शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

फवारले तणनाशक औषध; जळून गेले साेयाबीन पीक !

By हरी मोकाशे | Updated: July 27, 2023 18:24 IST

कृषी विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे

निलंगा/ केळगाव : निलंगा तालुक्यातील झरी येथील एका शेतकऱ्याने आपल्या चार एकर शेतात तणनाशकाची फवारणी केली. मात्र, तणनाशकाबरोबर सोयाबीनचे पीकही जळून गेल्याची घटना घडली आहे. त्यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. त्याचा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पंचनामा केला.

झरी येथील शेतकरी प्रताप रामचंद्र पाटील यांची सर्वे क्र. ११५ मध्ये चार एकर शेती आहे. त्यांनी खरीप सोयाबीन व तुरीची पेरणी केली आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे शेतात तण वाढले आहे. त्यामुळे त्यांनी केळगाव येथील कृषी सेवा केंद्रावरुन तणनाशकाच्या औषधाची खरेदी केली. ते औषध त्यांनी पाण्यात मिसळून चार एकर शेतात फवारले. तेव्हा गवताबराेबर संपूर्ण सोयाबीन जळून गेले. त्यामुळे पाटील हे हतबल झाले.

दरम्यान, कृषी विभागाने पाहणी करुन पंचनामा करावा. तसेच शासनाने मदत द्यावी, अशी मागणी केली. त्यामुळे तालुका कृषी अधिकारी ए.पी. शेळके, पंचायत समितीचे कृषी अधिकारी एन. एन. कुटवाड, कृषी सहाय्यक एस. आर. लासुने यांनी बुधवारी पाहणी करून पंचनामा केला. बोगस औषधामुळे पीक जळून गेल्याचे शेतकऱ्याचा मुलगा रोहन पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर