शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
2
कीपॅड मोबाईल, ओटीपी नाही, युपीआय नाही, तरीही पैसे गायब; गिरणी कामगाराचे ७ लाख सायबर चोरट्याकडून लंपास
3
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
4
उपराष्ट्रपतीपद सोडल्यावर जगदीप धनखड पहिल्यांदाच बोलले, म्हणाले मला बोलायला...
5
Smriti Mandhana Haldi Ceremony : टीम इंडियाच्या 'राणी'च्या हळदी समारंभात संघातील साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
6
ऑपरेशन सिंदूरनंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हालचालींना वेग; महत्त्वाची माहिती उघड...
7
दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
8
हृदयस्पर्शी! मेकअपला जाताना वधूचा अपघात; नवरदेवाने रुग्णालयातच केलं लग्न, घातलं मंगळसूत्र
9
"लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहेत", काँग्रेसची टीका
10
Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे
11
"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद
12
लग्नाच्या दिवशी वधूचा अपघात, डॉक्टरांच्या साक्षीने हॉस्पिटलमध्येच नवरदेवाने बांधली लग्नगाठ  
13
IND vs SA : 'आत्मनिर्भर' बुमराह! मार्करमला बोल्ड केल्यावर KL राहुलसोबतचं सेलिब्रेशन ठरलं खास (VIDEO)
14
हृदयद्रावक! यूट्यूबवर एअर शोचा Video पाहत होते विंग कमांडरचे वडील, मिळाली लेकाच्या मृत्यूची माहिती
15
'ईठा'च्या शूटवेळी श्रद्धा कपूरला दुखापत, शूटिंग थांबलं; तमाशा सम्राज्ञी विठाबाईंच्या भूमिकेत दिसणार
16
पायलटचे नियंत्रण सुटले की ब्लॅकआउटमुळे अपघात झाला? संरक्षण तज्ञांनी तेजस अपघाताचे कारण सांगितले
17
Multibagger Stock: पैसाच पैसा! ₹२८ च्या शेअरनं केलं मालामाल; ५ वर्षात दिला ५६,०००% पर्यंतचा तुफान रिटर्न
18
५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश
19
अदानी समूहानं तयार केल्या २ नव्या कंपन्या, काय करणार काम? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
'संगीत देवबाभळी' फेम अभिनेत्री घटस्फोटाच्या ३ महिन्यानंतर दुसऱ्यांदा बांधतेय लग्नगाठ, केळवणाचे फोटो केले शेअर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचे लक्ष ‘नीट’, ‘जेईई’कडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 05:50 IST

बारावी विज्ञानच्या प्रश्नपत्रिकांचे बदललेले स्वरुप, काठिण्य पातळीतील वाढ आणि विद्यार्थ्यांचे नीट, जईईकडेच असलेले लक्ष यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा विज्ञान शाखेचा निकाल ३.२५ टक्क्यांनी कमी लागला आहे

लातूर : बारावी विज्ञानच्या प्रश्नपत्रिकांचे बदललेले स्वरुप, काठिण्य पातळीतील वाढ आणि विद्यार्थ्यांचे नीट, जईईकडेच असलेले लक्ष यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा विज्ञान शाखेचा निकाल ३.२५ टक्क्यांनी कमी लागला आहे. तुलनेने कला, वाणिज्यची घसरण कमी आहे.बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. विशेषत: गेल्या काही वर्षात विज्ञान शाखेचा घसरणाऱ्या निकालामागे वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षा असल्याचे दिसून येते. विज्ञान शाखेचे विद्यार्थी पीसीबी अथवा पीसीएम या दोन्हींची ग्रुपिंग होईल इतपतच ध्येय ठेवून एनईईटी व जेईई मेन अ‍ॅडव्हॉन्सच्या तयारीकडे अधिक लक्ष देत आहेत.शिवाय, उपरोक्त परीक्षांसाठी एनसीईआरटीच्याच पाठ्यपुस्तकांकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. त्यामुळे राज्य मंडळाच्या पाठ्य पुस्तकांकडेविद्यार्थी तुलनेने दुर्लक्ष करतात. ज्यामुळे गेल्या काही वर्षांत ग्रुपिंग करण्यासाठी बोर्डाची तयारी करायची आणि वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी एनसीईआरटी अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करायचे, हा पायंडा निर्माण झाल्याचे वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेचे अभ्यासक प्रा. डी.के. देशमुख व प्रा.दासराव सूर्यवंशी यांनी सांगितले.राज्य मंडळानेही आपल्या प्रश्नपत्रिकांचे स्वरुप बदलले. ज्यामध्ये आॅब्जेक्टिव्ह आणि बहुपर्यायी प्रश्न कमी करण्यात आले. भौतिकशास्त्राची प्रश्नपत्रिकाही विद्यार्थ्यांसाठी अवघड होती. विशेष म्हणजे ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांची संख्या कमालीची घटली आहे.>कला शाखा स्पर्धा परीक्षेच्या दिशेनेबारावी कला शाखेची परीक्षा दिल्यानंतर डी.एड्. प्रवेश महत्त्वाचा होता. परंतु, अलिकडच्या काळात शिक्षक भरतीवरील बंदी व अन्य कारणांमुळे डी.एड्. महाविद्यालयातील जागा रिक्त राहू लागल्या. त्यामुळे बारावी कला शाखेतील स्पर्धा कमी झाली. आता केवळ पदवी शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेच्या संदर्भानेच कला शाखेकडे ओढा राहिला आहे. परिणामी, गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल २.४८ टक्क्यांनी कमी लागला आहे.वाणिज्यच्या निकालात बदल नाहीतुलनेने वाणिज्य शाखेचा निकाल १.२२ टक्क्यांनी कमी लागला असून, वाणिज्यच्या गुणवत्तेत घसरण कमी असल्याचे प्राचार्य पी.एन. सगर यांनी सांगितले.