शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

रेणा मध्यम प्रकल्पाचे दाेन दरवाजे उघडले; नदीपात्रा नजिकच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By हरी मोकाशे | Updated: September 7, 2022 15:53 IST

सध्या प्रकल्पात जीवंत पाणीसाठा २०.१६९ दलघमी तर मृत पाणीसाठा १.१२९ दलघमी असा एकूण २१.२९८ दलघमी पाणीसाठा आहे.

रेणापूर (जि. लातूर) : तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्पात ९८.११ टक्के जलसाठा झाला आहे. दरम्यान, धरण क्षेत्रात पाण्याचा येवा सुरू असल्याने बुधवारी सकाळी प्रकल्पाचे क्रमांक ३ व ४ चे दोन दरवाजे १० सेमीने उघडून रेणा नदी पात्रात ६२६.७५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

रेणा मध्यम प्रकल्प हा दरवर्षी सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये पूर्ण क्षमतेने भरतो. मात्र १०- १२ वर्षांनंतर प्रथमच रेणा मध्यम प्रकल्प हा पावसाळा सुरू झाल्यानंतर तीन ते चारदा पूर्ण क्षमतेने भरला आहे. यंदा या प्रकल्पातून पाणी सोडण्याची ही पाचवी वेळ आहे. पहिल्यांदा १४ जुलै रोजी, दुसऱ्यांदा २८ जुलै रोजी, तिसऱ्यांदा ९ ऑगस्ट रोजी, आता मंगळवारी व बुधवारी दोन दरवाजे १० सेमीने उघडण्यात आले आहेत.

सध्या प्रकल्पातील पाणीपातळी ६०८.४५ मी. एवढी आहे. पाणी पातळी वाढल्याने प्रकल्पाचे सहापैकी दोन दरवाजे मंगळवारी मध्यरात्री १२.१५ वा व पुन्हा बुधवारी सकाळी ७ वा. १० सेमीने उघडण्यात आले आहेत. त्यातून रेणा नदीपात्रात १७.७५ क्युमेक्स म्हणजेच ६२६.७५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सध्या प्रकल्पात २१.२९८ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे.

सध्या प्रकल्पात जीवंत पाणीसाठा २०.१६९ दलघमी तर मृत पाणीसाठा १.१२९ दलघमी असा एकूण २१.२९८ दलघमी पाणीसाठा आहे. त्याची ९८.११ टक्केवारी आहे. प्रकल्पाच्या दोन्ही दरवाज्यांतून ६२६.७५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग रेणा नदीपात्रात होत आहे. नदीकाठच्या गावांतील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्याची स्थिती पाहता, केव्हाही पाणी बंद केले जाऊ शकते. तसेच केव्हाही पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी केले आहे.

टॅग्स :laturलातूरRainपाऊस