शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पावणेतीन कोटी रुपयांची एकाच दिवसात कर वसुली; लातूर जिल्ह्यात गावागावांमध्ये विशेष मोहीम

By हरी मोकाशे | Updated: December 29, 2023 19:04 IST

प्रत्येक गावांच्या विकासासाठी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येतो.

लातूर : ग्रामपंचायतींचे आर्थिक उत्पन्न वाढावे आणि गावातील नागरिकांना मुलभूत सोयी- सुविधा मिळाव्यात म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने मिशन स्वाभिमान मोहीम राबविण्यात येत आहे. बुधवारी एकाच दिवसात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी २ कोटी ७० लाख ४ हजार रुपयांची कर वसुली केली आहे.

प्रत्येक गावांच्या विकासासाठी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. मात्र, नियम, अटी आणि काही तांत्रिक कारणांमुळे गावातील काही भागांचा अपेक्षित प्रमाणात विकास होत नाही. तेथील नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यास अडचणी येतात. त्यामुळे गावातील नागरिकांना सोयी- सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि गावांचा विकास होण्यासाठी पाणीपट्टी, घरपट्टी कर वसुली महत्त्वाची ठरते. त्यातून ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होते. जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायतीत मिशन स्वाभिमान मोहीम राबविण्यात येत आहे.

तिवघाट ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम...२७ डिसेंबर रोजी राबविण्यात आलेल्या विशेष कर वसुली दिनी जिल्ह्यात एकूण २ कोटी ७० लाख ४ हजार रुपयांची वसुली झाली आहे. चाकूर तालुक्यातील तिवघाट ग्रामपंचायतीने ५ लाख ८७ हजार ९९० रुपयांची वसुली करुन जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. नळेगाव ग्रामपंचायतीने ५ लाख ८५ हजार १७० रुपयांची वसुली करुन द्वितीय क्रमांक तर औसा तालुक्यातील उजनी ग्रामपंचायतीने ३ लाख १७ हजार ३१० रुपयांची कर वसुली करुन तृतीय क्रमांक मिळविला.

१२५ ग्रामपंचायतींची लाखापेक्षा अधिक वसुली...

जिल्ह्यातील १२५ ग्रामपंचायतींनी एकाच दिवसात एक लाखापेक्षा अधिक वसुली केली आहे. दरम्यान, ७८६ ग्रामपंचायतीत घरपट्टी, पाणीपट्टी कर भरण्यापोटी ६२ कोटी ५६ लाख ६ हजार रुपयांचा भरणा करणे अपेक्षित असून २७ डिसेंबरपूर्वी ३७ कोटी ७१ लाख ४९ हजार रुपयांची कर वसुली झाली आहे. मिशन स्वाभिमानमध्ये २ कोटी ७० लाख ४ हजार रुपयांची कर वसुली झाली आहे.

दोन महिन्यात कर भरणा करावा...मिशन स्वाभिमान मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. कर भरण्यासाठी शासनाने दोन महिन्यांची मुदत दिली आहे. मार्च अखेरपर्यंत कर भरणा न करणाऱ्यांना न्यायालयाची नोटिसही येऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी वेळेवर घरपट्टी, पाणीपट्टी कर भरणा करावा.- अनमोल सागर, सीईओ.

दर महिन्यास सन्मान...मिशन स्वाभिमान मोहिमेत उत्कृष्ट वसुली केलेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवकांचा दर महिन्यास विशेष सन्मान करण्यात येणार आहे. वसूल करातून गावात सुविधा पुरविण्यास मदत होणार आहे. त्यात पारदर्शकता ठेवण्यासाठी ग्रामपंचायतींना सूचना करण्यात आल्या आहेत. - दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.

टॅग्स :laturलातूरTaxकरLatur z pलातूर जिल्हा परिषद