शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
7
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
8
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
9
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
10
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
11
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
12
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
13
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
14
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
15
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
16
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
17
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
18
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
19
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
20
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन

बसस्थानकात ताटकळत बसणे थांबले; प्रत्येक बसचे कळणार ‘लाइव्ह लोकेशन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : लॉकडाऊननंतर प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने लालपरी आता हायटेक झाली असून, प्रत्येक बसचे लाइव्ह लोकेशन कळणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : लॉकडाऊननंतर प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने लालपरी आता हायटेक झाली असून, प्रत्येक बसचे लाइव्ह लोकेशन कळणार आहे. त्यासाठी महामंडळाने व्हेकल ट्रॅकिंग सर्चिंग (व्हीटीएस) प्रणाली अस्तित्वात आणली आहे. डेपो, बसस्थानकातून गाडी सुटल्यानंतर प्रत्येक हालचालींवर या सिस्टीमद्वारे बसवर नियंत्रण राहणार आहे.

गाडीचा वेग, लोकेशन आणि थांबा या सिस्टीमद्वारे कळणार आहे. चालक बस हलगर्जीपणे चालवत असेल तर लागलीच वॉर्निंग बेल येते. थांबा नसताना बस थांबवली तर अलर्ट टोन येते. सिस्टीममधल्या या फायद्याच्या बाबींमुळे चालक-वाहकांच्या निष्काळजीपणालाही चाप बसणार आहे. गेल्या महिनाभरापासून या सिस्टीमद्वारे लातूर आगारात गाड्यांचे नियंत्रण सुरू झाले आहे.

लातूर आगारात ही सिस्टीम सुरू झाली असून, बसस्थानकामध्ये मोठा डिजिटल बोर्ड लागला आहे.

गाडी रफ चालविणे, विनाकारण थांबणे यामुळे गाड्या वेळेवर बसस्थानकात येतील व प्रवाशांची सोय होईल.

गाडीचे ब्रेक डाऊन झाले असेल, टायर पंक्चर झाले असेल याबाबतची माहितीही या सिस्टीममुळे कळते.

बसस्थानकात लागले मोठे स्क्रीन

व्हीटीएस प्रणालीचे बसस्थानकात मोठे स्क्रीन लागले असून, प्रवाशांना उदगीरहून येणाऱ्या गाडीची माहिती हवी असल्यास त्या गाडीचे लोकेशन या स्क्रीनवर कळणार आहे. त्यानुसार बस बसस्थानकात किती वेळात येऊ शकते, याचा अंदाज प्रवाशालाही बांधता येईल.

थांबा नसताना थांबा घेतला, गाडी रफ चालविली, विनाकारण ब्रेक लावला, या सर्व बाबी या सिस्टीममुळे स्क्रीनवर दिसतील. शिवाय, या संबंधाची वाॅर्निंग बेलही ही सिस्टीम देते.

रोजच्या रोज गाडीचे बुकिंग या सिस्टीममध्ये केले जाते. त्यात गाडीचा नंबर टाकला जातो. ड्रायव्हर, चालकाची माहिती त्यात असते. गाडी स्थानकातून सुटल्यापासून ती परत येईपर्यंत तिच्यावर नियंत्रण या सिस्टीमचे राहते.

चालक, वाहकांना कोठेही गाडी थांबवता येणार नाही

प्रवासी नसताना किंवा थांबा नसताना आता चालक, वाहकांना कोठेही गाडी थांबविता येणार नाही. कारण गाडी थांबल्याबरोबर थेट डेपोमध्ये आणि बसस्थानकात त्याची माहिती कळते.

आगार व्यवस्थापकांकडे त्याचा खुलासा चालक-वाहकांना करावा लागेल. त्यामुळे निर्धारित वेळ चालक-वाहकांना पाळावी लागेल.

प्रवाशांनाही आता बसस्थानकात गाडीची तासनतास वाट पाहण्याची गरज लागणार नाही. किती वेळात गाडी पोहोचेल याची इत्यंभूत वेळ या सिस्टीमद्वारे कळणार आहे.