शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
4
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
5
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
7
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
8
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
9
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
10
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
11
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
12
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
13
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
14
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
15
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
16
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
17
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास
18
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
19
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
20
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे

आपसी बदलीचे कर्मचाऱ्यांनी केलं चलाख नियोजन; सीईओंनी ओळखलं अन् उचलेलं मोठे पाऊल

By हरी मोकाशे | Updated: May 26, 2023 18:45 IST

प्रशासकीय बदली टाळण्यासाठी आपसी बदलीचा प्रस्ताव सादर

लातूर : पुढील वर्षीच्या प्रशासकीय बदलीतून सहजरीत्या सुटका व्हावी आणि लातूर शहर व नजिकच्या तालुक्यात आपले बस्तान काही वर्षे कायम रहावे म्हणून जिल्हा परिषदेतील जवळपास ४२ कर्मचाऱ्यांनी आपसी बदलीसाठी प्रस्ताव दाखल केले होते. मात्र, सीईओंनी या कर्मचाऱ्यांचा चलाखीपणा ओळखून विनंतीवरून आपसी बदल्याच केल्या नाहीत. परिणामी, या कर्मचाऱ्यांच्या नियोजनावर पाणी फिरले आहे.

लातूर शहर व तालुक्यात तसेच नजिकच्या औसा, रेणापूर आणि शेवटचा पर्याय म्हणून चाकूर तालुक्यातील मुख्य मार्गावरील ठिकाणच्या गावांत कार्यरत राहण्यास बहुतांश अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ओढा असतो. घर लातुरात आणि नोकरी जवळच्या तालुक्यात. त्यामुळे वेळेत नोकरीच्या ठिकाणी जाऊन लवकरच घरात पोहोचण्याची सोय होते. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी रहावे, असा नियम असला तरी बहुतांश जण नियमाचे किती पालन करतात, अशी मानसिकता असते.

गेल्या आठवड्यापासून जिल्हा परिषदेत वर्ग ३ आणि ४ मधील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय आणि विनंतीवरून बदल्या होत आहेत. या बदलीदरम्यान, लातूर, रेणापूर, औसा या तालुक्यात कार्यरत असलेल्या काही विभागाचे काही कर्मचारी पुढील वर्षी प्रशासकीय बदलीसाठी पात्र ठरत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी यंदापासूनच या तीन तालुक्यांशिवाय अन्य ठिकाणी जाण्याची पाळी येऊ नये म्हणून फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली होती. मात्र, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या दक्षतेमुळे त्यांच्या अपेक्षा धुळीस मिळाल्या आहेत.

आपसी बदलीमुळे १० वर्षे निवांत...जिल्हा परिषदेतील वर्ग- ३ व ४ मधील कर्मचाऱ्यांची प्रशासकीय बदली ही १० वर्षानंतर होते. दरम्यान, लातूर, औसा, रेणापूर येथे कार्यरत आणि ८ ते ९ वर्षे पूर्ण होत असलेल्या जवळपास ४२ कर्मचाऱ्यांनी पुढील वर्ष, दोन वर्षातील प्रशासकीय बदली टाळण्यासाठी आपसी बदलीचा प्रस्ताव सादर केला होता. एकदा आपसी बदली झाली की प्रशासकीय बदलीसाठी पुढे १० वर्षांचा कालावधी लागतो. तोपर्यंत निवांत राहता येते, असे कर्मचाऱ्यांचे धाेरण होते. मात्र, सीईओ गोयल यांनी या कर्मचाऱ्यांचे नियोजन ओळखून आपसी बदल्या न करण्याच्या सूचना केल्या.

शोधाशोध केली, पण काय उपयोग ?आपसी बदलीसाठी एकाच ठिकाणी ५ वर्ष कार्यरत राहण्याची अट असते. त्यामुळे पुढील वर्ष, दोन वर्षात प्रशासकीय बदलीसाठी पात्र ठरणाऱ्यांनी आपसी बदलीसाठी या तीन तालुक्यातील कर्मचाऱ्यांची शोधाशोध केली. शिवाय काही तडजोडी ही केल्या. पण, सीईओंनी आपसी बदल्या न केल्याने काहीही उपयोग झाला नसल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

प्रशासकीय बदलीत ठिकाण अनिश्चित...जिल्हा परिषदेत समुपदेशनाने बदल्या होत आहेत. प्रशासकीय बदली वेळीही कर्मचाऱ्यांना रिक्त जागा दाखविण्यात येतात. मात्र, कुठे नियुक्ती द्यायची याचे काही अधिकार सीईओंना आहेत. त्यामुळे काही कर्मचारी प्रशासकीय बदली टाळण्यासाठी आपसीचा मार्ग निवडतात. यंदा एकही आपसी बदली झाली नाही.- नितीन दाताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषदTransferबदली