शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

मागील कामगिरीच्या जोरावर मिळणार क्रीडा ग्रेस गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:17 IST

लातूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या वर्षात क्रीडा स्पर्धा झाल्या नाहीत. त्यामुळे इयता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसह प्रशिक्षक व पालकांमध्ये गुण ...

लातूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या वर्षात क्रीडा स्पर्धा झाल्या नाहीत. त्यामुळे इयता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसह प्रशिक्षक व पालकांमध्ये गुण मिळणार की नाही असा संभ्रम होता. मात्र, शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मागील कामगिरी ग्राह्य धरत खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा ग्रेस गुण देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शुक्रवारी याबाबत निर्णय जाहीर केला असून, राज्य मंडळाच्या सचिवांना याबाबत सुचविले आहे. दरम्यान यासाठी महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्यावतीने पाठपुरावा करण्यात आला होता. २०२०-२१ या वर्षांत परीक्षा देणाऱ्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्याबाबत स्पष्ट केले आहे. त्यानुसार दहावी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना इयत्ता आठवी, नववीमध्ये खेळलेल्या कामगिरीच्या आधारावर गुण देण्याचे ठरविले आहे तर १२ वी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना अकरावीमधील क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन गुण देण्याची नीती अवलंबावी असे कळविले आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील इयत्ता दहावी, बारावीमधील खेळाडू विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्भ‌वलेल्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला असून, ही सवलत केवळ २०२०-२१ या वर्षाच्या परीक्षेकरिता मिळणार आहे. स्पर्धा नसल्याने खेळाडू विद्यार्थी क्रीडा ग्रेस गुणसाठी हवालदिल झाले होते. मात्र, शासनाच्या या निर्णयामुळे खेळाडू विद्यार्थ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे.

निर्देश येताच प्रस्ताव स्वीकारू...

याबाबत निर्देश येताच क्रीडा ग्रेस गुणांच्या प्रस्तावांची छाननी करून शिक्षण मंडळाकडे इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची शिफारस करू, असे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी सांगितले.

खेळाडूंचे नुकसान टळले...

यंदाच्या वर्षात स्पर्धा न झाल्याने क्रीडा ग्रेस गुणसाठी पेच निर्माण झाला होता. क्रीडा ग्रेस मिळाले नसते तर खेळाडू खचले असते. राज्याच्या क्रीडा विभागाने योग्य निर्णय घेऊन खेळाडूंचे नुकसान टाळले, असे अर्जुनवीर काका पवार म्हणाले.

खेळाडूंच्या हिताचा निर्णय...

राज्य शासनाने खेळाडूंचा विचार करत गतवर्षीच्या कामगिरीवर क्रीडा गुण देण्याचे ठरविले. हा निर्णय स्वागतार्ह असून, यामुळे खेळाडूंचे नुकसान टळले असे, राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी सांगितले.