शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

घागरभर पाण्यासाठी वणवण; लातूर जिल्ह्यात २५४ गावांत पाणीटंचाईची दाहकता वाढली

By हरी मोकाशे | Updated: March 27, 2024 18:45 IST

९८ गावांना ११० अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा

लातूर : वाढत्या उन्हाबरोबर जिल्ह्यात पाणीटंचाईचे चटके वाढत आहेत. त्यातच भूजल पातळी खालावल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना घागरभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सध्या जिल्ह्यातील २५४ गावे तहानेने व्याकूळ झाली आहेत. या गावांनी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करावा म्हणून पंचायत समितीकडे प्रस्तावही दाखल केला आहे. त्यापैकी ९८ गावांना ११० अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत अल्प पर्जन्यमान झाल्याने यंदा जिल्ह्यातील काही गावांना डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या. त्यामुळे पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखडे तयार करण्यात येऊन त्यास मंजुरी देण्यात आली. दरवर्षीच्या तुलनेत यंदा रविराजाने मार्चमध्येच रौद्ररुप धारण केले आहे. त्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. परिणामी, मध्यम, लघु प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा भूजल पातळी जवळपास २.१३ मीटरने खालावली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

निलंगा तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई...तालुका - टंचाईग्रस्त गावेलातूर - ३४औसा - ३७निलंगा - ४६रेणापूर - २४अहमदपूर - ३५चाकूर - १२शिरुर अनं. - ०५उदगीर - १५देवणी - ०३जळकोट - ०६एकूण - २१७

औश्यात सर्वाधिक अधिग्रहणाची मागणी...जिल्ह्यातील २१७ गावे आणि ३७ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे या गाव व वाड्यांनी ३३३ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. त्यात सर्वाधिक अधिग्रहणाची मागणी औसा तालुक्यातून झालेली असून ८७ अशी संख्या आहे. त्यापाठोपाठ लातूर तालुक्यातील ३४ गावांची ५४, अहमदपुरातील ५१ गावे व वाड्यांची ५१ अधिग्रहणाची मागणी आहे.

९८ गावांची तहान ११० अधिग्रहणावर...जिल्ह्यातील ७८ गावे आणि २० वाड्यांसाठी ११० अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. २५४ गावांचे ३३३ अधिग्रहणाचे प्रस्ताव असले तरी पाहणीअंती त्यातील २७ गावांचे ४० प्रस्ताव वगळण्यात आले आहेत. उर्वरित १७९ गावांचे २१३ अधिग्रहणाचे प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत.

जिल्ह्यात टँकर वाढले...जिल्ह्यातील १८ गावे आणि एका वाडीने तीव्र पाणीटंचाईमुळे २० टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. त्यात लामजना, खरोसा, मोगरगा, टाका, तांबरवाडी/ राजेवाडी, कार्ला, टेंभूर्णी, फुलसेवाडी, येलदरा, शिवाजीनगर तांडा/ वाघमारी तांडा, मेवापूर, चिंचोली ब., महापूर, चिखुर्डा, साखरा, बाेरगाव (बु.), गुंफावाडी, लिंबाळा या गावांचा समावेश आहे. त्यापैकी लामजना, खरोसा, मोगरगा, टाका, तांबरवाडी, कार्ला, टेंभूर्णी या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईlaturलातूर