शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

बसस्थानकात ताटकळत बसणे थांबले; प्रत्येक बसचे कळणार ‘लाइव्ह लोकेशन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : लॉकडाऊननंतर प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने लालपरी आता हायटेक झाली असून, प्रत्येक बसचे लाइव्ह लोकेशन कळणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : लॉकडाऊननंतर प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने लालपरी आता हायटेक झाली असून, प्रत्येक बसचे लाइव्ह लोकेशन कळणार आहे. त्यासाठी महामंडळाने व्हेकल ट्रॅकिंग सर्चिंग (व्हीटीएस) प्रणाली अस्तित्वात आणली आहे. डेपो, बसस्थानकातून गाडी सुटल्यानंतर प्रत्येक हालचालींवर या सिस्टीमद्वारे बसवर नियंत्रण राहणार आहे.

गाडीचा वेग, लोकेशन आणि थांबा या सिस्टीमद्वारे कळणार आहे. चालक बस हलगर्जीपणे चालवत असेल तर लागलीच वॉर्निंग बेल येते. थांबा नसताना बस थांबवली तर अलर्ट टोन येते. सिस्टीममधल्या या फायद्याच्या बाबींमुळे चालक-वाहकांच्या निष्काळजीपणालाही चाप बसणार आहे. गेल्या महिनाभरापासून या सिस्टीमद्वारे लातूर आगारात गाड्यांचे नियंत्रण सुरू झाले आहे.

लातूर आगारात ही सिस्टीम सुरू झाली असून, बसस्थानकामध्ये मोठा डिजिटल बोर्ड लागला आहे.

गाडी रफ चालविणे, विनाकारण थांबणे यामुळे गाड्या वेळेवर बसस्थानकात येतील व प्रवाशांची सोय होईल.

गाडीचे ब्रेक डाऊन झाले असेल, टायर पंक्चर झाले असेल याबाबतची माहितीही या सिस्टीममुळे कळते.

बसस्थानकात लागले मोठे स्क्रीन

व्हीटीएस प्रणालीचे बसस्थानकात मोठे स्क्रीन लागले असून, प्रवाशांना उदगीरहून येणाऱ्या गाडीची माहिती हवी असल्यास त्या गाडीचे लोकेशन या स्क्रीनवर कळणार आहे. त्यानुसार बस बसस्थानकात किती वेळात येऊ शकते, याचा अंदाज प्रवाशालाही बांधता येईल.

थांबा नसताना थांबा घेतला, गाडी रफ चालविली, विनाकारण ब्रेक लावला, या सर्व बाबी या सिस्टीममुळे स्क्रीनवर दिसतील. शिवाय, या संबंधाची वाॅर्निंग बेलही ही सिस्टीम देते.

रोजच्या रोज गाडीचे बुकिंग या सिस्टीममध्ये केले जाते. त्यात गाडीचा नंबर टाकला जातो. ड्रायव्हर, चालकाची माहिती त्यात असते. गाडी स्थानकातून सुटल्यापासून ती परत येईपर्यंत तिच्यावर नियंत्रण या सिस्टीमचे राहते.

चालक, वाहकांना कोठेही गाडी थांबवता येणार नाही

प्रवासी नसताना किंवा थांबा नसताना आता चालक, वाहकांना कोठेही गाडी थांबविता येणार नाही. कारण गाडी थांबल्याबरोबर थेट डेपोमध्ये आणि बसस्थानकात त्याची माहिती कळते.

आगार व्यवस्थापकांकडे त्याचा खुलासा चालक-वाहकांना करावा लागेल. त्यामुळे निर्धारित वेळ चालक-वाहकांना पाळावी लागेल.

प्रवाशांनाही आता बसस्थानकात गाडीची तासनतास वाट पाहण्याची गरज लागणार नाही. किती वेळात गाडी पोहोचेल याची इत्यंभूत वेळ या सिस्टीमद्वारे कळणार आहे.