शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

आपसी बदलीचे कर्मचाऱ्यांनी केलं चलाख नियोजन; सीईओंनी ओळखलं अन् उचलेलं मोठे पाऊल

By हरी मोकाशे | Updated: May 26, 2023 18:45 IST

प्रशासकीय बदली टाळण्यासाठी आपसी बदलीचा प्रस्ताव सादर

लातूर : पुढील वर्षीच्या प्रशासकीय बदलीतून सहजरीत्या सुटका व्हावी आणि लातूर शहर व नजिकच्या तालुक्यात आपले बस्तान काही वर्षे कायम रहावे म्हणून जिल्हा परिषदेतील जवळपास ४२ कर्मचाऱ्यांनी आपसी बदलीसाठी प्रस्ताव दाखल केले होते. मात्र, सीईओंनी या कर्मचाऱ्यांचा चलाखीपणा ओळखून विनंतीवरून आपसी बदल्याच केल्या नाहीत. परिणामी, या कर्मचाऱ्यांच्या नियोजनावर पाणी फिरले आहे.

लातूर शहर व तालुक्यात तसेच नजिकच्या औसा, रेणापूर आणि शेवटचा पर्याय म्हणून चाकूर तालुक्यातील मुख्य मार्गावरील ठिकाणच्या गावांत कार्यरत राहण्यास बहुतांश अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ओढा असतो. घर लातुरात आणि नोकरी जवळच्या तालुक्यात. त्यामुळे वेळेत नोकरीच्या ठिकाणी जाऊन लवकरच घरात पोहोचण्याची सोय होते. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी रहावे, असा नियम असला तरी बहुतांश जण नियमाचे किती पालन करतात, अशी मानसिकता असते.

गेल्या आठवड्यापासून जिल्हा परिषदेत वर्ग ३ आणि ४ मधील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय आणि विनंतीवरून बदल्या होत आहेत. या बदलीदरम्यान, लातूर, रेणापूर, औसा या तालुक्यात कार्यरत असलेल्या काही विभागाचे काही कर्मचारी पुढील वर्षी प्रशासकीय बदलीसाठी पात्र ठरत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी यंदापासूनच या तीन तालुक्यांशिवाय अन्य ठिकाणी जाण्याची पाळी येऊ नये म्हणून फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली होती. मात्र, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या दक्षतेमुळे त्यांच्या अपेक्षा धुळीस मिळाल्या आहेत.

आपसी बदलीमुळे १० वर्षे निवांत...जिल्हा परिषदेतील वर्ग- ३ व ४ मधील कर्मचाऱ्यांची प्रशासकीय बदली ही १० वर्षानंतर होते. दरम्यान, लातूर, औसा, रेणापूर येथे कार्यरत आणि ८ ते ९ वर्षे पूर्ण होत असलेल्या जवळपास ४२ कर्मचाऱ्यांनी पुढील वर्ष, दोन वर्षातील प्रशासकीय बदली टाळण्यासाठी आपसी बदलीचा प्रस्ताव सादर केला होता. एकदा आपसी बदली झाली की प्रशासकीय बदलीसाठी पुढे १० वर्षांचा कालावधी लागतो. तोपर्यंत निवांत राहता येते, असे कर्मचाऱ्यांचे धाेरण होते. मात्र, सीईओ गोयल यांनी या कर्मचाऱ्यांचे नियोजन ओळखून आपसी बदल्या न करण्याच्या सूचना केल्या.

शोधाशोध केली, पण काय उपयोग ?आपसी बदलीसाठी एकाच ठिकाणी ५ वर्ष कार्यरत राहण्याची अट असते. त्यामुळे पुढील वर्ष, दोन वर्षात प्रशासकीय बदलीसाठी पात्र ठरणाऱ्यांनी आपसी बदलीसाठी या तीन तालुक्यातील कर्मचाऱ्यांची शोधाशोध केली. शिवाय काही तडजोडी ही केल्या. पण, सीईओंनी आपसी बदल्या न केल्याने काहीही उपयोग झाला नसल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

प्रशासकीय बदलीत ठिकाण अनिश्चित...जिल्हा परिषदेत समुपदेशनाने बदल्या होत आहेत. प्रशासकीय बदली वेळीही कर्मचाऱ्यांना रिक्त जागा दाखविण्यात येतात. मात्र, कुठे नियुक्ती द्यायची याचे काही अधिकार सीईओंना आहेत. त्यामुळे काही कर्मचारी प्रशासकीय बदली टाळण्यासाठी आपसीचा मार्ग निवडतात. यंदा एकही आपसी बदली झाली नाही.- नितीन दाताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषदTransferबदली