शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

घागरभर पाण्यासाठी वणवण; लातूर जिल्ह्यात २५४ गावांत पाणीटंचाईची दाहकता वाढली

By हरी मोकाशे | Updated: March 27, 2024 18:45 IST

९८ गावांना ११० अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा

लातूर : वाढत्या उन्हाबरोबर जिल्ह्यात पाणीटंचाईचे चटके वाढत आहेत. त्यातच भूजल पातळी खालावल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना घागरभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सध्या जिल्ह्यातील २५४ गावे तहानेने व्याकूळ झाली आहेत. या गावांनी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करावा म्हणून पंचायत समितीकडे प्रस्तावही दाखल केला आहे. त्यापैकी ९८ गावांना ११० अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत अल्प पर्जन्यमान झाल्याने यंदा जिल्ह्यातील काही गावांना डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या. त्यामुळे पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखडे तयार करण्यात येऊन त्यास मंजुरी देण्यात आली. दरवर्षीच्या तुलनेत यंदा रविराजाने मार्चमध्येच रौद्ररुप धारण केले आहे. त्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. परिणामी, मध्यम, लघु प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा भूजल पातळी जवळपास २.१३ मीटरने खालावली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

निलंगा तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई...तालुका - टंचाईग्रस्त गावेलातूर - ३४औसा - ३७निलंगा - ४६रेणापूर - २४अहमदपूर - ३५चाकूर - १२शिरुर अनं. - ०५उदगीर - १५देवणी - ०३जळकोट - ०६एकूण - २१७

औश्यात सर्वाधिक अधिग्रहणाची मागणी...जिल्ह्यातील २१७ गावे आणि ३७ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे या गाव व वाड्यांनी ३३३ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. त्यात सर्वाधिक अधिग्रहणाची मागणी औसा तालुक्यातून झालेली असून ८७ अशी संख्या आहे. त्यापाठोपाठ लातूर तालुक्यातील ३४ गावांची ५४, अहमदपुरातील ५१ गावे व वाड्यांची ५१ अधिग्रहणाची मागणी आहे.

९८ गावांची तहान ११० अधिग्रहणावर...जिल्ह्यातील ७८ गावे आणि २० वाड्यांसाठी ११० अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. २५४ गावांचे ३३३ अधिग्रहणाचे प्रस्ताव असले तरी पाहणीअंती त्यातील २७ गावांचे ४० प्रस्ताव वगळण्यात आले आहेत. उर्वरित १७९ गावांचे २१३ अधिग्रहणाचे प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत.

जिल्ह्यात टँकर वाढले...जिल्ह्यातील १८ गावे आणि एका वाडीने तीव्र पाणीटंचाईमुळे २० टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. त्यात लामजना, खरोसा, मोगरगा, टाका, तांबरवाडी/ राजेवाडी, कार्ला, टेंभूर्णी, फुलसेवाडी, येलदरा, शिवाजीनगर तांडा/ वाघमारी तांडा, मेवापूर, चिंचोली ब., महापूर, चिखुर्डा, साखरा, बाेरगाव (बु.), गुंफावाडी, लिंबाळा या गावांचा समावेश आहे. त्यापैकी लामजना, खरोसा, मोगरगा, टाका, तांबरवाडी, कार्ला, टेंभूर्णी या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईlaturलातूर