शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
7
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
8
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
9
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
10
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
11
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
12
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
13
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
14
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
15
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
16
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
17
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
18
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
19
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
20
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप

विद्यार्थ्यांचे लक्ष ‘नीट’, ‘जेईई’कडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 05:50 IST

बारावी विज्ञानच्या प्रश्नपत्रिकांचे बदललेले स्वरुप, काठिण्य पातळीतील वाढ आणि विद्यार्थ्यांचे नीट, जईईकडेच असलेले लक्ष यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा विज्ञान शाखेचा निकाल ३.२५ टक्क्यांनी कमी लागला आहे

लातूर : बारावी विज्ञानच्या प्रश्नपत्रिकांचे बदललेले स्वरुप, काठिण्य पातळीतील वाढ आणि विद्यार्थ्यांचे नीट, जईईकडेच असलेले लक्ष यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा विज्ञान शाखेचा निकाल ३.२५ टक्क्यांनी कमी लागला आहे. तुलनेने कला, वाणिज्यची घसरण कमी आहे.बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. विशेषत: गेल्या काही वर्षात विज्ञान शाखेचा घसरणाऱ्या निकालामागे वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षा असल्याचे दिसून येते. विज्ञान शाखेचे विद्यार्थी पीसीबी अथवा पीसीएम या दोन्हींची ग्रुपिंग होईल इतपतच ध्येय ठेवून एनईईटी व जेईई मेन अ‍ॅडव्हॉन्सच्या तयारीकडे अधिक लक्ष देत आहेत.शिवाय, उपरोक्त परीक्षांसाठी एनसीईआरटीच्याच पाठ्यपुस्तकांकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. त्यामुळे राज्य मंडळाच्या पाठ्य पुस्तकांकडेविद्यार्थी तुलनेने दुर्लक्ष करतात. ज्यामुळे गेल्या काही वर्षांत ग्रुपिंग करण्यासाठी बोर्डाची तयारी करायची आणि वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी एनसीईआरटी अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करायचे, हा पायंडा निर्माण झाल्याचे वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेचे अभ्यासक प्रा. डी.के. देशमुख व प्रा.दासराव सूर्यवंशी यांनी सांगितले.राज्य मंडळानेही आपल्या प्रश्नपत्रिकांचे स्वरुप बदलले. ज्यामध्ये आॅब्जेक्टिव्ह आणि बहुपर्यायी प्रश्न कमी करण्यात आले. भौतिकशास्त्राची प्रश्नपत्रिकाही विद्यार्थ्यांसाठी अवघड होती. विशेष म्हणजे ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांची संख्या कमालीची घटली आहे.>कला शाखा स्पर्धा परीक्षेच्या दिशेनेबारावी कला शाखेची परीक्षा दिल्यानंतर डी.एड्. प्रवेश महत्त्वाचा होता. परंतु, अलिकडच्या काळात शिक्षक भरतीवरील बंदी व अन्य कारणांमुळे डी.एड्. महाविद्यालयातील जागा रिक्त राहू लागल्या. त्यामुळे बारावी कला शाखेतील स्पर्धा कमी झाली. आता केवळ पदवी शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेच्या संदर्भानेच कला शाखेकडे ओढा राहिला आहे. परिणामी, गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल २.४८ टक्क्यांनी कमी लागला आहे.वाणिज्यच्या निकालात बदल नाहीतुलनेने वाणिज्य शाखेचा निकाल १.२२ टक्क्यांनी कमी लागला असून, वाणिज्यच्या गुणवत्तेत घसरण कमी असल्याचे प्राचार्य पी.एन. सगर यांनी सांगितले.