शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

जुन्या प्रकल्पाचेच काम सुरू करा; साैरऊर्जा प्रकल्पाचे काम बंद पाडले

By राजकुमार जोंधळे | Updated: September 9, 2023 22:54 IST

महिलांनी शनिवारी महाजनकोकडून उभारण्यात येत असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम बंद पाडले.

बेलकुंड : ज्या प्रकल्पासाठी जमिनी दिल्या होत्या, तो प्रकल्प उभा करा, अन्यथा आमच्या जमिनी आम्हाला परत करा, अशी मागणी करत शिंदाळा (लो.) येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी, महिलांनी शनिवारी महाजनकोकडून उभारण्यात येत असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम बंद पाडले.

औसा तालुक्यातील शिंदाळा (लो) शिवारातील जवळपास दहा-बारा वर्षांपूर्वी शासनाकडून १३२ शेतकऱ्यांची ४५० एकरांवर जमीन भेल आणि महाजनकोच्या १५०० मेगावॅट वायू ऊर्जा प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आली होती. विशेष म्हणजे, जमीन अधिग्रहण करताना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, गत दहा-बारा वर्षांमध्ये नियोजित प्रकल्पासाठी काेणतीही हालचाल झाली नाही. दरम्यानच्या काळात वायू ऊर्जा प्रकल्पाच्या जागी राज्य सरकारने येथे अवघ्या ६० मेगावॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पाला मंजुरी दिली. शिवाय, या प्रकल्पाच्या उभारणीसाठी एका खासगी कंपनीला कंत्राटही दिले हाेते. मात्र, प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना दिलेले नोकरीचे आश्वासन अद्यापही हवेतच आहे. प्रकल्पग्रस्तांचा केला विश्वासात...

शिवाय, सौरऊर्जा प्रकल्पात रूपांतर करतेवेळी प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेतले नाही. याबाबत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी महाजनकोच्या कार्यालयात अनेक खेटे मारूनही यश मिळाले नाही. परिणामी, प्रकल्पग्रस्त शेतकरी, महिलांनी, त्यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी जाऊन सुरू असलेले काम शनिवारी बंद पाडले.  

जमिनी परत करा; प्रकल्पगस्तांचा संताप...

वायू ऊर्जा वीज निर्मितीचा प्रकल्प उभा करा, अन्यथा आमच्या जमिनी परत करा, अशी मागणी संतप्त प्रकल्पग्रस्तांनी केली. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीही प्रकल्पग्रस्तांनी काम बंद पाडले होते. तेव्हापासून कंपनीने काम बंद ठेवले होते. मात्र, मागील दोन दिवसांपासून सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत कंपनीने पुन्हा कामाला सुरुवात केली हाेती. याची माहिती प्रकल्पग्रस्तांना मिळाल्यानंतर संतप्त शेतकरी, महिलांनी शनिवारी पुन्हा काम बंद पाडले.