शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

प्रवास खर्चात निम्मे मानधन खर्ची करणाऱ्या आशा गटप्रवर्तकांना ठेंगा

By आशपाक पठाण | Updated: March 16, 2024 16:54 IST

राज्य शासनाकडून दुजाभाव, घोषणा १० हजारांची; अध्यादेश केवळ १ हजार वाढीचा.

आशपाक पठाण, लातूर : ग्रामीण भागात आरोग्य सेवेसह शासनाच्या विविध योजनेची आशा स्वंयसेविकांमार्फत अंमलबजावणी करून घेण्याचे काम करणाऱ्या गटप्रवर्तकांच्या मागण्यांना राज्य शासनाने ठेंगा दाखविला आहे. गटप्रवर्तकांना मासिक १० हजार रूपये मानवाढीची घोषणा केलेल्या राज्य शासनाने शासन आदेश काढताना त्यात केवळ १ हजारांची वाढ केल्याने राज्यातील ३ हजार ५०० गटप्रवर्तकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. विशेष म्हणजे, त्यांना सध्या मिळणाऱ्या मोबदल्यात निम्मा खर्च तर प्रवास खर्चात जात असल्याने अडचण निर्माण झाली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना मिळणारे मानधन तुटपुंजे असल्याने त्यात वाढ करावी, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आशांना राज्य शासनाने मासिक ५ हजार वाढ केली आहे. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कार्यरत असलेल्या गटप्रवर्तकांना महिन्यात कार्यक्षेत्रातील गावांना किमान २५ दौरे, आशांच्या कामाचे नियोजन, प्राथमिक आरोग्य केंद्रात बैठका, त्यांनी केलेल्या कामाचा अहवाल तयार करणे, तालुका, जिल्हा बैठकांना उपस्थित राहून वरिष्ठांच्या सूचनेनुसार काम करून घेणे आदी कामांचा ताण असताना त्यांना अतिशय तुटपुंजे मानधन दिले जाते. सध्या गटप्रवर्तकांना जवळपास १३ हजार ५०० मासिक मानधन मिळते, त्यातून निम्मी रक्कम गावभेटीत प्रवासखर्चात जाते, असे असतानाही राज्यातील ३ हजार ५०० गटप्रवर्तकांना राज्य शासनाने १० हजार मानधन वाढीची घोषणा करून अध्यादेश केवळ १ हजार रूपये वाढीचा काढल्याने गटप्रवर्तक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

महासंघाचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा साकडे...

राज्यातील ३५०० आशा गटप्रवर्तकांची तुटपुंज्या मानधनामुळे कसरत असे वृत्त लोकमतने १३ ऑक्टोबर रोजी प्रकाशित केल्यावर उपमुख्यमंत्री कार्यालयातून अवर सचिवांनी राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून घेतला. संपकाळात आरोग्यमंत्री १० हजार रूपये वाढीची घोषणा केली. पण प्रत्यक्षात अध्यादेश निघत नसल्याने पुन्हा एकदा आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीने आझाद मैदानावर आंदोलन केले. दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने अध्यादेश काढला त्यात गटप्रवर्तकांना केवळ १ हजार रूपयांची वाढ केली आहे. यासंर्भात महासंघाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, मुख्य सचिव यांना निवेदन देऊन गटप्रवर्तकांच्या मानधनवाढीची मागणी केली आहे.

आशांपेक्षा गटप्रवर्तकांचे काम अधिक...

आशांचे काम गावात असते, एका गावात किमान दोन ते तीन आशा कार्यरत आहेत. गटप्रवर्तकांना मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या गावांत दौरे करून आशांना मार्गदर्शन करावे लागते. मिळणारे मानधन प्रवास खर्चात जाते, उदरनिर्वाहासाठी त्यातून शिल्लक राहणारी रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे. मग घरगाडा चालविणे, मुलांचे शिक्षण आदी खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :laturलातूरStrikeसंप