शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना लागली शाळेची ओढ; पालक मात्र संभ्रमात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : जिल्ह्यात ५ वी ते १२ वीचे वर्ग नियमितपणे सुरू झाले आहेत. मात्र १ ली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : जिल्ह्यात ५ वी ते १२ वीचे वर्ग नियमितपणे सुरू झाले आहेत. मात्र १ ली ते ४ थीच्या वर्गांना शिक्षण विभागाने हिरवा कंदिल दिलेला नाही. त्यामुळे प्राथमिक शाळेतील किलबिलाट सध्या बंद आहे. दरम्यान, प्राथमिकची मुले शाळेत जाण्यासाठी आतुर झाली असून, पालक मात्र आपल्या पाल्यास शाळेत पाठवावे की नाही, अशा द्विधा मन:स्थितीत आहेत.

जिल्ह्यात पहिली ते चौथीच्या १ हजार ७ शाळा आहेत. यामध्ये पहिली वर्गात ४६ हजार ७७८, दुसरी ४६ हजार ७३३, तिसरी ४६ हजार ६२१, तर चौथीच्या वर्गात ४७ हजार ६९९ असे एकूण १ लाख ८७ हजार ८३१ विद्यार्थी आहेत. कोरोनाच्या संकटामुळे पहिली ते चौथीचे वर्ग अद्यापही बंद आहेत. ऑनलाईन शिकवणी होत असली तरी गेल्या दहा महिन्यांपासून शाळा बंद असल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागली आहे. अद्याप १ ली ते ४ थीचे वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय झाला नसला तरी पालक मात्र संभ्रमात आहेत.

गेल्या दहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे शाळेत जाण्याची आतुरता लागली आहे. मात्र कोरोनामुळे घरच्या घरीच अभ्यास करावा लागत आहे.

- आक्सा पठाण, विद्यार्थिनी

ऑनलाईनद्वारे शिकवणी होत आहे. अंगणवाडीनंतर पहिल्या वर्गात प्रवेश झाला तरी नव्या वर्गातील मित्रांची भेट झालेली नाही. त्यामुळे त्यांना भेटण्याची इच्छा आहे.

- मानसी महामुनी, विद्यार्थिनी

लाॅकडाऊनपासून शाळा बंद आहेत. घरीच ऑनलाईन अभ्यास करावा लागतो. मित्रांचीही अनेक दिवसांची भेट नाही. त्यामुळे शाळेत जाण्याची ओढ असून, दिवसभर घरीच राहून कंटाळा आला आहे. शाळा सुरू झाल्यानंतर पालकांच्या संमतीने नियमित शाळेत जाणार आहे. - रुद्र आलमले, विद्यार्थी

शाळा बंद असल्याने मैदानी खेळांचा आनंद घेता आला नाही. दिवसभर घरी राहूनच ऑनलाईन अभ्यास करावा लागला. मित्रांशी फोनद्वारे संवाद साधावा लागत आहे. अभ्यासातील अडचणीही सोडविण्यासाठी गैरसोय होत आहे. शाळा सुरू झाल्यास नियमित मैदानी खेळ खेळता येतील.

- ध्रुव बिराजदार

विद्यार्थी