शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

जलजीवन मिशनअंतर्गत अडीच वर्षांमध्ये लातूर जिल्ह्यात केवळ १९९ नळयोजनांचे बळकटीकरण!

By हरी मोकाशे | Updated: May 29, 2024 17:06 IST

जलजीवन मिशनच्या कामातील स्थानिक पातळीवर अडचणी सुटेनात

लातूर : जलजीवन मिशनअंतर्गत सन २०२१-२२ मध्ये जिल्ह्यात नळयोजना बळकटीकरणाची ८०७ कामे मंजूर करण्यात आली. अडीच वर्षांचा कालावधी उलटला असतानाही केवळ १९९ कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे नळयोजना कधी पूर्ण होणार अन् पिण्यासाठी शुध्द व पुरेसे पाणी कधी मिळणार असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे.

प्रत्येक घरास दररोज ५५ लिटर शुध्द पाणी मिळावे म्हणून केंद्र शासनाच्या वतीने जलजीवन मिशन अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. त्याअंतर्गतची सर्व गावे आणि वाडी- ताड्यांतील नागरिकांना पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी योजनेअंतर्गत नळयोजना बळकटीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात जवळपास अडीच वर्षांपूर्वी ८०७ कामे मंजूर करण्यात आली. त्यासाठी केंद्र शासनाने जवळपास ६५० कोटींचा निधी मंजूर केला. मात्र, आतापर्यंत केवळ १९९ कामे पूर्ण झाली आहेत.

औसा तालुक्यात सर्वाधिक कामे पूर्ण...तालुका - काम पूर्णअहमदपूर - २९औसा - ४३चाकूर - २०देवणी - ०४जळकोट - ०५लातूर - १५निलंगा - ३४रेणापूर - १७शिरुर अनं. - ०९उदगीर - २३एकूण - १९९

आठ योजनांना प्रारंभच नाही...जलजीवन मिशनअंतर्गतच्या आठ नळ योजना बळकटीकरणाच्या कामांना अद्यापही प्रारंभच झाला नाही. त्यात औसा तालुक्यातील १, देवणी- ४, शिरुर अनंतपाळ- २ आणि उदगीर तालुक्यातील एका योजनेचा समावेश आहे. या योजना सुरु व्हाव्यात म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने सातत्याने सूचना करण्यात येत आहेत.

स्थानिक राजकारणाने योजनेमध्ये व्यत्यय...जलजीवन मिशनअंतर्गतच्या विहिरीसाठी तसेच जलकुंभासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर सोपविण्यात आली होती. मात्र, स्थानिक पातळीवरील राजकारणामुळे जागा उपलब्ध झाली नाही. परिणामी, ८ योजनांची कामे सुरु झाली नाही. त्यामुळे अद्यापही कामाचा श्रीगणेशा झाला नाही.

० टक्के काम - ०८२५ टक्के - ११७५० टक्के - १८०७५ टक्के - १९८९९ टक्के - १०५१०० टक्के - १९९

तहसीलदार, बीडीओंनी जागेचा तिढा सोडवावा...जलजीवन मिशनअंतर्गतच्या कामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. विहीर, जलकुंभासाठी ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होत नाही. तसेच ज्या ठिकाणचे जलस्त्रोत कोरडे पडले आहेत, त्या ठिकाणचे सर्वेक्षण करुन नवीन जागा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.

संबंधित गुत्तेदारांवर दंडात्मक कारवाई...जलजीवन मिशनअंतर्गतच्या कामांना गती देण्यासाठी सातत्याने बैठका घेण्यात येत आहेत. वेळेत काम न करणाऱ्या गुत्तेदारांवर दंडात्मक कारवाईही करण्यात येत आहे. तसेच काही गुत्तेदारांना काळ्या यादीतही टाकण्यात आले आहे.- उदय देशपांडे, उपकार्यकारी अभियंता.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीLatur z pलातूर जिल्हा परिषद