शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

पावणेतीन कोटी रुपयांची एकाच दिवसात कर वसुली; लातूर जिल्ह्यात गावागावांमध्ये विशेष मोहीम

By हरी मोकाशे | Updated: December 29, 2023 19:04 IST

प्रत्येक गावांच्या विकासासाठी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येतो.

लातूर : ग्रामपंचायतींचे आर्थिक उत्पन्न वाढावे आणि गावातील नागरिकांना मुलभूत सोयी- सुविधा मिळाव्यात म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने मिशन स्वाभिमान मोहीम राबविण्यात येत आहे. बुधवारी एकाच दिवसात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी २ कोटी ७० लाख ४ हजार रुपयांची कर वसुली केली आहे.

प्रत्येक गावांच्या विकासासाठी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. मात्र, नियम, अटी आणि काही तांत्रिक कारणांमुळे गावातील काही भागांचा अपेक्षित प्रमाणात विकास होत नाही. तेथील नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यास अडचणी येतात. त्यामुळे गावातील नागरिकांना सोयी- सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि गावांचा विकास होण्यासाठी पाणीपट्टी, घरपट्टी कर वसुली महत्त्वाची ठरते. त्यातून ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होते. जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायतीत मिशन स्वाभिमान मोहीम राबविण्यात येत आहे.

तिवघाट ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम...२७ डिसेंबर रोजी राबविण्यात आलेल्या विशेष कर वसुली दिनी जिल्ह्यात एकूण २ कोटी ७० लाख ४ हजार रुपयांची वसुली झाली आहे. चाकूर तालुक्यातील तिवघाट ग्रामपंचायतीने ५ लाख ८७ हजार ९९० रुपयांची वसुली करुन जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. नळेगाव ग्रामपंचायतीने ५ लाख ८५ हजार १७० रुपयांची वसुली करुन द्वितीय क्रमांक तर औसा तालुक्यातील उजनी ग्रामपंचायतीने ३ लाख १७ हजार ३१० रुपयांची कर वसुली करुन तृतीय क्रमांक मिळविला.

१२५ ग्रामपंचायतींची लाखापेक्षा अधिक वसुली...

जिल्ह्यातील १२५ ग्रामपंचायतींनी एकाच दिवसात एक लाखापेक्षा अधिक वसुली केली आहे. दरम्यान, ७८६ ग्रामपंचायतीत घरपट्टी, पाणीपट्टी कर भरण्यापोटी ६२ कोटी ५६ लाख ६ हजार रुपयांचा भरणा करणे अपेक्षित असून २७ डिसेंबरपूर्वी ३७ कोटी ७१ लाख ४९ हजार रुपयांची कर वसुली झाली आहे. मिशन स्वाभिमानमध्ये २ कोटी ७० लाख ४ हजार रुपयांची कर वसुली झाली आहे.

दोन महिन्यात कर भरणा करावा...मिशन स्वाभिमान मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. कर भरण्यासाठी शासनाने दोन महिन्यांची मुदत दिली आहे. मार्च अखेरपर्यंत कर भरणा न करणाऱ्यांना न्यायालयाची नोटिसही येऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी वेळेवर घरपट्टी, पाणीपट्टी कर भरणा करावा.- अनमोल सागर, सीईओ.

दर महिन्यास सन्मान...मिशन स्वाभिमान मोहिमेत उत्कृष्ट वसुली केलेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवकांचा दर महिन्यास विशेष सन्मान करण्यात येणार आहे. वसूल करातून गावात सुविधा पुरविण्यास मदत होणार आहे. त्यात पारदर्शकता ठेवण्यासाठी ग्रामपंचायतींना सूचना करण्यात आल्या आहेत. - दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.

टॅग्स :laturलातूरTaxकरLatur z pलातूर जिल्हा परिषद