शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

भूजल जागृती चित्ररथाचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:24 IST

यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, सर्व सहसीलदार, ...

यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, सर्व सहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. बी. एन. संगमवार यांची उपस्थिती होती. लातूर जिल्ह्यातील चार तालुक्यांतील १६१ गावांचा अटल भूजल योजनेंतर्गत समावेश करण्यात आला आहे. लातूर, चाकूर, रेणापूर आणि निलंगा तालुक्यातील १२१ ग्रामपंचायतींमधील १३६ गावांचा समावेश असून, या सर्व गावांचे जलसुरक्षा आराखडे तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शाश्वत स्वरूपात भूजलाचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून ‘भूजल जागृती’ हा महत्त्वाचा विषय आहे. सतत घसरत जाणारी भूजल पातळी आणि नियमित स्वरूपाचे पर्जन्यमान आणि विविध बाबींसाठी होणारा भूजलाचा उपसा ही बाब चिंताजनक आहे. भूजल मूल्यांकन २०१७ नुसार अतिशोषित/अंशत: घोषित करण्यात आलेल्या गावांपैकी १३६ गावांमध्ये भूजल जागृती करणे, जलसुरक्षा आराखडे तयार करणे, अभिसरणअंतर्गत विविध खात्यांच्या उपाययोजनांचा समावेश करून भूजल पुनर्भरण करणे, पीकपाणी व्यवस्थापन करणे, ग्रामस्तरीय पाणलोटातील पाण्याचा ताळेबंद करणे, अशा विविध बाबींचा समावेश असणारा प्रत्येक गावांचा जलसुरक्षा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.