शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

रेणा मध्यम प्रकल्पाचे दाेन दरवाजे उघडले; नदीपात्रा नजिकच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By हरी मोकाशे | Updated: September 7, 2022 15:53 IST

सध्या प्रकल्पात जीवंत पाणीसाठा २०.१६९ दलघमी तर मृत पाणीसाठा १.१२९ दलघमी असा एकूण २१.२९८ दलघमी पाणीसाठा आहे.

रेणापूर (जि. लातूर) : तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्पात ९८.११ टक्के जलसाठा झाला आहे. दरम्यान, धरण क्षेत्रात पाण्याचा येवा सुरू असल्याने बुधवारी सकाळी प्रकल्पाचे क्रमांक ३ व ४ चे दोन दरवाजे १० सेमीने उघडून रेणा नदी पात्रात ६२६.७५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

रेणा मध्यम प्रकल्प हा दरवर्षी सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये पूर्ण क्षमतेने भरतो. मात्र १०- १२ वर्षांनंतर प्रथमच रेणा मध्यम प्रकल्प हा पावसाळा सुरू झाल्यानंतर तीन ते चारदा पूर्ण क्षमतेने भरला आहे. यंदा या प्रकल्पातून पाणी सोडण्याची ही पाचवी वेळ आहे. पहिल्यांदा १४ जुलै रोजी, दुसऱ्यांदा २८ जुलै रोजी, तिसऱ्यांदा ९ ऑगस्ट रोजी, आता मंगळवारी व बुधवारी दोन दरवाजे १० सेमीने उघडण्यात आले आहेत.

सध्या प्रकल्पातील पाणीपातळी ६०८.४५ मी. एवढी आहे. पाणी पातळी वाढल्याने प्रकल्पाचे सहापैकी दोन दरवाजे मंगळवारी मध्यरात्री १२.१५ वा व पुन्हा बुधवारी सकाळी ७ वा. १० सेमीने उघडण्यात आले आहेत. त्यातून रेणा नदीपात्रात १७.७५ क्युमेक्स म्हणजेच ६२६.७५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सध्या प्रकल्पात २१.२९८ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे.

सध्या प्रकल्पात जीवंत पाणीसाठा २०.१६९ दलघमी तर मृत पाणीसाठा १.१२९ दलघमी असा एकूण २१.२९८ दलघमी पाणीसाठा आहे. त्याची ९८.११ टक्केवारी आहे. प्रकल्पाच्या दोन्ही दरवाज्यांतून ६२६.७५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग रेणा नदीपात्रात होत आहे. नदीकाठच्या गावांतील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्याची स्थिती पाहता, केव्हाही पाणी बंद केले जाऊ शकते. तसेच केव्हाही पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी केले आहे.

टॅग्स :laturलातूरRainपाऊस