भू-जलस्तर १.३५ मीटरने वाढला

By संदीप शिंदे | Updated: October 20, 2022 18:37 IST

चांगला पाऊस असल्याने भूजल पातळीत वाढ

लातूर : मागील तीन ते चार वर्षांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. यावर्षीही समाधानकारक पाऊस झाला असल्याने लघु, मध्यम प्रकल्पांत मुबलक पाणीसाठा निर्माण झाला आहे. परिणामी, जिल्ह्याची पाणीपातळी १.३५ मीटरे वाढली आहे. 

जूनच्या सुरुवातीला उशिरा पाऊस झाला. जुलै महिन्यात सर्वच भागात तर ऑगस्ट महिन्यात पावसाची मोठ्या प्रमाणात हजेरी होती. आता ऑक्टोबर महिना सुरू असला तरी मागील चार दिवसांपूर्वी औराद, निलंगा, औसा तालुक्यात पावसाने हजेरी लावली. काही महसूल मंडळांत तर अतिवृष्टीही झालेली आहे. त्यामुळे नदी, ओढे, नाले प्रवाहित झाले होते. त्यामुळे भूजलाचे पुनर्भरण झाले असून, ऑक्टोबर महिन्यात पाणीपातळीत वाढ झाली आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा भूजल पातळीत १.३५ मीटरने वाढ झाली असून, ही दिलासादायक बाब आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून झालेला समाधानकारक पाऊस भूजल पातळी वाढीसाठी पोषक ठरला असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.

तालुकानिहाय पाणीपातळीतील वाढमागील पाच वर्षांच्या तुलनेत अहमदपूर तालुक्यात १.६१ मीटर, औसा २.१२, चाकूर १.१२, लातूर २.५०, निलंगा १.१८, शिरूर अनंतपाळ ०.२१, रेणापूर १.०१, उदगीर १.३२, जळकोट २.०६, देवणी ०.३५ अशी एकूण सरासरी १.३५ मीटरने पाणीपातळी वाढली असल्याचे समोर आले आहे.

प्रत्येकी तीन महिन्यांनी नोंद...भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे दर तीन महिन्यांनी सर्व तालुक्यांतील निरीक्षण विहिरींच्या स्थिर पातळीची नोंद घेतली जाते. यंदा झालेले पर्जन्यमान व मागील पाच वर्षांच्या पाणीपातळीचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. सप्टेंबर महिन्यात भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या निरीक्षण नोंदीतून भूजलस्तर १.७९ मीटरने वर आल्याचे समोर आले आहे.

जलसंवर्धनासाठी पुढाकार घ्यावा...जिल्ह्यात मागील आणि यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे पाच वर्षांच्या तुलनेत यंदा १.३५ मीटरने पाणीपातळी वाढलेली आहे. पाणीपातळी वाढली असली तरी पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब साठविणे आवश्यक आहे. जलसंवर्धनासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. - एस. बी. गायकवाड, वरिष्ठ भूवैज्ञानिक लातूर

टॅग्स :laturलातूरRainपाऊस