शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

अकरावीसाठी विद्यार्थ्यांचा ओढा शहरातील महाविद्यालयांकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, अकरावी प्रवेशाची लगबग सुरु झाली आहे. ग्रामीण भागातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, अकरावी प्रवेशाची लगबग सुरु झाली आहे. ग्रामीण भागातील मुले शहरातील महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असून, शिक्षण विभागाकडून घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेनंतरच महाविद्यालय स्तरावर प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सीईटी परीक्षेच्या तयारीला लागले आहेत.

लातूर शहरात नामांकित महाविद्यालये असून, अकरावीसाठी प्रवेश घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. शहरात शैक्षणिक वातावरण असल्याने अकरावीसाठी विविध महाविद्यालयांत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ दिसून येते. यंदा बहुतांश शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे यावर्षी अकरावी प्रवेशाच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता कमीच आहे. दरम्यान, दहावीला मूल्यांकनाद्वारे गुण देण्यात आले असल्याने अकरावी प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी घेतली जाणार आहे. त्यामुळे सीईटीतील गुणांनुसारच अकरावीला प्रवेश देण्यात येणार असल्याचे महाविद्यालयांकडून सांगण्यात आले.

अकरावीसाठी शहरात प्रवेश का?

लातूर जिल्ह्यात दहावी आणि बारावीच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असलेली तयारी शहरातील महाविद्यालयांकडून करुन घेतली जाते. विद्यार्थीही दोन वर्षात कठोर मेहनत घेत यश मिळवतात. त्यामुळे अकरावीसाठी लातूर शहरात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल दिसून येतो.

म्हणून घेणार शहरात प्रवेश...

लातूर शहरात नामांकित महाविद्यालये आहेत. नीट, जेईई या अभ्यासक्रमांची महाविद्यालयात चांगली तयारी करुन घेतली जाते. शहरात शैक्षणिक वातावरण असल्याने शहरातील महाविद्यालयांत प्रवेश घेणार आहे. - संकेत शिंदे, विद्यार्थी

दहावी ग्रामीण भागातून झाली असली तरी पुढील अभ्यासक्रमासाठी शहरात प्रवेश घेणार आहे. पालकांचीही तयारी असल्याने शहरातील महाविद्यालयात प्रवेश घेऊन नीट परीक्षेची तयारी करुन वैद्यकीय अभ्यासक्रमाला जायचे ध्येय आहे. - मानसी महामुनी, विद्यार्थिनी

ऑफलाईन प्रवेश व्हावेत...

अकरावीसाठी ऑनलाईनऐवजी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली पाहिजे. ज्यामुळे प्रवेशाची प्रक्रिया तत्काळ पूर्ण होईल आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करता येईल. याबाबत राज्याच्या शिक्षण विभागाने निर्णय घेण्याची गरज आहे. - संस्थाचालक

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा ओढा शहराकडे अधिक असतो. ऑनलाईन प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असते. पहिली, दुसरी आणि तिसरी यादी जाहीर होईपर्यंत विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया राबविल्यास सोपे होईल. - संस्थाचालक