शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

औराद शहाजानी परिसरावर सूर्याचा कोप; तापमान ४४ अंशावर, अकरा दिवसांत ११ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 14:41 IST

वाढत्या तापमानाचा तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांच्या जीविवास धोका

- बालाजी थेटेऔराद शहाजानी (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात काही दिवसांपासून तापमानात सातत्याने चढ- उतार होत आहे. कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत राहिले आहे. दरम्यान, ढगाळ वातावरण निर्माण होऊन अवकाळी पाऊस झाल्याने हवेत आर्द्रता वाढली आहे. वाढत्या उकाड्यामुळे शरीरातील तापमान सहन करण्याची शक्ती कोलमडत आहे. परिणामी, १ ते ११ एप्रिल या कालावधीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

मार्चपासून ऊन वाढले आहे. शेवटच्या आठवड्यात ४० अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान पोहोचले होते. २८ मार्च रोजी ४१ अंश सेल्सिअस, अशी येथील हवामान केंद्रावर नोंद झाली. १ ते ३ एप्रिल या कालावधीत ४१ ते ४३ अंश सेल्सिअस असे कमाल तापमान राहिले. त्यानंतर ४, ५, ६ एप्रिल रोजी कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचले. दरम्यान, मंगळवारपासून अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन तापमानात घट होण्यास सुरुवात झाली. हलका पाऊस झाल्याने आर्द्रता वाढली. १० एप्रिल रोजी कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसवर पोहोचले. एकंदरीत, औराद परिसरात कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची आतापर्यंतची पहिलीच नोंद आहे.

तापमानातील बदलाचा आरोग्यावर परिणामकमाल तापमानात झपाट्याने बदल होत आहे. परिणामी, १ एप्रिल ते ११ एप्रिल या कालावधीत परिसरातील ११ ज्येष्ठ नागरिक दगावले आहेत. त्यात विठ्ठल लक्ष्मण शिंगे (९०, रा. माने जवळगा), सोपान यादव गाडे (९२), शेषाबाई शिवराज ऐनापुरे (६०), त्र्यंबकप्पा खंडाळे (७५), कल्याणी महादाप्पा पंचाक्षरी (१०१), रत्नाबाई शंकर गायकवाड (९०), सुभद्राबाई निवृत्ती गायकवाड (७५) (सर्व जण रा. औराद शहाजानी), गंगाबाई मोहनराव मुळजे (७५), शिवाजी दिगंबर डावरगावे (५२), काशीनाथ संतराम बिरादार (७२), रुक्मिणबाई गोविंद शिंगे (८५) (रा. तगरखेडा) यांचा समावेश आहे.

४३ अंश सेल्सिअसपर्यंत सहनशक्तीशरीराची तापमान सहनशीलता ४३ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. त्यापेक्षा अधिक तापमान झाल्यास ते शरीरास सहन होत नाही. तेव्हा शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत जाते आणि अशक्त व्यक्तींना अधिक त्रास होतो. त्यामुळे नागरिकांनी सातत्याने पाणी प्यावे. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेदरम्यान शेतकऱ्यांनी कामे करू नयेत. सावलीचा आधार घ्यावा. डोक्यास पांढरा गमजा वापरावा.-डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी

तापमान वाढल्याने शरीरातील पाणी कमीतापमान अचानकपणे कमी- जास्त झाल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी, ज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊन मृत्यूही ओढवू शकतो.-डॉ. सुनील पोतदार, वैद्यकीय अधिकारी

टॅग्स :laturलातूरTemperatureतापमान