शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

पावणेतीन कोटी रुपयांची एकाच दिवसात कर वसुली; लातूर जिल्ह्यात गावागावांमध्ये विशेष मोहीम

By हरी मोकाशे | Updated: December 29, 2023 19:04 IST

प्रत्येक गावांच्या विकासासाठी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येतो.

लातूर : ग्रामपंचायतींचे आर्थिक उत्पन्न वाढावे आणि गावातील नागरिकांना मुलभूत सोयी- सुविधा मिळाव्यात म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने मिशन स्वाभिमान मोहीम राबविण्यात येत आहे. बुधवारी एकाच दिवसात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी २ कोटी ७० लाख ४ हजार रुपयांची कर वसुली केली आहे.

प्रत्येक गावांच्या विकासासाठी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. मात्र, नियम, अटी आणि काही तांत्रिक कारणांमुळे गावातील काही भागांचा अपेक्षित प्रमाणात विकास होत नाही. तेथील नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यास अडचणी येतात. त्यामुळे गावातील नागरिकांना सोयी- सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि गावांचा विकास होण्यासाठी पाणीपट्टी, घरपट्टी कर वसुली महत्त्वाची ठरते. त्यातून ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होते. जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायतीत मिशन स्वाभिमान मोहीम राबविण्यात येत आहे.

तिवघाट ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम...२७ डिसेंबर रोजी राबविण्यात आलेल्या विशेष कर वसुली दिनी जिल्ह्यात एकूण २ कोटी ७० लाख ४ हजार रुपयांची वसुली झाली आहे. चाकूर तालुक्यातील तिवघाट ग्रामपंचायतीने ५ लाख ८७ हजार ९९० रुपयांची वसुली करुन जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. नळेगाव ग्रामपंचायतीने ५ लाख ८५ हजार १७० रुपयांची वसुली करुन द्वितीय क्रमांक तर औसा तालुक्यातील उजनी ग्रामपंचायतीने ३ लाख १७ हजार ३१० रुपयांची कर वसुली करुन तृतीय क्रमांक मिळविला.

१२५ ग्रामपंचायतींची लाखापेक्षा अधिक वसुली...

जिल्ह्यातील १२५ ग्रामपंचायतींनी एकाच दिवसात एक लाखापेक्षा अधिक वसुली केली आहे. दरम्यान, ७८६ ग्रामपंचायतीत घरपट्टी, पाणीपट्टी कर भरण्यापोटी ६२ कोटी ५६ लाख ६ हजार रुपयांचा भरणा करणे अपेक्षित असून २७ डिसेंबरपूर्वी ३७ कोटी ७१ लाख ४९ हजार रुपयांची कर वसुली झाली आहे. मिशन स्वाभिमानमध्ये २ कोटी ७० लाख ४ हजार रुपयांची कर वसुली झाली आहे.

दोन महिन्यात कर भरणा करावा...मिशन स्वाभिमान मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. कर भरण्यासाठी शासनाने दोन महिन्यांची मुदत दिली आहे. मार्च अखेरपर्यंत कर भरणा न करणाऱ्यांना न्यायालयाची नोटिसही येऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी वेळेवर घरपट्टी, पाणीपट्टी कर भरणा करावा.- अनमोल सागर, सीईओ.

दर महिन्यास सन्मान...मिशन स्वाभिमान मोहिमेत उत्कृष्ट वसुली केलेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवकांचा दर महिन्यास विशेष सन्मान करण्यात येणार आहे. वसूल करातून गावात सुविधा पुरविण्यास मदत होणार आहे. त्यात पारदर्शकता ठेवण्यासाठी ग्रामपंचायतींना सूचना करण्यात आल्या आहेत. - दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.

टॅग्स :laturलातूरTaxकरLatur z pलातूर जिल्हा परिषद