शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेे आंदोलन, आग्रीमसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या

By हरी मोकाशे | Updated: January 4, 2024 19:44 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाही देण्यात येऊन पीकविमा कंपनी व कृषी विभागाच्या कारभारावर संताप व्यक्त करण्यात आला.

लातूर: ३२ महसूल मंडळातील काही शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाईपोटी अद्यापही आग्रीम मिळाला नाही. तो तात्काळ देण्यात यावा, या मागणीसाठी बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाही देण्यात येऊन पीकविमा कंपनी व कृषी विभागाच्या कारभारावर संताप व्यक्त करण्यात आला.

हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेेचे जिल्हाध्यक्ष धर्मराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे उपाध्यक्ष महारुद्र चौंडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा उषाताई हिंगे, शिवराज देशमुख, बालाजी शिंदे, संतोष सोनपेठकर, माणिकराव गायकवाड, दगडू गावडे, रमाकांत मोरे, अनिल ब्याळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते.

गत खरीप हंगामात पावसाने ताण दिल्याने सोयाबीनच्या उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळांतील सोयाबीन पीक विमाधारकांना २५ टक्के आग्रीम देण्याचे आदेश दिले होते. तेव्हा पीकविमा कंपनीने आक्षेप घेतले होते. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी तात्काळ ४३ महसूल मंडळांना आग्रीम देण्याचे आदेश देऊन उर्वरित १७ मंडळांसाठी पुनर्मुल्यांकन करुन भरपाई द्यावी, असे स्पष्ट केले होते. दरम्यान, पीकविमा कंपनीने ३२ महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आग्रीम जमा करण्यास सुरुवात केली.

अद्यापही बहुतांश शेतकरी आग्रीमपासून वंचित आहेत. नुकसान भरपाईपोटी तात्काळ आग्रीम देण्यात यावे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

१५ तारखेपर्यंतची दिली मुदत...स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिवसभर आंदोलन करण्यात आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जोपर्यंत आग्रीम जमा होत नाही, तो पर्यंत आम्ही येथून उठणार नाही, असा पावित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता. अखेर कृषी अधिकाऱ्यांनी १४ तारखेपर्यंत आग्रीम जमा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष महारुद्र चौंडे यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूर