महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात आयोजित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहर पटवारी, महादेव नौबदे, सदस्य ॲड. एस.टी. पाटील, प्रा. आडेप्पा अंजुरे, बसवराज पाटील मलकापूरकर, प्राचार्य डॉ. आर.आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर.के. मस्के, प्रा. डॉ. जयप्रकाश पटवारी यांची उपस्थिती होती.
प्रा. खेडकर म्हणाले, कोरोनामुळे शिक्षणाची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रतिकूल काळातही आपण केलेली शैक्षणिक तपस्या व घेतलेल्या कष्टाचे फलित म्हणजे आज प्राप्त होत असलेली पदवी होय, असेही ते म्हणाले. यावेळी उपाध्यक्ष तिरुके म्हणाले, पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अभिमान सोहळा व्हावा. पदवीधारकांनो प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न बघा. भविष्यकाळात नवनिर्मितीसाठी पदवी प्राप्त करा, अशा प्रकारचे आवाहन उपस्थितांना केले.
अध्यक्षीय समारोपात बसवराज पाटील नागराळकर म्हणाले, केवळ पदवीधारक नको तर एक चांगला माणूस व्हा. भारतीय संस्कृतीचे संरक्षक म्हणून माणुसकीची शपथ घ्या. यापुढील काळात स्वतःच स्वतःचे मार्गदर्शक म्हणून वाटचाल करावी, असे आवाहन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पदवी व पदव्युत्तर वर्गातील २१४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. प्रास्ताविक जयप्रकाश पटवारी यांनी केले. विद्यापीठ गीत डॉ. मुकेश कुलकर्णी व प्रा. अश्विन वळवी यांनी सादर केले. सूत्रसंचालन डॉ. अर्चना मोरे यांनी तर आभार उपप्राचार्य डॉ. आर.के. मस्के यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.