शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

गुळाचा गोडवा वाढला; दररोज ६०० क्विंटलची आवक, भावही वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा

By हरी मोकाशे | Updated: January 13, 2024 17:31 IST

राज्यातील गुळाच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये लातूर आहे. येथील गुळाला विदर्भ, खान्देश, गुजरातमध्ये मोठी मागणी असते.

लातूर : मकरसंक्रांतीनिमित्ताने बाजारपेठेत गुळास मागणी वाढली आहे. शहरातील बाजार समितीत दररोज सरासरी ६०० क्विंटलपर्यंत आवक होत आहे. सध्या सर्वसाधारण ३ हजार ७०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास ७०० रुपयांची दरवाढ झाली आहे. त्यामुळे गूळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याने गोडवा वाढल्याचे पहावयास मिळत आहे.

गुळाचा हंगाम हा साधारणत: नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंत असतो. राज्यातील गुळाच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये लातूर आहे. येथील गुळाला विदर्भ, खान्देश, गुजरातमध्ये मोठी मागणी असते. काही वर्षांपूर्वी येथील बाजार समितीत दररोज जवळपास २५ ते ३० हजार गुळाच्या डागांची आवक होत होती. मात्र, काही वर्षांपासून गुळवे, कामगारांची कमतरता त्याचबरोबर साखर कारखाने, गूळ पावडर कारखाने निर्माण झाल्याने जिल्ह्यातील गूळ उत्पादनावर संक्रांत आली आहे. मात्र, काही शेतकरी आजही गुळाचे उत्पादन घेतात. ग्राहकांची मागणी जाणून घेऊन त्या पद्धतीने शेतकरी गूळ उत्पादन करीत आहेत.

सर्वसाधारण दर ३७०० रुपये...येथील बाजार समितीच्या माणिकराव सोनवणे गुळ मार्केटमध्ये दररोज जवळपास ६०० क्विंटलपर्यंत आवक होत आहे. कमाल दर ४ हजार ५० रुपये तर किमान भाव ३ हजार २७५ रुपये मिळत आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण भाव ३ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल मिळत आहे.

यंदा किमान दरातही वाढ...वर्ष - कमाल- किमान - साधारण भावजाने. २०२२ - ३००० - २४८१ - २७३०जाने. २०२३ - ३८०० - २५८० - ३०१०जाने. २०२४ - ४०५० - ३२७५ - ३७००

उत्पादन घटले, मागणी वाढली...काही वर्षांत साखर कारखाने, गूळ पावडर कारखाने सुरू झाल्याने जिल्ह्यात गुळाचे उत्पादन घटले आहे. लातूर, कोल्हापूर, सांगली, कराड येथील गुळाला सर्वाधिक मागणी असते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सर्वसाधारणपणे दरात जवळपास ७०० रुपयांची वाढ झाली आहे. त्याचा गूळ उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक लाभ होत आहे.- ललितभाई शहा, माजी सभापती, बाजार समिती.

गुऱ्हाळ चालविणे कठीण...गुऱ्हाळासाठी मजुरांची आवश्यकता असते. मात्र, सध्या मजूर मिळत नाहीत. त्यातच मजुरी वाढली आहे. शिवाय, खत आणि औषधांच्या किमती वाढल्या आहेत. उत्पादन आणि खर्चाचे गणित जुळत नाही. त्यामुळे गुऱ्हाळ चालविणे कठीण झाले आहे.- संतराम बंडे, शेतकरी, चिमाचीवाडी.

शरीरासाठी गुळ लाभदायक...गूळ हे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. गुळामध्ये कार्बोहायड्रेड, ग्लुकोज, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम असे घटक असतात. त्यामुळे नैसर्गिक उर्जास्त्रोत ठरते. गुळामुळे पचनक्रिया चांगली होते. रोगप्रतिकारशक्ती वाढते. हाडे मजबूत होण्यास मदत होते. रक्तवाढ होते. पित्तनाशक आहे. मात्र, गूळ योग्य प्रमाणात खाल्ले पाहिजे. अंग मेहनत तसेच प्रवास करणाऱ्यांनी सोबत गूळ ठेवावा. दिवसभरातून २५ ग्रॅमपर्यंत गूळ सेवन करावे.- डॉ. दत्ता अंबेकर, आहार तज्ज्ञ.

 

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रlaturलातूर